शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

वैद्यनाथाच्या पिंंडीवरील आवरण काढण्यासाठी महिलांचे आंदोलन

By admin | Updated: July 5, 2016 01:50 IST

श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला

परळी : श्रद्धा आणि अंधश्रद्धेचा फेरा देवालाही चुकला नाही. पाऊस पडावा म्हणून एरवी देवाकडे करुणा भाकणारे भाविक जेव्हा ज्योतिर्लिंगावरच्या चांदीवर दुष्काळाचे खापर फोडतात, तेव्हा त्याला काय म्हणावे? वैद्यनाथांच्या पिंंडीवरील चांदीच्या आवरणामुळे सध्या पाऊस पडत नाही. त्यामुळे हे आवरणच काढून टाकावे, या मागणीसाठी सोमवारी महिला आक्रमक झाल्या होत्या.देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या या पिंडीची झीज थांबविण्यासाठी देवस्थान ट्र्स्टने २०११पासून हे चांदीचे आवरण चढविलेले आहे. हे आवरण काढून टाकावे, अशी मागणी करणारे निवेदन श्री प्रभू वैद्यनाथ ज्योतिर्लिंग विकास कृती समितीच्या वतीने तहसीलदारांना देण्यात आले. आवरणामुळे पाऊस पडत नसल्याची महिलांची धारणा आहे. याच मागणीसाठी सोमवारी शांता राठोड यांच्यासह १३ महिला सकाळी ६ वाजता गाभाऱ्यात पोहचल्या. मात्र, पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर मंदिर परिसरात त्यांनी ठिय्या दिला. परळी शहर पोलिसांनी या महिलांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. त्यामुळे तणाव निवळला. (प्रतिनिधी)चांदीचे आवरण कशासाठी?श्री वैद्यनाथाला अभिषेक करीत असताना भक्त मोठ्या श्रद्धेने पंचामृत (दही-दूध-तूप-मध-साखर), हळद-कुंकू, गुलाल बुक्का, अक्षता, अत्तर, केळी, आंबा हीफळे आणि जल या वस्तूंचा वापर यात होतो. आम्लीय पदार्थांच्या गुणधर्मामुळे मूर्तीवर परिणाम होऊन झीज होत असते. ही बाब ट्रस्टच्या लक्षात आल्यानंतरयावर उपाययोजना म्हणून २०११मध्ये चांदीचे आवरण घालून स्पर्शदर्शन अबाधित ठेवले आहे. जगद्गुरूंनीही केले कौतुककाशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर महास्वामी, श्रीशैल्य जगद्गुरु महास्वामी, उज्जैनपीठाचे जगद्गुरू सिध्दलिंंगराज देशीकेंद्र महास्वामी, करवीरपीठाचे शंकराचार्य, राजस्थानचे राधाकृष्ण महाराज यांच्यासह देशातील विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पर्श दर्शन अबाधित ठेवून आवरण केल्याबद्दल व देवाची झीज होऊ नये म्हणून घेतलेल्या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे ट्रस्टीच्या वतीने निवेदनात म्हटले आहे.चांदीचे आवरण व पावसाचा दुरान्वये संबंध नाही. पाऊस नसण्यामागची शास्त्रीय कारणे वेगळी आहेत. त्याचा पिंडीवरच्या आवरणाशी संबंध जोडता येणार नाही. आवरण असावे की नसावे, हा श्रद्धेचा व ट्र्स्टसंबंधित प्रश्न आहे; परंतु पाऊस कमी असणे किंवा नसण्यामागची नेमकी कारणे आपण लक्षात घेतली पाहिजेत.- प्राचार्या सविता शेटे, राज्य सचिव, राष्ट्रीय अनुसंधान