शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार? नाराजीमुळे जय महाराष्ट्र करणार? राजन साळवी म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 12:20 IST

Thackeray Group Rajan Salvi News: राजन साळवी उद्धव सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपा किंवा शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. याबाबत राजन साळवी यांनी सूचक विधाने केली आहेत.

Thackeray Group Rajan Salvi News: एकीकडे महायुतीमधील नेते, आमदार नाराज असल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे महाविकास आघाडीतील काही नेते आणि आमदार महायुतीत येऊ शकतात, असे दावे करणारी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यातच आता कोकणात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसणार असून, नाराज असलेले राजन साळवीउद्धव ठाकरेंची साथ सोडून पक्षाला जय महाराष्ट्र करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यावरून अनेक तर्क-वितर्क लावले जात होते. याबाबत राजन साळवी यांनी भाष्य करताना सूचक विधान केले आहे. 

सन २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत राजन साळवी उद्धव सेनेकडून निवडणूक रिंगणात होते. परंतु, त्यांना पराभावाचा सामना करावा लागला. तसेच राजन साळवी यांच्या मागे सातत्याने तपास यंत्रणांचा ससेमिरा लागलेला आहे. अनेक कारणांवरून नाराज असलेले राजन साळवी आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असून, शिवसेना शिंदे गट किंवा भाजपामध्ये जाणार असल्याचे दावे केले जात होते. त्यानंतर आता खुद्द राजन साळवी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. 

पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना

पिकल्या आंब्यावर दगड मारले जातात. तसा प्रयत्न भाजपाकडून केला गेला असेल. माझ्याशी अद्याप कोणीही संपर्क केलेला नाही. पक्षात येणाऱ्या माणसाचे स्वागत करणे प्रत्येक पक्षप्रमुखाचे कर्तव्य असते. पण मतदारसंघात आणि जिल्ह्यात माझ्या संघटन कौशल्यामुळे मी यावे असं वाटत असेल. त्यामुळे त्यांची अपेक्षा असेल. ठाकरेंचा निष्ठावंत सैनिक म्हणून माझी ओळख आहे. २०२४ मध्ये झालेल्या पराभावाला आम्ही सामोरे गेलो. पराभवाचे दुःख, खंत आणि वेदना माझ्यासकट मतदारसंघातील सामान्य जनतेला आहे. पराभवाची खंत असताना भविष्याकडेही शिवसेना मार्गक्रमण करत आहे. मीडियातून मला समजले की, मी नाराज आहे. भाजपा किंवा शिंदे गटाच्या वाटेवर आहे. पण तसे काही नाही. रोजच्या कामात माझे मार्गक्रमण सुरू आहे. अशा बातम्या अफवा आहेत. हा निष्ठावंत सैनिक बाळासाहेबांचाच राहणार. यात कोणतीही शंका नाही, असे राजन साळवी यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, मुंबईत मातोश्री येथे पराभूत उमेदवारांची बैठक घेण्यात आली होती. तिथे पराभवाचे कारण आणि आत्मचिंतन करण्यात आले. तेच आमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, अशी माहिती देताना, एसीबीची चौकशी सुरू होती. याबाबत उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्याकडून निर्णय सुट्टीनंतर अपेक्षित आहे. आमच्यावर टांगती तलवार आहे, हे मला निश्चितपणे माहिती आहे, असे राजन साळवी यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Rajan Salviराजन साळवीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना