शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का?; चर्चेवर जयंत पाटलांची स्पष्ट भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 21:07 IST

मुख्यमंत्रिपदाची इच्छा असणं स्वाभाविक आहे परंतु व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे असं विधान जयंत पाटलांनी केलं आहे.

मुंबई - उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्यांनी एकदा नेतृत्व केलेच आहे. त्यामुळे आमच्यात काही मतभेद होतील असं वाटत नाही. आम्ही एकत्र बसून जो काही असेल तो निर्णय घेऊ. महाराष्ट्रात लोक उद्धव ठाकरे, शरद पवार आणि राहुल गांधींकडे बघून मतदान करतात. तिघांचे समर्थक एकत्रित आल्याने ताकद वाढली आहे. उद्धव ठाकरे हे मविआचे प्रमुख नेते आहेत. लोकसभेला महाराष्ट्रात फिरून त्यांनी समाज जागरुक केला. त्यांच्या पक्षाचे नेते ते आहेत पण आमच्या पक्षाचे नेते शरद पवार यांनाही महाराष्ट्रात तेवढेच महत्त्व आहे. त्यामुळे हे दोघे एकत्रित बसून निर्णय घेतील. नेते कोण यावर मविआत संभ्रम आणि स्पर्धाही नाही. महाविकास आघाडीत एखादा चेहरा देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याबाबत आम्ही अजून चर्चा केली नाही अशी स्पष्ट भूमिका मांडत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदावर भाष्य केले आहे.

जयंत पाटील म्हणाले की, इतकी वर्ष राजकारणात घालवून शरद पवारांच्या आशीर्वादाने मी इथपर्यंत पोहचलो. त्यामुळे इच्छा असणं स्वाभाविक आहे. पण शेवटी व्यवहारी भूमिका राजकारणात असणं आवश्यक आहे. काँग्रेसमध्ये २-३ जण आहेत, राष्ट्रवादीत १-२ जण आहेत, शिवसेनेत काही आहेत प्रत्येकाची इच्छा असते. महायुतीतही ५-६ जण आहेत. परंतु संख्या किती याला राजकारणात महत्त्व आहे. त्यामुळे संख्या आल्याशिवाय त्यावर बोलणं अतातायीपणा होईल. महाविकास आघाडीचं बहुमत आलं तर या गोष्टी होतील. बहुमत आणायला प्राधान्य देऊ. त्यानंतर माझा पक्ष वाढवणं हीदेखील माझी नैतिक जबाबदारी आहे असं मुख्यमंत्री व्हायची इच्छा आहे का या प्रश्नावर उत्तर दिले. एनडीटीव्हीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच सत्ता मिळवायची असेल तर निवडून येण्याची क्षमता कुणाची असेल याचे थोडं आकलन केले तर सत्ता मिळू शकेल. त्यामुळे किती जागा लढल्या याला महत्त्व नसून किती जागा निवडून आल्या त्याला महत्त्व आहे. तिन्ही पक्ष समजूतदारपणाची भूमिका घेतील अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीच्या जास्त जागा आल्या तेव्हा मुख्यमंत्रीपद नाकारलं गेले, त्याबाबत प्रश्न विचारला असता तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. परिस्थितीनुसार शरद पवारांनी तसा निर्णय घेतला. नेहमी तशीच परिस्थिती असते असं नाही. निवडणुकीत संख्या निवडून आल्यानंतर या गोष्टींची चर्चा केली पाहिजे. आम्ही तिन्ही पक्ष एकदिलाने लढलो पाहिजे याला पहिले प्राधान्य आहे. सत्ता येणे याला प्राधान्य आहे असं जयंत पाटलांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, जागावाटपात तिन्ही पक्ष तुल्यबळ आहेत. तिन्ही पक्षात समतोल राखला जाईल. तपशिलवार चर्चा सुरू झाली नाही. तिन्ही एकसंघाने लढले तर महाराष्ट्रात सरकार येईल अशी शक्यता आहे. लोकसभेला आघाडी होण्यासाठी आम्ही कमी जागा लढवल्या. आम्ही १५ जागा लढवू शकलो असतो परंतु शरद पवारांनी पुढाकार घेतला आणि बऱ्याच ठिकाणी माघार घेत मित्रपक्षांना सामावून घेतले. ज्या १० जागा आम्ही घेतल्या त्या चांगल्या लढवल्या, ९ वी जागा चिन्हांच्या गोंधळामुळे पडली. महाराष्ट्रात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळाला. मित्रपक्षांनीही योगदान दिले. लोकसभेत एकसंघपणा यावा म्हणून आम्ही २ पावलं मागे होतो पण महाराष्ट्रात आम्ही ज्याठिकाणी निवडणूक लढवतो, नेते गेले असले तरी बहुसंख्य कार्यकर्ते आहेत तिथे जागा लढवाव्या लागतील असंही जयंत पाटलांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेJayant Patilजयंत पाटीलSharad Pawarशरद पवारmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४