शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 09:38 IST

अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. - गडकरी

शिवसेनेसोबत मी पूर्वी काम केले आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना ही भेटत असतो. राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. उद्धव ठाकरेंच्या ऑफरला विनोदाने घ्यावे. आघाडी तुटली म्हणजे मैत्री तुटत नाही. मतभेद झालेत, मनभेद नाहीत असे सांगत उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येतील का, या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. 

अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. माझ्या आणि मोदींमध्ये तणाव नाही. आमचे नेहमी बोलणे होत असते, असा खुलासा गडकरी यांनी केला. उद्धव ठाकरे भाजपासोबत येतील का, या सवालावर गडकरी यांनी भाजपात जो आला, पदरी पडले तो पवित्र झाला, असे सांगितले. 

दुसऱ्या राजकीय पक्षातील कोणीही माझ्याकडे दु:ख व्यक्त करण्यासाठी येत नाही. अनेक लोक तर्कवितर्क लावत असतात. ज्यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत ती मैत्री मी जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे, असे गडकरी म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गडकरी यांनी ही मते व्यक्त केली. 

सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही. राष्ट्रकारण, विकास कारण हे खर राजकारण आहे. त्यामुळे मी ठरवलंय वागताना गुणात्मक पद्धतीने वागले पाहिजे. कमरेखालचे वार मी करत नाही, असेही गडकरी म्हणाले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना