शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? मविआच्या बैठकीनंतर, उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2022 21:06 IST

आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ठाकरे म्हणाले...

आज विधानभवनात महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी, आगामी निवडणुकीत तिन्ही पक्ष एकत्र लढणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता, यासंदर्भात आपल्याला हळू-हळू कळेलच, आम्ही कुठेही फुटलेलो नाही, आम्ही एकत्रच आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

यावेळी पत्रकारांशी बोलताना ठाकरे म्हणाले, "आम्ही तिन्ही पक्ष बऱ्याच दिवसांनंतर एकत्र भेटलो. आमचे सर्व सहकारी, आमदार आम्ही एकत्र आलो. चांगल्या गप्पा झाल्या. यावेळी, तिन्ही पक्षांनी एकत्रित निवडणुका लढण्यासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, आपल्याला हळू हळू कळेलच, महाविकास आघाडी सरकार म्हणून आम्ही कोरोना संकटाचा सामना केला, तर हे संकट काय? ते संकट तर जगावर आलेले एक मोठे संकट होते. कुणाला काही कळत नव्हते. पण त्याचा सामना महाविकास आघाडी सरकारने केला. महाराष्ट्राला दिलासा देणे, महाराष्ट्रात चांगल्या पद्धतीने आरोग्य सुविधा पुरविणे. अशा पद्धतीने आम्ही त्याचा सामना केला. त्यापुढे हे संकट काहीच नाही."

यावेळी, महापालिका निवडणुका महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असे विचारले असता ठाकरे म्हणाले, आम्ही बऱ्याच दिवसांनंतर एकत्र भेटलो आहोत. आम्ही कुठेही फुटलेलो नाही. एकत्र आहोत. त्यामुळे आता पुढे काय करणार आहोत, हे जेव्हा करू, तेव्हा तुम्हाला सांगूच.

...तोवर आपल्या देशात लोकशाहीच राहील, बेबंदशाही येणार नाही -शिवसेनेच्या सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या प्रकरणासंदर्भात बोलताना ठाकरे म्हणाले, "मला न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, कारण कायद्यासमोब सगळे सारखेच असतात. पण त्याच वेळेला जनता सर्व काही उघड्या डोळ्याने बघत असते. न्यायदेवता आणि जनता, हे लोकशाहीचे आधारस्तंभ जोवर आपल्या देशात मजबूत आहेत. तोवर आपल्या देशात लोकशाहीच राहील बेबंदशाही येणार नाही," असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. 

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेस