शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल का?  शेतकऱ्याची कविता शेअर करत जयंत पाटलांचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून ट्विट केला आहे.

मुंबई : या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतीला पाणी नसल्याने पिके जगवायची कशी या विवंचनेत शेतकरी आहे. त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने जगायचे कसे? हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी मराठवाड्यातील हिंगोली येथील शेतकऱ्यांनी थेट आपले अवयव विक्रीला काढले आहेत. तसेच, हे अवयव विकत घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात किडनीसाठी ७५ हजार, लिव्हरसाठी ९० हजार, डोळ्यासाठी २५ हजार किंमत लावण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून ट्विट केला आहे. राजकुमार नायक असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, हिंगोली शेतकरी राजकुमार नायक यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. इतकेच नवे तर असंख्य अडचणींचा सामना करत असल्याने त्यांनी आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. राजकुमार यांची ही कविता प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात या कवितेतून काही प्रकाश पडेल का? हा खरा प्रश्न आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दुसरीकडे कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाजपच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, पण राज्यातील भाजप सरकारला त्याची लाज वाटत नाही, असा घणाघाती हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलFarmerशेतकरी