शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 21:06 IST

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले...

आज विधानभवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यासंदर्भात आपल्याला हळू-हळू कळेलच, आम्ही कुठेही फुटलेलो नाही, आम्ही एकत्रच आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, "आम्ही तिन्ही पक्ष बऱ्याच दिवसांनंतर एकत्र भेटलो. आमचे सर्व सहकारी, आमदार आम्ही एकत्र आलो. चांगल्या गप्पा झाल्या. यावेळी, तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, आपल्याला हळू हळू कळेलच, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोना संकटाचा सामना केला, तर हे संकट काय? ते संकट तर जगावर आलेले एक मोठे संकट होते. कुणाला काही कळत नव्हते. पण त्याचा सामना महाविकास आघाडी सरकारने केला. महाराष्ट्राला दिलासा देणे, महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा पुरविणे. अशा पद्धतीने आम्ही त्याचा सामना केला. त्यापुढे हे संकट काहीच नाही."

यावेळी, महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असे विचारले असता ठाकरे म्हणाले, आम्ही बऱ्याच दिवसांनंतर एकत्र भेटलो आहोत. आम्ही कुठेही फुटलेलो नाही. एकत्र आहोत. त्यामुळे आता पुढे काय करणार आहोत, हे जेव्हा करू, तेव्हा तुम्हाला सांगूच.

...तोवर आपल्या देशात लोकशाहीच राहील, बेबंदशाही येणार नाही -शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, "मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण कायद्यासमोब सगळे सारखेच असतात. पण त्याच वेळेला जनता सर्व काही उघड्या डोळ्याने बघत असते. न्यायदेवता आणि जनता, हे लोकशाहीचे आधारस्तंभ जोवर आपल्या देशात मजबूत आहेत. तोवर आपल्या देशात लोकशाहीच राहील बेबंदशाही येणार नाही," असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस