शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

"...यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल", रोहित पवारांनी सुचवला पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 13:39 IST

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यातील युवांच्या दृष्टीने एक पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही.

मुंबई : राज्यातील कोरोना व्हायरचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाऊन सुरु आहे. या लॉकडाऊनमध्ये राज्य सरकारवर आर्थिक संकट ओढावले आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठे आर्थिक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार राज्यात कुठल्याही प्रकारची नवी नोकरभरती होणार नाही. तसेच यावर्षी कुठल्याही कर्मचाऱ्याची बदली करण्यात येणार नाही. एवढेच नाही तर सध्या सुरु असलेली सर्व कामे स्थगित करण्याचा निर्णय राज्याच्या अर्थमंत्रालयाने घेतला आहे.

दरम्यान, नोकर भरती रद्दच्या निर्णयावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यातील युवांच्या दृष्टीने एक पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे. याबाबत रोहित पवार यांनी ट्विट केले आहे. यामध्ये कोरोनामुळे आलेल्या वित्तिय संकटामुळे सरकारने यंदा नोकरभरती रद्द केली, पण वयाच्या अटीमुळे अनेक युवा एज बार (age bar) होतील. त्यामुळे सरकारने भरती रद्द न करता एक वर्षासाठी मोफत सेवा/किमान वेतन द्यावे. यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल. याला युवा सहकार्य करतील, असा विश्वास वाटतो, असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे.

याचबरोबर, लॉकडाऊन शिथिल होत असतानाच परराज्यातील अनेक कामगार/मजूर स्वगृही जात आहेत. परराज्यातील या कामगारांअभावी उद्योग-व्यवसाय सुरू करण्यात अडचण येऊ शकते. पण हे कामगार परत गेल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा मराठी मुलांनी उठवावा. आजच्या संकटात कोणतेही काम कमी दर्जाचे समजू नये, असेही रोहित पवार यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.

याशिवाय, कापूस शेतकऱ्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न रोहित पवाय यांनी केला आहे. ते म्हणाले, "CCI कडून होणारी कापूस खरेदी बंद होणार नाही तर गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी बाजार समित्यांकडून काही उपाययोजना केल्या जातायेत. यामुळे शेतकऱ्यांनी घाबरुन जाऊ नये. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांचा सर्व कापूस खरेदी करणार असल्याचं त्यांनी सांगितले."

दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढविला आहे. या लॉकडाऊनमुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेवर संकट ओढावले आहे. सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीत खडखडाट आहे. त्यामुळे आरोग्याशी सोडून कुठल्याही खात्याला बांधकाम न करण्याचे आदेश अर्थमंत्रालयाने दिले आहेत. शिवाय शक्य तिथे आर्थिक तडजोड करुन, काटकसर करण्याच्या सूचना सुद्धा अर्थमंत्रालयाने विभागाने दिल्या आहेत. तसेच, कुठल्याही प्रकारची नोकरभरती न करण्याचे आदेश अर्थमंत्रालयाने दिले आहेत. 

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस