शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

देशात पेट्रोल-डिझेल बंद होणार?; जल, वायू अन् ध्वनी प्रदूषणावर नितीन गडकरींचं भाष्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 12:59 IST

सगळ्यांनी मिळून या २ समस्यांवर मात करूया ज्यामुळे लोकांचे जीवन सुखमय होईल असंही गडकरींनी सांगितले.

नागपूर - पर्यावरणासाठी मी पेट्रोल-डिझेल बंद करण्यासाठी ताकदीने लढत आहे. इलेक्ट्रिक कार, स्कूटर, रिक्षा, ई-बस आल्यात, माझ्याकडे दिल्लीत हायड्रोजनवर चालणारी कार आहे. पाण्यातून निघणाऱ्या हायड्रोजनने कार चालते. मर्सिडिजपेक्षाही चांगली धावते. माणसाचे आरोग्य बिघडवण्याचे मुख्य कारण वायू, जल आणि ध्वनी प्रदूषण आहे असं रोखठोक भाष्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे. नागपूरातील एका खासगी कार्यक्रमात गडकरी बोलत होते.

मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, लोकं हॉर्न वाजवतात. सायरन वाजवतात. या देशात नेत्यांचे लाल दिवे मीच बंद केले. फक्त पोलीस, रुग्णवाहिकांना सायरन वाजवण्याचे अधिकार आहेत. आता मी एक कायदा बनवत आहे. ज्यामुळे ते सायरनही बासरीसारखे वाजेल. जल, वायू आणि ध्वनी प्रदूषण रोखायला हवे. आता नाग नदीसाठी २४०० कोटी मंजूर झाले आहेत. आपण आपल्या शहराला जल, वायू आणि ध्वनी प्रदूषणापासून मुक्ती देऊ. हे लोकांच्या मदतीशिवाय होणार नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच आपल्या देशात रस्ते सुरक्षेसाठी खूप कार्यक्रम होतात. अमिताभ बच्चन विना मोबदला काम करतात. रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. दरवर्षी ५ लाख अपघात आणि दीड लाख मृत्यू होतात. मृतांमध्ये उच्चशिक्षित, डॉक्टर, युवकांची संख्या ६० टक्के आहे. रस्ते अपघात, पर्यावरण यासाठी आपली शिक्षण संस्था, सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेऊन समाजाचं प्रशिक्षण आणि प्रबोधनही करायले हवे असं नितीन गडकरींनी म्हटलं. 

दरम्यान, सगळ्यांनी मिळून या २ समस्यांवर मात करूया ज्यामुळे लोकांचे जीवन सुखमय होईल. त्यासाठी शिक्षण संस्थांनी पर्यावरण, रस्ते सुरक्षा यासाठी काम करावे. विशेषत: लहान मुलांना शिक्षण दिले पाहिजे. समाजानं पुढाकार घेतल्याशिवाय आपल्याला यश मिळणार नाही. नागपूरात हा कार्यक्रम मी आयोजित करत आहे. त्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. पावसाळ्याआधी ३ मीटर उंचीचे वृक्ष सर्वांनी मिळून लावावे. हवा शुद्ध झाली तर सर्वांचे आरोग्य सुधारेल, डॉक्टरांकडे जाण्याची आवश्यकता भासणार नाही. प्रत्येक वार्डात यंदा पाऊस येण्यापूर्वी ३ मीटर उंचीचे ५०० वृक्ष लावावेत. जरीपटका येथील रिंग रोडवर सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत ग्रीनरी वाढवण्याचा प्रयत्न करावा. पाणी देणे, वृक्ष वाचवणे हे काम संस्थांनी करावे असं आवाहन नितीन गडकरींनी केले.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीPetrolपेट्रोलpollutionप्रदूषण