शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस येणार एकत्र ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2019 11:32 IST

काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.

मुंबई - 2014 मध्ये शिवसेनेला मागच्या दाराने सत्तेत सामील करून घेतल्यानंतर भाजपने नेहमीच दुय्यम वागणूक दिली. तसेच आपल्या पक्ष विस्तारासाठी शिवसेनेचे अनेक ठिकाणी खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र या निवडणुकीत राज्यात नवीन समीकरण पाहायला मिळण्याची शक्यता असून शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस असं हे समिकरण असणार अशी शक्यता व्यक्त होत आहे.  

भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सुरुवातीपासून दंड थोपटले होते. तर शिवसेनेने भाजपसोबत युती करणे पसंत केले. परंतु, उभय पक्षातून युती केल्यानंतरही एकमेकांच्या उमेदवारांना शह देण्यासाठी बंडखोरांना बळ दिले होते. यामध्ये भाजपचे 83 तर शिवसेनेचे 65 बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात होते. यामध्ये बंडखोरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन कऱण्याचा डाव भाजपचा होता. परंतु, हा डाव आता त्यांच्यावर फिरताना दिसत आहे.

दरम्यान भाजपला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने तयारी लावली आहे. 2014 मध्ये ज्या प्रमाणे शरद पवारांनी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे शिवसेनेचे महत्त्व कमी झाले होते. आता काँग्रेसचे सचिन सावंत यांनी मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याची आघाडीची तयारी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपसोबत जायचं की, आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करायचं, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.  

राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनीही असंच काहीस सांगितलं आहे. त्यांनी इशाऱ्यातून शिवसेनेला पाठिंबा देण्यास तयार असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे भाजपने पुन्हा एकदा सेनेला दुय्यम वागणूक दिल्यास शिवसेनेसाठी महाआघाडीसोबत जावून सत्ता स्थापन करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.