शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल का?  शेतकऱ्याची कविता शेअर करत जयंत पाटलांचा निशाणा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2023 12:48 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून ट्विट केला आहे.

मुंबई : या वर्षी राज्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. शेतीला पाणी नसल्याने पिके जगवायची कशी या विवंचनेत शेतकरी आहे. त्यात डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्याने जगायचे कसे? हा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. यामुळे डोक्यावरील कर्ज फेडण्यासाठी मराठवाड्यातील हिंगोली येथील शेतकऱ्यांनी थेट आपले अवयव विक्रीला काढले आहेत. तसेच, हे अवयव विकत घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन पाठवले आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात किडनीसाठी ७५ हजार, लिव्हरसाठी ९० हजार, डोळ्यासाठी २५ हजार किंमत लावण्यात आली आहे. यावरून विरोधकांनी राज्यातील शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी हिंगोली येथील शेतकऱ्याचा व्हिडिओ आपल्या एक्स हँडलवरून ट्विट केला आहे. राजकुमार नायक असे या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. जयंत पाटील यांनी हा व्हिडीओ शेअर करत आपली भावना व्यक्त केली आहे. जयंत पाटील म्हणाले की, हिंगोली शेतकरी राजकुमार नायक यांनी आपल्या राज्यातील शेतकऱ्यांची व्यथा कवितेतून मांडली आहे. इतकेच नवे तर असंख्य अडचणींचा सामना करत असल्याने त्यांनी आपले अवयव विक्रीला काढले असल्याचे पत्र देखील मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे. राजकुमार यांची ही कविता प्रचंड अस्वस्थ करणारी आहे. पण सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात या कवितेतून काही प्रकाश पडेल का? हा खरा प्रश्न आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, दुसरीकडे कर्जासाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असे सांगत काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी हल्लाबोल केला आहे. राज्यातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून भाजपच्या राज्यात शेतकरी देशोधडीला लागला आहे. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तर कर्ज कसे फेडायचे या विवंचनेतून अवयव विकायची तयारी दाखवली आहे. कर्जफेडीसाठी अवयव विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर यावी हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, पण राज्यातील भाजप सरकारला त्याची लाज वाटत नाही, असा घणाघाती हल्लाबोल नाना पटोले यांनी केला आहे.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलFarmerशेतकरी