शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

राणे कुटुंब भाजपा सोडणार? खुद्द नारायण राणेंनी दिलं कार्यकर्ता मेळाव्यात उत्तर, म्हणाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 16:32 IST

नितेश राणे यांच्याविरोधात भाजपा-शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती

सिंधुदुर्ग - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातलं समीकरण बदललं असून सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावं लागलं आहे. निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र नितेश आणि निलेश यांनी देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता. कणकवलीतून नितेश राणे भाजपाच्या तिकिटावर निवडूनही आले. मात्र भाजपाची सत्ता येईल असं वाटत असताना राज्यात सत्तेचं वेगळेच नाट्य पाहायला मिळालं. 

यातच नारायण राणे आणि कुटुंब भाजपात राहणार का? अशी चर्चा जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात सुरु होती. त्यावर खुद्द नारायण राणे यांनी भाजपाच्या कार्यकर्ता मेळाव्यात भाष्य केलं आहे. मी आता अन्य कोणत्याही पक्षात जाणार नसून यापूर्वी दोन पक्ष बदलले, आता पक्ष बदलणार नाही. मी आणि माझे दोन्ही मुलं शेवटपर्यंत भाजपामध्येच राहतील असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. 

नारायण राणे यांनी शिवसेनेशी फारकत घेत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेस सरकारच्या काळात ते मंत्रीदेखील होते. मात्र त्यानंतर काँग्रेस नेतृत्वावर टीका करत नारायण राणेंनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. नारायण राणे यांनी नव्या राजकीय पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर राणेंनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यशही मिळविले. नारायण राणे भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार म्हणून आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात नारायण राणेंनी भाजपात प्रवेश केला. मात्र शिवसेनेने राणेंच्या भाजपा प्रवेशाला कडाडून विरोध केला होता. 

नारायण राणे यांनी निवडणुकीच्या काळात शिवसेनेच्या कोणत्याही टीकेवर उत्तर न देण्याचं ठरविले होते. नितेश राणे यांच्याविरोधात भाजपा-शिवसेनेची युती असतानाही शिवसेनेने सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती. नितेश राणेंचा पराभव करण्यासाठी शिवसेनेने अथक प्रयत्न केले मात्र यश मिळाले नाही. नितेश राणे कणकवली मतदारसंघातून निवडून आले मात्र या निमित्ताने नारायण राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष लोकांना पाहायला मिळाला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने भाजपाशी फारकत घेतल्याने नारायण राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे भविष्यात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी तीव्र होणार यात काही शंका नाही.  

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना