शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
सावधान! मोटरोलाचा स्मार्टफोन जिन्सच्या खिशातच फुटला; तरुणाचा प्रायव्हेट पार्ट थोडक्यात वाचला...
3
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
4
Viral Video : चालत्या रिक्षेतून उडी मारली अन् थेट रील करू लागला, व्हिडीओ येताच तुफान व्हायरल झाला! 
5
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
6
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
7
२०२६च्या पहिल्याच दिवशी प्रदोष, ‘असे’ करा व्रतपूजन; शिव मंत्र ठरेल रामबाण, वर्षभर मिळेल लाभ!
8
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
9
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
10
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
11
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
12
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
13
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
14
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
15
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
16
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
17
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
18
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
19
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
20
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यनाथाच्या पिंंडीवरील आवरण काढण्यासाठी महिलांचे आंदोलन

By admin | Updated: July 5, 2016 01:50 IST

श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला

परळी : श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला काय म्हणावे? वैद्यनाथांच्या पिंंडीवरील चांदीच्या आवरणामुळे सध्या पाऊस पडत नाही. त्यामुळे हे आवरणच काढून टाकावे, या मागणीसाठी सोमवारी महिला आक्रमक झाल्या होत्या.देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पिंडीची झीज थांबविण्यासाठी देवस्थान ट्र्स्टने २०११पासून हे चांदीचे आवरण चढविलेले आहे. हे आवरण काढून टाकावे, अशी मागणी करणारे निवेदन श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. आवरणामुळे पाऊस पडत नसल्याची महिलांची धारणा आहे. याच मागणीसाठी सोमवारी शांता राठोड यांच्यासह १३ महिला सकाळी ६ वाजता गाभाऱ्यात पोहचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर मंदिर परिसरात त्यांनी ठिय्या दिला. परळी शहर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे तणाव निवळला. (प्रतिनिधी)चांदीचे आवरण कशासाठी?श्री वैद्यनाथाला अभिषेक करीत असताना भक्त मोठ्या श्रद्धेने पंचामृत (दही-दूध-तूप-मध-साखर), हळद-कुंकू, गुलाल बुक्का, अक्षता, अत्तर, केळी, आंबा हीफळे आणि जल या वस्तूंचा वापर यात होतो. आम्लीय पदार्थांच्या गुणधर्मामुळे मूर्तीवर परिणाम होऊन झीज होत असते. ही बाब ट्रस्टच्या लक्षात आल्यानंतरयावर उपाययोजना म्हणून २०११मध्ये चांदीचे आवरण घालून स्पर्शदर्शन अबाधित ठेवले आहे. जगद्गुरूंनीही केले कौतुककाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामी, श्रीशैल्य जगद्गुरु महास्वामी, उज्जैनपीठाचे जगद्गुरू सिध्दलिंंगराज देशीकेंद्र महास्वामी, करवीरपीठाचे शंकराचार्य, राजस्थानचे राधाकृष्ण महाराज यांच्यासह देशातील विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पर्श दर्शन अबाधित ठेवून आवरण केल्याबद्दल व देवाची झीज होऊ नये म्हणून घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे ट्रस्टीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.चांदीचे आवरण व पावसाचा दुरान्वये संबंध नाही. पाऊस नसण्यामागची शास्त्रीय कारणे वेगळी आहेत. त्याचा पिंडीवरच्या आवरणाशी संबंध जोडता येणार नाही. आवरण असावे की नसावे, हा श्रद्धेचा व ट्र्स्टसंबंधित प्रश्न आहे; परंतु पाऊस कमी असणे किंवा नसण्यामागची नेमकी कारणे आपण लक्षात घेतली पाहिजेत.- प्राचार्या सविता शेटे, राज्य सचिव, राष्ट्रीय अनुसंधान