शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

"...यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल", रोहित पवारांनी सुचवला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 13:39 IST

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यातील युवांच्या दृष्टीने एक पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही.

मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसेच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. एवढेच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामे स्थगित करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थमंत्रालयाने घेतला आहे.

दरम्यान, नोकर भरती रद्दच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यातील युवांच्या दृष्टीने एक पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. यामध्ये कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा एज बार (age bar) होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो, असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

याचबरोबर, लॉकडाऊन शिथिल होत असतानाच परराज्यातील अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा. आजच्या संकटात कोणतेही काम कमी दर्जाचे समजू नये, असेही रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याशिवाय, कापूस शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न रोहित पवाय यांनी केला आहे. ते म्हणाले, "CCI कडून होणारी कापूस खरेदी बंद होणार नाही तर गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बाजार समित्यांकडून काही उपाययोजना केल्या जातायेत. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार असल्याचं त्यांनी सांगितले."

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर संकट ओढावले आहे. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश अर्थमंत्रालयाने दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना सुद्धा अर्थमंत्रालयाने विभागाने दिल्या आहेत. तसेच, कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थमंत्रालयाने दिले आहेत. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस