शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

स्वाभिमानी शेतकरी संघटनेत पडणार उभी फूट?; राजू शेट्टींच्या भूमिकेवर मोठी नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 10:30 IST

नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात नाही अशी खंत तुपकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलून दाखवली.

प्रविण मरगळे

मुंबई – राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादीसारखे प्रमुख प्रादेशिक पक्षात फूट पडून २ गट तयार झालेत. तशीच स्थिती शेतकरी प्रश्नावर लढणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची झाली आहे. राजू शेट्टी यांच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमुळे संघटनेत नाराजीचं चित्र पाहायला मिळत आहे. कधी युती तर कधी आघाडी यामुळे पक्षातील कार्यकर्त्यांची कोंडी होत असल्याचे बोलले जात आहे.

अलीकडेच बुलढाणा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी अप्रत्यक्षपणे ही नाराजी बोलून दाखवली. नेतृत्वाने कार्यकर्त्यांचे पंख छाटू नयेत, परंतु नेतृत्वच जर कार्यकर्त्यांचे पंख छाटायला लागले तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. आपण ज्यांच्यासोबत राहतो त्याने केसाने गळा कापला तर कसं चालेल. संघटना ही कार्यकर्त्यांनी मोठी केली आहे. चळवळीतून आलेले कार्यकर्ते मेहनतीने संघटना वाढवत आहेत. परंतु नेतृत्वाकडून पाठबळ दिले जात नाही अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या बैठकीत बोलून दाखवली. परंतु मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतच काम करणार अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. मागील आठवड्यात राजू शेट्टी बुलढाणा दौऱ्यावर आले होते. परंतु त्याची कुठलीही कल्पना स्थानिक पदाधिकाऱ्यांना दिली नाही यावरून ही नाराजी असल्याचे बोलले जाते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे नाराजी आहे. ऊस आणि दूध या आंदोलनाव्यतिरिक्त इतर विषयांवर लक्ष दिले जात नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. रविकांत तूपकर हे स्वतंत्र्यपणे आंदोलन उभे करतायेत. त्यात सोयाबीन, कापूस उत्पादकांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे आंदोलन करतायेत. त्यातून संघटनेत समांतर नेतृत्व घडत असल्याने नेतृत्वाकडून रविकांत तुपकर यांना बाजूला सारण्याचे काम केले जातेय असं सांगितले गेले.

दरम्यान, बुलढाण्यात तुपकर यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला होता. तेव्हा लाठीचार्ज झाला, तणावाची स्थिती निर्माण झाली. अशावेळीही राजू शेट्टी यांनी प्रतिक्रिया देण्यास दिरंगाई केली. कुठेतरी संघटनेतच तुपकरांना डावललं जातंय अशी भूमिका निर्माण होत असल्चाची माहिती समोर येत आहे. तसेच राजू शेट्टी यांच्या बदलत्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. सदाभाऊ खोत यांचे पंख छाटले. देवेंद्र भूयार यांना बाजूला सारले. उल्हास पाटील, माणिक कदम, सयाजी मोरे, पंजाबराव पाटील, दशरथ सावंत हे संघटना सोडून दिले. हे लोकं का सोडून गेले? शेट्टी त्यांच्या मतदारसंघात पूरक अशी भूमिका घेतात. इतक्या वर्षात कापूस, सोयाबीनबाबतीत आक्रमक भूमिका घेतली नाही अशीही नाराजी कार्यकर्त्यांमध्ये आहे असं बोलले जाते.

जिल्हापातळीवर वाद, राज्यातला नाही – राजू शेट्टी

मात्र याबाबत ‘लोकमत ऑनलाइन’शी बोलताना संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी म्हणाले की, स्वाभिमानी शेतकरी संघटनेत कुठलीही नाराजी नाही. बुलढाणा जिल्हा संघटनेत हा वाद आहे. रविकांत तुपकर, प्रशांत डिक्कर यांच्यातील तो वाद आहे. मी बुलढाणा जिल्हा दौऱ्यावर येणार हे प्रत्येकाला माहिती होते. परंतु दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात जात नाहीत. नेता म्हणून मी दोघांच्या कार्यक्रमाला हजेरी लावतो. रविकांत तुपकर यांच्याही बैठकांना, कार्यक्रमांना मी हजर असतो. कार्यकर्त्यांमध्ये कुठेही नाराजी नाही. संघटनेतील अंतर्गत वाद आहे. पुढील आठवड्यात तुपकर आणि डिक्कर या दोघांना कोअर कमिटीसमोर बोलावून चर्चा केली जाईल. यातून जो काही निर्णय असेल दोघांना मान्य करावा लागेल असं शेट्टी यांनी म्हटलं.

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीRavikant Tupkarरविकांत तुपकरSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना