शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

उद्धव ठाकरे सोबत येतील का? प्रश्नावर गडकरी म्हणाले, 'पदरी पडले तो पवित्र झाला'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 09:38 IST

अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. - गडकरी

शिवसेनेसोबत मी पूर्वी काम केले आहे. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांना ही भेटत असतो. राजकारणामध्ये वेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देत असतात. उद्धव ठाकरेंच्या ऑफरला विनोदाने घ्यावे. आघाडी तुटली म्हणजे मैत्री तुटत नाही. मतभेद झालेत, मनभेद नाहीत असे सांगत उद्धव ठाकरे पुन्हा भाजपसोबत येतील का, या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारणात काहीही होऊ शकते, असे संकेत दिले आहेत. 

अनेकवेळा जाणूनबुजून लोक काही गोष्टी करतात. त्यांची मोदींवर अटॅक करण्याची हिंमत नाही. ते कोठेतरी माझ्या बोलण्याच गैर अर्थ लावतात. माझ्या आणि मोदींमध्ये तणाव नाही. आमचे नेहमी बोलणे होत असते, असा खुलासा गडकरी यांनी केला. उद्धव ठाकरे भाजपासोबत येतील का, या सवालावर गडकरी यांनी भाजपात जो आला, पदरी पडले तो पवित्र झाला, असे सांगितले. 

दुसऱ्या राजकीय पक्षातील कोणीही माझ्याकडे दु:ख व्यक्त करण्यासाठी येत नाही. अनेक लोक तर्कवितर्क लावत असतात. ज्यांच्याशी माझे मैत्रीचे संबंध आहेत ती मैत्री मी जपण्याचा प्रयत्न करतो. परंतु मैत्री वेगळी आणि राजकारण वेगळे, असे गडकरी म्हणाले. एबीपी माझाच्या माझा कट्टा कार्यक्रमात गडकरी यांनी ही मते व्यक्त केली. 

सत्ताकारण, पॉवर पॉलिटिक्स म्हणजे राजकारण नाही. राष्ट्रकारण, विकास कारण हे खर राजकारण आहे. त्यामुळे मी ठरवलंय वागताना गुणात्मक पद्धतीने वागले पाहिजे. कमरेखालचे वार मी करत नाही, असेही गडकरी म्हणाले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv Senaशिवसेना