शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

१६ ऑक्टोबरपर्यंत राजकीय स्टेटमेंट करणार नाही; बच्चू कडूंची भूमिका, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:45 IST

मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही असं बच्चू कडू यांनी पत्रकारांना सांगितले.

नवी मुंबई – प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देणार नाही असं विधान केले आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाने राजकारणात आणखी काही उलथापालथ होणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी मी सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्न यावरील आंदोलनाशिवाय कुठलेही राजकीय स्टेटमेंट १६ ऑक्टोबरपर्यंत करणार नाही असं म्हटलं आहे.

नवी मुंबईत पनवेल येथील कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. त्याठिकाणी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. फक्त कांदा शेतकरी आणि सचिन तेंडुलकर जाहिरात प्रकरणी मी बोलेन. बाकी कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. १६ ऑक्टोबरपर्यंत आमचे राजकीय मौन आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न आहे. त्यांनी गेमिंगबाबत जी जाहिरात केली ती अतिशय वाईट आहे. एखादे मोठे नेतृत्व जुगाराची जाहिरात करते. त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत आहे. युवकांची घरे बर्बाद होत असतील त्याला आमचा विरोध आहे. सचिन तेंडुलकरबाबत आदर पण त्यांना जाहिरात करायची असेल तर भारतरत्न परत करावे आणि जाहिरात करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

तसेच सचिन तेंडुलकर यांनी जाहिरात मागे घेतली नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करून त्यांना भाग पाडू. आम्ही उद्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण देवो न देवो आम्ही आंदोलन करू असंही बच्चू कडू म्हणाले. पुण्यात अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यात कॉल्डवॉर सुरू आहे. सरकारमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला असता, मी राजकीय कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्नी बोलेन असं सांगितले.

दरम्यान, वारंवार सरकारमधील नाराजी, अजित पवारांच्या निर्णयावरून धुसपूस याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तरीही मी १६ ऑक्टोबर कुठलीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही असा निर्णय घेतला आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यावर असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही १६ ऑक्टोबरपर्यंत बोलणार नाही असा प्रतिसवाल पत्रकारांनी केला. त्यावर हे चांगले काम आहे. चांगल्या कामात अडथळा नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असं उत्तर बच्चू कडूंनी दिले. त्यामुळे नेमकं १६ ऑक्टोबरपर्यंत काय घडणार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारण