शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

महिला आयोगाची सायबर समिती! आज होणार पहिली बैठक  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2018 5:37 AM

सोशल मीडियात महिलांना लक्ष्य करून केली जाणारी शेरेबाजी तसेच त्यांच्या बदनामीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.

मुंबई -  सोशल मीडियात महिलांना लक्ष्य करून केली जाणारी शेरेबाजी तसेच त्यांच्या बदनामीच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाने सायबर समितीची स्थापना केली आहे. या समितीची पहिली बैठक मंगळवारी आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे.या सायबर समितीच्या माध्यमातून महिलांना लक्ष्य करण्याच्या प्रकरणांचा अभ्यास केला जाईल व अशा प्रकारांना चाप लावण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभ्यास करून त्या अनुषंगाने राज्य सरकारला शिफारशी करण्यात येतील.सोशल मीडियावर महिलांची बदनामी करणे, त्यांना त्रास देणे, मनास लज्जा उत्पन्न होईल, अशा प्रकारची अवमानकारक वक्तव्ये व टिप्पणी करण्याच्या तक्रारींचे प्रमाण गेल्या काही काळात वाढत आहे. त्यामुळे समिती स्थापून सरकारला शिफारसी करून, असे प्रकार रोखण्याची गरज होती, असे विजया रहाटकर यांनी सांगितले.समितीच्या अध्यक्षस्थानी माहिती व जनसंपर्क महासंचलनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह असतील. सदस्य म्हणून महिला बाल विकास विभागाच्या सचिव विनिता वेद, पोलीस उपायुक्तडॉ. रश्मी करंदीकर, सायबर सिक्युरिटीचा अभ्यास असलेले वकील अ‍ॅड. प्रशांत माळी, अ‍ॅड. वैशाली भागवत, स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून सायबर सुरक्षेवर काम करणाऱ्या सोनाली पाटणकर, मुक्त पत्रकार व लेखिका मुक्ता चैतन्य यांचाही समावेश आहे. कालांतराने समितीत आणखी काही पोलीस अधिकारी, तज्ज्ञांचा समावेश करण्यात येईल.अभ्यासपूर्ण अहवाल तयार करणारसमितीच्या बैठका नियमितपणे घेऊन समितीचा अभ्यासपूर्ण अहवाल तयार करून, तो राज्य सरकारला शक्य तितक्या लवकर सादर केला जाईल, असे महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :WomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्रnewsबातम्या