माङया आईपासून अधिकारी काही बोध घेतील का ?

By Admin | Updated: December 10, 2014 01:47 IST2014-12-10T01:47:59+5:302014-12-10T01:47:59+5:30

माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणो स्वीकारल्या.

Will the officials take some lessons from Mother's mother? | माङया आईपासून अधिकारी काही बोध घेतील का ?

माङया आईपासून अधिकारी काही बोध घेतील का ?

बोध : निवृत्त आयएएस जोशींचा बदल्या टाळणा:यांना सवाल
यदु जोशी - नागपूर
माझी आई ग्रामसेविका होती, मग मुख्य सेविका झाली. तिच्या राज्यभरात अनेक ठिकाणी बदल्या झाल्या. त्या तिने निमूटपणो स्वीकारल्या. सगळीकडे सारखेच समजून काम केले. आजचे अधिकारी बदल्या टाळण्यावर भर देतात, याची खंत वाटते. आपल्या आईपासून कोणी याबाबत बोध घेईल का, असा आर्त सवाल माजी सनदी अधिकारी आणि राज्याचे माजी माहिती आयुक्त डॉ. सुरेश जोशी यांनी मंगळवारी केला. 
वर्षानुवर्षे मुंबई, ठाणो, पुण्यात ठाण मांडून बसलेल्या अधिका:यांच्या गडचिरोली, गोंदियासह विदर्भात आणि मराठवाडय़ात बदल्या करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवात केली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारी दिल्यानंतर डॉ. जोशी यांनी ‘लोकमत’जवळ आपली भावना व्यक्त केली.
ते म्हणाले, माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर 1959 मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या. माझी आई बदलीनिमित्त गावोगावी फिरली. चंद्रपूर, बुलडाणा, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, उस्मानाबाद, परभणी, वर्धा आदी जिल्ह्यांमधील खेडी, आदिवासी गावे तिने अक्षरश: पालथी घातली आणि समाज कल्याण केंद्रांची स्थापना केली. पगार अर्थातच तुटपुंजा होता; पण ती कार्याने भारावलेली होती आणि त्यासाठी तिने कुटुंबाचे हितही बाजूला ठेवले, अशी आठवण डॉ. जोशी यांनी सांगितली. अधिका:यांनी बदलीच्या ठिकाणी गेलेच पाहिजे. शासकीय नोकरीत बदल्या हा अविभाज्य भाग आहे आणि त्यात कोणीही टाळाटाळ करू नये, असा सल्लाही डॉ. जोशी यांनी दिला. 
 
च्सुरेश जोशी यांच्या आईच्या शेवटच्या तीन बदल्या झाल्या तेव्हा स्वत: जोशी हे आयएएस अधिकारी होते. ते 197क्चे आयएएस अधिकारी. त्यांच्या आई 1979 मध्ये निवृत्त झाल्या. 
च्माझी आई लीलाताई ग्रामसेविका झाली व नंतर 1959 मध्ये मुख्य सेविका. केंद्रीय समाज कल्याण बोर्डाच्या अध्यक्ष तेव्हा दिग्गज नेते आणि अर्थतज्ज्ञ सी. डी. देशमुख यांच्या पत्नी दुर्गाबाई देशमुख होत्या. 
च्आपल्या आईची बदली त्यांना सहज रद्द करता आली असती. पण तो विचारही आपल्या मनात तेव्हा आला नाही आणि आईने एका शब्दाने मला बदली रद्द करायला सांगितले नाही, हे सांगताना जोशी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

 

Web Title: Will the officials take some lessons from Mother's mother?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.