शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

शिवाजी आढळराव पाटलांना मिळणार अजितदादांची साथ?; अमोल कोल्हेंची डोकेदुखी वाढणार

By प्रविण मरगळे | Updated: December 26, 2023 14:50 IST

५ वर्ष शेतकऱ्यांनी तुमच्याविरोधात आक्रोश केला. तेव्हा तुम्ही कुठे होता? आज आक्रोश यात्रा काढली जाते हा बालिशपणा आहे अशा शब्दात आढळरावांनी कोल्हेंवर टीकास्त्र सोडलं.

पुणे -  Shivaji Adhalrao Patil on Ajit Pawar ( Marathi News ) महायुतीत अद्याप जागावाटप झाले नाही. प्रत्येक पक्ष आपापला दावा करेल.अजितदादांचा नैसर्गिक दावा या मतदारसंघावर राहतो.कारण त्यांनी शिरुरची जागा जिंकली आहे. पुणे जिल्ह्यात त्यांचे प्राबल्य आहे. त्यांनी या जागेवर दावा करणे चुकीचे आहे असं नाही. मी ५ वर्ष मेहनत करतोय त्यामुळे आमचाही दावा आहे. पण जागावाटप होईल त्यावेळी ही जागा कोणाच्या वाट्याला जाईल ते ही जागा लढवतील असं विधान शिरूरचे माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी केले आहे.  आढळराव पाटलांसोबत लोकमत डॉट कॉमने संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. 

अजित पवारांनी अमोल कोल्हे यांना इशारा दिल्यानंतर आता शिरूर मतदारसंघात कोण उभा राहील याचीच चर्चा मतदारसंघात सुरू आहे. त्यातच शिवाजी आढळराव पाटील अजितदादा गटासोबत जातील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आढळराव पाटील यांनी या चर्चा खोडसाळ असून महायुतीचा उमेदवार आम्ही निवडून आणू अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाजी आढळराव पाटील म्हणाले की, गेल्या ५ वर्षापासून मी मतदारसंघात लोकांशी संवाद साधतोय, विकासकामे, मेळावे, दौरे, भेटीगाठी सुरू आहेत. महाराष्ट्रातून कमीत कमी ४५ जागा महायुतीला निवडून आणायच्या आहेत त्यामुळे जागा कोणालाही गेली तरी इतर २ पक्षांना ते मान्य करावे लागणार आहे. उद्या जर ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली तरी माझी काही तक्रार राहणार नाही. मित्रपक्ष म्हणून ज्यावेळी जागावाटपाची चर्चा होईल तेव्हा पुढे काय हे ठरवू. सध्या जर तर वर भाष्य करणार नाही असं सांगत आढळरावांनी अजितदादा गटासोबत जाण्याबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे.

तसेच अजितदादा म्हणाले संघर्ष यात्रा, आक्रोश यात्रा आता सुचली, ५ वर्ष सुचली नाही. अजितदादा बोलले  ते बरोबर आहे. ५ वर्ष या मतदारसंघातील जनता कोल्हेंविरोधात आक्रोश करत होती. तुम्ही या आमची कामे करा, भेटा, दर्शन द्या असा आक्रोश लोकांचा ५ वर्ष होता. त्याच्याकडे कोल्हेंनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आता निवडणुका आल्या तेव्हा शेतकऱ्यांचा आक्रोश दिसायला लागला आहे. हा प्रकार काय आहे? ५ वर्ष शेतकऱ्यांनी तुमच्याविरोधात आक्रोश केला. तेव्हा तुम्ही कुठे होता? आज आक्रोश यात्रा काढली जाते हा बालिशपणा आहे. तुम्ही कुठे आंदोलन केले? रस्त्यावर उतरले? निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन कोल्हे हा प्रकार करत आहेत असा निशाणा आढळराव पाटलांनी खासदार अमोल कोल्हेंवर साधला.

दरम्यान, अजित पवार सरकारसोबत आल्यानंतर निश्चितच शिरूर लोकसभा मतदारसंघात ताकद वाढली आहे. तिन्ही पक्ष एकत्रित लढल्यावर शिरूरची जागा १०० टक्के महायुती निवडून येणार असा विश्वासही शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर आढळराव पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी झालेत. शिरूर लोकसभा मतदारसंघातून आढळराव इच्छुक आहेत. त्यात अजित पवार गट सत्तेसोबत आल्यानं आढळराव पाटील कोणत्या चिन्हावर शिरूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार हे पाहणे गरजेचे आहे. 

शिरुर लोकसभेचं गणित कसं आहे?शिरूर लोकसभा मतदारसंघात एकूण ६ विधानसभा मतदारसंघ येतात. त्यात भोसरी, शिरुर, हडपसर, खेड, जुन्नर आणि आंबेगाव..आता खेड, हडपसर, जुन्नर आणि आंबेगाव हे चारही आमदार अजितदादांसोबत आहे.भोसरी येथील महेश लांडगे ते भाजपाचे आहेत. शिरुरमधील १ आमदार ते शरद पवार गटाकडे आहेत. त्यामुळे अशोक पवार वगळता इतर सर्व विरोधी बाकांवर आहे. त्यामुळे मतदारसंघातील विजय सुखकर करण्यासाठी मध्यंतरी कोल्हे अजितदादांसोबत येतील अशी चर्चा होती. परंतु २ दिवसांपासून या चर्चेस पूर्णविराम मिळाला आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात अतुल बेनके, दिलीप मोहिते, दिलीप वळसे पाटील यासारखी दिग्गज मंडळी एकाबाजूला आहेत त्यामुळे या मतदारसंघात महायुती कोणाला तिकीट देणार हे पाहणे गरजेचे आहे. 

टॅग्स :Shivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसshirur-pcशिरूर