शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

इच्छाशक्ती असेल तर मानवी तस्करी रोखणे शक्य - महेश भागवत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:33 IST

भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या मदतीनेही मानवी तस्करी विशेषत: वेश्या व्यवसायाला आळा घालणे शक्य

ठळक मुद्देवेश्या व्यवसायात मुलींना ओढणा-या व मुलींचा लैंगिक छळासाठी वापर करणा-या ग्राहकांना कडक शासन होण्याची गरज तेलंगणमध्ये वेश्यागृहातून मुलींची सुटका केल्यानंतर आम्ही मुलींना अटक करण्याएेवजी त्या व्यवसायाला कारणीभूत ठरणार्या साखळीतील लोकांना अटक केले.

मुंबई, दि 27- भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या मदतीनेही मानवी तस्करी विशेषत: वेश्या व्यवसायाला आळा घालणे शक्य असल्याचे मत तेलंगणच्या रचाकोंडा येथील पोलीस अधीक्षक महेश भागवत यांनी व्यक्त केले. राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनद्वारे आयोजित महिला तस्करीविरोधातील परिषदेत त्यांनी मानवी तस्करीविरोधात काम करताना तेलंगणमध्ये आलेले अनुभव सांगितले.

वेश्या व्यवसायात मुलींना ओढणा-या व मुलींचा लैंगिक छळासाठी वापर करणा-या ग्राहकांना कडक शासन होण्याची गरज आहे. याबाबत स्वीडन देशाने उत्तम कायदा तयार केला आहे, तसा कायदा भारतातही झाला तर सध्यापेक्षा जास्त कडक शिक्षा गुन्हेगारांना करता येईल. तेलंगणमध्ये वेश्यागृहातून मुलींची सुटका केल्यानंतर आम्ही मुलींना अटक करण्याएेवजी त्या व्यवसायाला कारणीभूत ठरणार्या साखळीतील लोकांना अटक केले. भारतात कोणताही कायदा रेड लाइट एरियाला परवानगी देत नाही, या वेश्याविभागांवर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारेच आम्ही कारवाई करतो. तेलंगणमध्ये याच कायद्याच्या मदतीने 40 वेश्यागृहे बंद झाली आहेत. जे समुदाय परंपरेने वेश्या व्यवसाय करत आले होते त्यांच्यासाठी आम्ही आसरा सारखा प्रकल्प राबवून मुलींची छळातून सुटका केली अशी माहिती देऊन भागवत यांनी कारवाईसाठी खरी गरज इच्छाशक्तीची असल्याचे मत मांडले .

महाराष्ट्र पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीसांसह समाजातील सर्व घटकांचे संवेदीकरण होण्याची इच्छा बोलून दाखवली. मानवी तस्करी रोखण्यासाठी जलदगती न्यायालये, बळी पडलेल्या व्यक्तीबाबत गोपनियता पाळण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुलींना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रयत्न-

पश्चिम बंगालच्या सीमा नेपाळ, भूटान, बांगलादेशला लागून आहेत, त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी होते. पश्चिम बंगाल सरकार राज्यात येणार्या व राज्यातून बाहेर तस्करी होऊन जाणार्या मुलींची सूटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मानवी तस्करी विरोधात या राज्य सरकारने स्वतंत्र संचालनालय उभारले आहे. पीडित मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केल्यानंतर त्यांना कुटिरोद्योगाचे प्रशिक्षण देऊन मदतही केली जाते. त्याचप्रमाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना राज्य, शहक, जिल्हा, तालुका, मंडल आणि गाव पातळीवरही करण्यात आलेली आहे. मानवी तस्करीविरोधात टास्क फोर्सही सतत जागरुक राहून काम करतात. -रोशनी सेन, प्रधान सचिव , महिला आणि बालकल्याण विभाग, पश्चिम बंगाल 

पुनर्वसन महत्त्वाचे- गिरिश कुलकर्णी, स्नेहालय 

ज्या महिलांची वेश्याव्यवसायातून सूटका केली जाते, त्यांचे नंतर पुनर्वसन होणे गरजेचे असते. बहुतेक वेळेस या मुली पुन्हा जुन्या व्यवसायाकडे वळण्याचा धोका असतो, त्यामुळे एकदा सूटका झाल्यावर पुढील अनेक वर्षे त्यांना मदतीची गरज असते. त्यांना स्वत: च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. राजकीय इच्छाशक्ती देखिल यामध्ये आवश्यक आहे. पोलीस, समाज, माध्यमे, न्यायव्यवस्था यांनी हातात हात घालून काम केले तर महिला तस्करी नक्कीच कमी होईल.