शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही - जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2019 06:22 IST

पेरीयार रामास्वामी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याप्रकरणी माफी मागा; आव्हाड आक्रमक

ठाणे : पेरीयार रामास्वामी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वैचारिक दहशतवादी म्हणणाऱ्या रामदेवबाबांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला.देशात ज्या काळामध्ये चातुर्वर्ण्य मनुवाद्यांची वर्णव्यवस्था समाजाला पोखरत होती, त्या काळात या दोन महानायकांनी त्यांच्याविरूद्ध लढा दिला. रामदेवबाबांना बाबा कोण म्हणतं, हे मला माहीत नाही. त्यांनी माफी मागावी, असे आव्हाड म्हणाले.रामदेवबाबांचा एकेरी उल्लेख करताना आव्हाड म्हणाले, ते कोणत्या विचारांनी घडले आहेत, त्याविषयी मला देणेघेणे नाही. पण, या देशातील स्त्रिया, या देशातील तत्कालीन मनुवाद्यांनी ठरवलेला क्षुद्र वर्ग, ओबीसी, एसी, एसटी, व्हीजेएनटी, येथील कामगार, येथील आर्थिक धोरणे ही डॉ. आंबेडकर यांच्यामुळे अधोरेखित झाली. ते एका जातीचे नव्हेतर, संपूर्ण भारतीय समाजाचे होते. जे संविधान तुम्हाला आणि आम्हाला सुरक्षित ठेवते, ते बाबासाहेबांनीच दिले आहे. पेरीयार रामास्वामी यांनी जाती निर्मूलनाचे काम केले. त्यामुळेच रामदेवबाबांनी शहाणपणा दाखवून माफी मागितलेली बरी; अन्यथा त्यांना महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही, असे आव्हाड यांनी पत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBaba Ramdevरामदेव बाबा