शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: उद्धवसेनेनंतर आता मनसेनेही टाकला 'कॅश बॉम्ब'; PWD खात्यात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप
2
"रायगडचं चॅलेंज छ.संभाजीनगरवाल्यांनी स्वीकारावं" दानवेंच्या 'कॅश बॉम्ब'वर गोगावलेंची प्रतिक्रिया
3
आता मेड इन इंडिया चिप्स जगभरात धुरळा उडवणार; इंटेल आणि टाटा यांची हा‍तमिळवणी, प्लॅन काय?
4
एव्हिएशन क्षेत्रात मोठी मागणी! कोणत्या एअरलाइनकडे किती पायलट? संसदेत आकडेवारी सादर
5
...तर आमदारकीचा राजीनामा देईन, ब्लॅकमेल करणं अंबादास दानवेंचा धंदा; महेंद्र दळवी चांगलेच भडकले (Video)
6
तब्बल ९०० वर्ष जुनं शिव मंदिर का बनलं थायलंड अन् कंबोडियातील युद्धाचं कारण? पंतप्रधानांना सोडावी लागली खुर्ची
7
शेअर आहे की सोन्याची खाण! ५ वर्षात १ लाखांचे झाले ₹५.९६ कोटी, कोणता आहे हा स्टॉक?
8
Mahayuti: भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
9
ऐन अधिवेशनात 'कॅश बॉम्ब'! पैशांच्या गड्ड्यांसह आमदाराचा व्हिडिओ आला समोर; राजकीय वर्तुळात खळबळ
10
आधीच कंगाल झालेल्या पाकिस्तानला IMFने पुन्हा दिले अब्जावंधीचे कर्ज! अटी-नियमही केले आणखी कडक 
11
Stock Market Today: शेअर बाजारात पुन्हा मोठी घसरण, निफ्टी १०० तर सेन्सेक्स ३०० अंकानी घसरला; 'हे' शेअर्स आपटले
12
शिंदे-फडणवीसांची बंद दाराआड बैठक, महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय; नेत्यांच्या फोडाफोडीवरही चर्चा
13
IndiGo Flight Crisis: इंडिगो एअरलाइन्सच्या जखमेवर मीठ, सरकार उचलणार कठोर पाऊल!
14
सरकारी नोकरी लागताच तो प्रेम विसरला, प्रेयसीला दगा दिला; चिडलेल्या तरुणीने चांगलाच इंगा दाखवला!
15
विमान उड्डाणे रद्द! Indigo नं सरकारला दिलं उत्तर; प्रमुख ५ कारणांचा खुलासा, का आली ही वेळ?
16
Virat Kohli Deal: विराट कोहली चर्चेत... आपला ब्रँड विकून 'या' ठिकाणी करणार ४० कोटींची गुंतवणूक; कोणती आहे ही डील?
17
Nightlife: नाइट लाइफचे धिंडवडे; गोव्यातील क्लबला लागलेल्या आगीच्या घटनेचे देशात पडसाद उमटले
18
तुम्हाला शुगर किती? रक्त न काढताच कळेल, शास्त्रज्ञांनी विकसित केले ग्लुकोज सेन्सर
19
"तू माझी नाहीस, तर कुणाची होऊ देणार नाही"; गर्लफ्रेंडचं लग्न मोडण्यासाठी बॉयफ्रेंडनं केलं असं काही की…
20
लपाछपीचा खेळ आठ वर्षीय मुलाच्या बेतला जिवावर; चार दिवसांनंतर पाण्याच्या टाकीत आढळला मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस येणार एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 11:32 IST

काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

मुंबई - 2014 मध्ये शिवसेनेला मागच्या दाराने सत्तेत सामील करून घेतल्यानंतर भाजपने नेहमीच दुय्यम वागणूक दिली. तसेच आपल्या पक्ष विस्तारासाठी शिवसेनेचे अनेक ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत राज्यात नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता असून शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं हे समिकरण असणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.  

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीपासून दंड थोपटले होते. तर शिवसेनेने भाजपसोबत युती करणे पसंत केले. परंतु, उभय पक्षातून युती केल्यानंतरही एकमेकांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी बंडखोरांना बळ दिले होते. यामध्ये भाजपचे 83 तर शिवसेनेचे 65 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये बंडखोरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन कऱण्याचा डाव भाजपचा होता. परंतु, हा डाव आता त्यांच्यावर फिरताना दिसत आहे.

दरम्यान भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयारी लावली आहे. 2014 मध्ये ज्या प्रमाणे शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाले होते. आता काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.  

राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनीही असंच काहीस सांगितलं आहे. त्यांनी इशाऱ्यातून शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा सेनेला दुय्यम वागणूक दिल्यास शिवसेनेसाठी महाआघाडीसोबत जावून सत्ता स्थापन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.