शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
3
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
4
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
6
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
7
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
8
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
9
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
10
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
11
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
12
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
13
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
14
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
15
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
16
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
17
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
18
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
19
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
20
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!

१६ ऑक्टोबरपर्यंत राजकीय स्टेटमेंट करणार नाही; बच्चू कडूंची भूमिका, काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 14:45 IST

मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही असं बच्चू कडू यांनी पत्रकारांना सांगितले.

नवी मुंबई – प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयांवर प्रतिक्रिया देणार नाही असं विधान केले आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या विधानाने राजकारणात आणखी काही उलथापालथ होणार की काय अशी चर्चा आता सुरू झाली आहे. पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू यांनी मी सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्न यावरील आंदोलनाशिवाय कुठलेही राजकीय स्टेटमेंट १६ ऑक्टोबरपर्यंत करणार नाही असं म्हटलं आहे.

नवी मुंबईत पनवेल येथील कार्यक्रमासाठी बच्चू कडू आले होते. त्याठिकाणी पत्रकारांशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, मी आजच्या दिवसानंतर १६ ऑक्टोबरपर्यंत कुठल्याही राजकीय विषयावर बोलणार नाही. फक्त कांदा शेतकरी आणि सचिन तेंडुलकर जाहिरात प्रकरणी मी बोलेन. बाकी कुठल्याही राजकीय प्रश्नाला मी उत्तर देणार नाही. १६ ऑक्टोबरपर्यंत आमचे राजकीय मौन आहे. सचिन तेंडुलकर यांना भारतरत्न आहे. त्यांनी गेमिंगबाबत जी जाहिरात केली ती अतिशय वाईट आहे. एखादे मोठे नेतृत्व जुगाराची जाहिरात करते. त्याचा प्रभाव आमच्या युवकांवर पडत आहे. युवकांची घरे बर्बाद होत असतील त्याला आमचा विरोध आहे. सचिन तेंडुलकरबाबत आदर पण त्यांना जाहिरात करायची असेल तर भारतरत्न परत करावे आणि जाहिरात करावी अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.

तसेच सचिन तेंडुलकर यांनी जाहिरात मागे घेतली नाही तर आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करून त्यांना भाग पाडू. आम्ही उद्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. सचिन तेंडुलकर यांनी स्पष्टीकरण देवो न देवो आम्ही आंदोलन करू असंही बच्चू कडू म्हणाले. पुण्यात अजित पवार चंद्रकांत पाटील यांच्यात कॉल्डवॉर सुरू आहे. सरकारमध्ये नाराजी आहे का असा प्रश्न पत्रकारांनी बच्चू कडू यांना विचारला असता, मी राजकीय कुठल्याही प्रश्नाला उत्तर देणार नाही. सचिन तेंडुलकर आणि कांदा प्रश्नी बोलेन असं सांगितले.

दरम्यान, वारंवार सरकारमधील नाराजी, अजित पवारांच्या निर्णयावरून धुसपूस याबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारले तरीही मी १६ ऑक्टोबर कुठलीही राजकीय प्रतिक्रिया देणार नाही असा निर्णय घेतला आहे असं बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितले. त्यावर असं काय कारण आहे ज्यामुळे तुम्ही १६ ऑक्टोबरपर्यंत बोलणार नाही असा प्रतिसवाल पत्रकारांनी केला. त्यावर हे चांगले काम आहे. चांगल्या कामात अडथळा नको म्हणून मी हा निर्णय घेतला आहे असं उत्तर बच्चू कडूंनी दिले. त्यामुळे नेमकं १६ ऑक्टोबरपर्यंत काय घडणार आहे अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

टॅग्स :Bacchu Kaduबच्चू कडूPoliticsराजकारण