शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
2
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
3
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
4
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
5
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
6
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
7
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
8
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
9
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
10
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
11
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
12
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल
13
काहींची व्यक्तिगत पातळीवर टीका; पण जैन बांधवांनी माझं एकदाही नाव घेतलं नाही - मुरलीधर मोहोळ
14
दोन शून्य, नंतर 'मॅचविनिंग' अर्धशतक! विजयावर विराट कोहली म्हणाला- "इतकी वर्ष खेळूनसुद्धा.."
15
ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेटर्सची भररस्त्यात छेड काढणारा अकील खान ६ तासांत पोलिसांच्या ताब्यात
16
एकनाथ शिंदेंची अचानक 'दिल्ली'वारी, PM नरेंद्र मोदींची घेतली भेट; महायुतीतील मतभेदावर म्हणाले...
17
सतीश शाह यांच्या निधनानंतर आर माधवनची भावुक पोस्ट, 'या' विनोदी मालिकेत केलं होतं एकत्र काम
18
बलूच नेत्यानं केली पाक लष्करप्रमुख असीम मुनीरची पोलखोल; जगासमोर उघड झाला पाकिस्तानचा 'डबल गेम'
19
Virat Kohli: वनडे + टी-२० मध्ये सर्वाधिक धावा; कोहलीच्या डोक्यावर ताज, सचिन तेंडुलकरला टाकलं मागे
20
AUS W vs SA W : वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच असं घडलं; Alana King नं ७ विकेट्स घेत रचला इतिहास

१६ ऑक्टोबरपर्यंत राजकीय स्टेटमेंट करणार नाही; बच्चू कडूंची भूमिका, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:45 IST

मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही असं बच्चू कडू यांनी पत्रकारांना सांगितले.

नवी मुंबई – प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देणार नाही असं विधान केले आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाने राजकारणात आणखी काही उलथापालथ होणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी मी सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्न यावरील आंदोलनाशिवाय कुठलेही राजकीय स्टेटमेंट १६ ऑक्टोबरपर्यंत करणार नाही असं म्हटलं आहे.

नवी मुंबईत पनवेल येथील कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. त्याठिकाणी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. फक्त कांदा शेतकरी आणि सचिन तेंडुलकर जाहिरात प्रकरणी मी बोलेन. बाकी कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. १६ ऑक्टोबरपर्यंत आमचे राजकीय मौन आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न आहे. त्यांनी गेमिंगबाबत जी जाहिरात केली ती अतिशय वाईट आहे. एखादे मोठे नेतृत्व जुगाराची जाहिरात करते. त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत आहे. युवकांची घरे बर्बाद होत असतील त्याला आमचा विरोध आहे. सचिन तेंडुलकरबाबत आदर पण त्यांना जाहिरात करायची असेल तर भारतरत्न परत करावे आणि जाहिरात करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

तसेच सचिन तेंडुलकर यांनी जाहिरात मागे घेतली नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करून त्यांना भाग पाडू. आम्ही उद्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण देवो न देवो आम्ही आंदोलन करू असंही बच्चू कडू म्हणाले. पुण्यात अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यात कॉल्डवॉर सुरू आहे. सरकारमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला असता, मी राजकीय कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्नी बोलेन असं सांगितले.

दरम्यान, वारंवार सरकारमधील नाराजी, अजित पवारांच्या निर्णयावरून धुसपूस याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तरीही मी १६ ऑक्टोबर कुठलीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही असा निर्णय घेतला आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यावर असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही १६ ऑक्टोबरपर्यंत बोलणार नाही असा प्रतिसवाल पत्रकारांनी केला. त्यावर हे चांगले काम आहे. चांगल्या कामात अडथळा नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असं उत्तर बच्चू कडूंनी दिले. त्यामुळे नेमकं १६ ऑक्टोबरपर्यंत काय घडणार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारण