शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना कदापि सोडणार नाही, नागपूर हिंसाचार प्रकरणी मुख्यमंत्र्यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:58 IST

शिवाय ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनाही दोषी धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई : नागपूर हिंसाचाराच्या घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला,  अशांना कबरीतून शोधून काढू. या आरोपींना कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत दिला.  सामाजिक स्वास्थ्य बिघडवले त्यांच्यावर कारवाई होईलच. शिवाय ज्यांनी अफवा पसरवल्या त्यांनाही दोषी धरले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

आज विधानसभेत २०२५-२६ च्या अर्थसंकल्पातील गृह विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. तत्पूर्वी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस यांनी नागपूर दंगल प्रकरणात राज्य सरकारने कठोर भूमिका घेतल्याचे सांगितले. नागपूरची घटना ही पूर्वनियोजित होती. नागपूर पोलिस आयुक्तांनी याबाबत वेगळे मत मांडलेले नाही. त्यांच्याकडून माहिती घेऊनच आपण सभागृहाला माहिती दिली. १९९२ नंतर नागपूरमध्ये कधीही दंगल झालेली नाही. परवाची घटना  जाणीवपूर्वक घडवून आणल्याचे लक्षात येते, असा पुनरुच्चार फडणवीस यांनी केला. 

औरंगजेबाची कबर जाळली. मात्र, त्यावर कुठेही धार्मिक मजकूर नव्हता. तरीही जाणीवपूर्वक तो जाळल्याचे संदेश फिरवले गेले. त्यामुळे या प्रकरणात विशिष्ट वेळेत कारवाई केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. 

विहिंप-बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आत्मसमर्पणऔरंगजेबाची कबर हटविण्याची मागणी करीत आंदोलन करून भावना दुखावणाऱ्या विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी कोतवाली पोलिसात आत्मसमर्पण केले. त्यांची जामिनावर सुटका झाली. आंदोलनात विहिंपचे महाराष्ट्र गोवा मंत्री गोविंद शेंडेदेखील होते. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. परंतु, त्यांनी आत्मसमर्पण केले नाही.

१९ आरोपींचा २१ मार्चपर्यंत पीसीआर मंजूरप्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी सुल्ताना एम. मैमुना यांनी मंगळवारी गणेशपेठ पोलिसांना या प्रकरणात १९ आरोपींचा २१ मार्चपर्यंत पीसीआर मंजूर केला आहे.

आरोपींविरुद्ध अतिशय गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे प्रभावी पद्धतीने तपास होण्यासाठी आरोपींना पोलिसांच्या ताब्यात देणे आवश्यक आहे, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले.  पोलिसांनी गंभीर मारहाण केली, अशी तक्रार करणाऱ्या आठ आरोपींना न्यायालयाने रुग्णालयात पाठविले. गणेशपेठ पोलिसांनी सर्व आरोपींना १८ मार्चला सायंकाळी ०७.१५ वाजता न्यायालयात हजर करून सात दिवसांचा पीसीआर मागितला. त्यानंतर मध्यरात्रीनंतर ०२.३० वाजेपर्यंत सुनावणी चालली.   

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnagpurनागपूरPoliceपोलिस