शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

पुन्हा एकत्र येणार का? प्रश्नावर अजित पवार म्हणाले, '७ मे चे मतदान होऊद्या मग सांगतो'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2024 12:59 IST

Ajit pawar on Supriya sule, Sharad pawar NCP: अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या ताब्यातून घेतली खरी परंतु या दोन्ही गटांतील आरोप-प्रत्यारोप पाहता प्रकरण खूप पुढे गेले आहे, असे दिसते. परंतु, अनेकजण ही थोरल्या पवारांचीच खेळी असल्याचेही चर्चा करत आहेत.

अवघ्या देशाचे लक्ष बारामतीवर लागले आहे. शरद पवारांचे अस्तित्व संपणार की अजित पवारांचे, य़ावर चर्चा झडत आहेत. ओपिनिअन पोल धक्कादायक आहे. अजित पवारांनी राष्ट्रवादी शरद पवारांच्या ताब्यातून घेतली खरी परंतु या दोन्ही गटांतील आरोप-प्रत्यारोप पाहता प्रकरण खूप पुढे गेले आहे, असे दिसते. परंतु, अनेकजण ही थोरल्या पवारांचीच खेळी असल्याचेही चर्चा करत आहेत. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही शरद पवार भाजपशी चर्चा करत होते, असे सांगत आहेत. यामुळे लोकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. कदाचित निवडणुकीनंतर दोन्ही गट एकत्र येऊ शकतात, असेही बोलले जात आहे. यावर अजित पवारांनी मतदान होऊद्या, त्यानंतर सांगतो असे म्हटल्याने रहस्य आणखीनच वाढले आहे. 

अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील नाते ताणले गेलेले आहे. निवडणुकीपूर्वी दिवाळी दरम्यानच्या बैठका, कधी उद्योगपतीच्या घरी लपून-छपून जाणे कधी कुटुंबीयांच्या घरी भेटणे असे प्रकार होत आले आहेत. यानंतर अचानक अजित पवारांनी आक्रमक भुमिका घेत शरद पवारांनावर गंभीर आरोप केले होते. आता तर सुप्रिया सुळेंच्याच विरोधात पत्नीला उभे करत थेट आव्हान दिले आहे. राजकारणात कधी कोणा कोणाचा शत्रू किंवा मित्र नसतो, असे म्हणतात. त्याप्रमाणे राजकारण संपले की हे दोघे एकत्र आले तर काय, अशी चर्चा ही सुरु आहे. आता लोकांना दाखवतायत आम्ही भांडतोय म्हणून, विस्तवही जात नाही म्हणून आणि नंतर परत या लोकांनी भेटी-गाठी सुरु केल्या, मांडीला मांडी लावून बसले तर बिचाऱ्या मतदारांनी काय करायचे, असा सवाल जनतेत उपस्थित होत आहे. 

यातच अजित पवारांना एबीपी माझाच्या कार्यक्रमात तुम्ही दोघे परत एकत्र येणार का, असा सवाल विचारण्यात आला होता. यावर अजित पवारांनी एकदा ७ मे रोजीचे मतदान होऊ द्या, तोवर मी यावर बोलू शकत नाही असे म्हटले आहे. याचाच अर्थ त्यांनी थेट नकार कळविलेला नाही. परंतु बारामतीत वेगळाच प्रचार सुरु असल्याचे पवारांनी म्हटले आहे. आम्ही पुढे एकत्रच येणार असे सांगितले जात आहे. हा प्रकार लोकांना बुचकळ्यात टाकणारा आहे. मी जी राजकीय भूमिका घेतली त्याला मी धरुन राहणार आहे, ही भुमिका सध्या मतदार, कार्यकर्त्यांत गेली पाहिजे, असे अजित पवार म्हणाले आहेत. 

७ मे पर्यंत भावनिक व्हायचे नाही, मऊ पडायचे नाही असे मी ठरविले असल्याचेही अजित पवार म्हणाले. समोरचे उमेदवार त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत. ही लढाई भावकीची, गावकीची नाही ही देशाची लढाई आहे, असे पवार म्हणाले. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारSupriya Suleसुप्रिया सुळेbaramati-pcबारामतीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४