शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

इच्छाशक्ती असेल तर मानवी तस्करी रोखणे शक्य - महेश भागवत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2017 16:33 IST

भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या मदतीनेही मानवी तस्करी विशेषत: वेश्या व्यवसायाला आळा घालणे शक्य

ठळक मुद्देवेश्या व्यवसायात मुलींना ओढणा-या व मुलींचा लैंगिक छळासाठी वापर करणा-या ग्राहकांना कडक शासन होण्याची गरज तेलंगणमध्ये वेश्यागृहातून मुलींची सुटका केल्यानंतर आम्ही मुलींना अटक करण्याएेवजी त्या व्यवसायाला कारणीभूत ठरणार्या साखळीतील लोकांना अटक केले.

मुंबई, दि 27- भारतात सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांच्या मदतीनेही मानवी तस्करी विशेषत: वेश्या व्यवसायाला आळा घालणे शक्य असल्याचे मत तेलंगणच्या रचाकोंडा येथील पोलीस अधीक्षक महेश भागवत यांनी व्यक्त केले. राज्य महिला आयोग आणि इंटरनॅशनल जस्टीस मिशनद्वारे आयोजित महिला तस्करीविरोधातील परिषदेत त्यांनी मानवी तस्करीविरोधात काम करताना तेलंगणमध्ये आलेले अनुभव सांगितले.

वेश्या व्यवसायात मुलींना ओढणा-या व मुलींचा लैंगिक छळासाठी वापर करणा-या ग्राहकांना कडक शासन होण्याची गरज आहे. याबाबत स्वीडन देशाने उत्तम कायदा तयार केला आहे, तसा कायदा भारतातही झाला तर सध्यापेक्षा जास्त कडक शिक्षा गुन्हेगारांना करता येईल. तेलंगणमध्ये वेश्यागृहातून मुलींची सुटका केल्यानंतर आम्ही मुलींना अटक करण्याएेवजी त्या व्यवसायाला कारणीभूत ठरणार्या साखळीतील लोकांना अटक केले. भारतात कोणताही कायदा रेड लाइट एरियाला परवानगी देत नाही, या वेश्याविभागांवर सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यांद्वारेच आम्ही कारवाई करतो. तेलंगणमध्ये याच कायद्याच्या मदतीने 40 वेश्यागृहे बंद झाली आहेत. जे समुदाय परंपरेने वेश्या व्यवसाय करत आले होते त्यांच्यासाठी आम्ही आसरा सारखा प्रकल्प राबवून मुलींची छळातून सुटका केली अशी माहिती देऊन भागवत यांनी कारवाईसाठी खरी गरज इच्छाशक्तीची असल्याचे मत मांडले .

महाराष्ट्र पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी पोलीसांसह समाजातील सर्व घटकांचे संवेदीकरण होण्याची इच्छा बोलून दाखवली. मानवी तस्करी रोखण्यासाठी जलदगती न्यायालये, बळी पडलेल्या व्यक्तीबाबत गोपनियता पाळण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले. 

मुलींना स्वबळावर उभे करण्यासाठी प्रयत्न-

पश्चिम बंगालच्या सीमा नेपाळ, भूटान, बांगलादेशला लागून आहेत, त्यामुळे तेथून मोठ्या प्रमाणात मानवी तस्करी होते. पश्चिम बंगाल सरकार राज्यात येणार्या व राज्यातून बाहेर तस्करी होऊन जाणार्या मुलींची सूटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. मानवी तस्करी विरोधात या राज्य सरकारने स्वतंत्र संचालनालय उभारले आहे. पीडित मुलींची वेश्या व्यवसायातून सुटका केल्यानंतर त्यांना कुटिरोद्योगाचे प्रशिक्षण देऊन मदतही केली जाते. त्याचप्रमाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटची स्थापना राज्य, शहक, जिल्हा, तालुका, मंडल आणि गाव पातळीवरही करण्यात आलेली आहे. मानवी तस्करीविरोधात टास्क फोर्सही सतत जागरुक राहून काम करतात. -रोशनी सेन, प्रधान सचिव , महिला आणि बालकल्याण विभाग, पश्चिम बंगाल 

पुनर्वसन महत्त्वाचे- गिरिश कुलकर्णी, स्नेहालय 

ज्या महिलांची वेश्याव्यवसायातून सूटका केली जाते, त्यांचे नंतर पुनर्वसन होणे गरजेचे असते. बहुतेक वेळेस या मुली पुन्हा जुन्या व्यवसायाकडे वळण्याचा धोका असतो, त्यामुळे एकदा सूटका झाल्यावर पुढील अनेक वर्षे त्यांना मदतीची गरज असते. त्यांना स्वत: च्या पायावर उभे करण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. राजकीय इच्छाशक्ती देखिल यामध्ये आवश्यक आहे. पोलीस, समाज, माध्यमे, न्यायव्यवस्था यांनी हातात हात घालून काम केले तर महिला तस्करी नक्कीच कमी होईल.