शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
2
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
3
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
4
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
5
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
6
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
7
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
8
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
9
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
10
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
11
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
12
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
13
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
14
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे
15
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
16
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
17
संभाव्य दुबार मतदारांची तपासणी करा; राज्य निवडणूक आयोगाचे मतदार याद्यांबाबत आदेश
18
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
19
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
20
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!

2029 मध्येही पुन्हा पंतप्रधान होणार नरेंद्र मोदी...? 5 वर्ष आधीच केली भविष्यवाणी, काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2024 09:53 IST

2029 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे...

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर (2024) देशात एनडीएचे सरकार स्थापन झाले असले तरी, यावेळी भाजपला पूर्ण बहुमत मिळालेले नाही. या निवडणुकीतील भाजपच्या कामगिरीसंदर्भात अजूनही चर्चा होताना दिसते. यातच आता, पाच वर्षांनंतर, म्हणजेच 2029 मध्ये देशात पुन्हा एकदा एनडीए सरकार येणार अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केली आहे. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण बहुमत मिळाले होते. 

2029 मध्येही मोदी सरकार! - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'इशाऱ्या-इशाऱ्यात' म्हटले आहे की, आपण 2029 मध्ये सलग चौथ्यांदा सत्तेत येणार आहोत. पाच वर्षांनंतर देशात पुन्हा एकदा एनडीएचेच सरकार स्थापन होईल. ते मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्टला संबोधित करत होते. यावेळी ते म्हणाले, हा पाचवा फिनटेक फेस्ट आहे आणि पाच वर्षांनंतर होणाऱ्या दहाव्या फिनटेक फेस्टसाठीही आपण येणार.

अर्थात पंतप्रधान मोदी यांनी संकेत दिले आहे की, पाच वर्षांनंतरही केंद्रात त्यांचेच सरकार असेल आणि ते पंतप्रधान म्हणून फिनटेक फेस्टमध्ये सहभागी होतील. एढेच नाही, तर आमचे बेस्ट समोर येणे अद्याप बाकी आहे, असेही मोद यांनी म्हटले आहे. भाजप नेते संबित पात्रा यांनी आपल्या एक्स अकाउंटवर PM मोदींचा यासंदर्भातील व्हिडिओ शेअर केला आहे. जो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

आणखी काय म्हणाले मोदी? -मोदी म्हणाले, आज मुंबईत ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल होत आहे. एक काळ होता, जेव्हा लोक भारतात येत आणि आपली सांस्कृतिक विविधता पाहून आश्चर्य चकित होतं. आता जेव्हा ते येतात, तेव्हा त्यांना आमची फिनटेक विविधता पाहून आश्चर्य वाटते. विमानतळावर उतरण्यापासून ते खरेदीपर्यंत सर्वत्र भारताची फिनटेक क्रांती दिसून येते. गेल्या 10 वर्षांत, फिनटेक क्षेत्रात 31 अब्ज डॉलर एवढी मोठी गुंतवणूक करण्यात आली आहे.

फिनटेक क्रांती कशी होणार? चहावाल्याला विचारले जात होते -मोदींनी भारतातील स्वस्त मोबाईल फोन, डेटा आणि झिरो बॅलन्स जनधन बँक खात्यांचा उल्लेख करत विरोधकांवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, "आपल्याला आठवत असेल, पूर्वी काही लोक संसदेत उभे राहून विचारत होते, स्वतःला अत्यंत विद्वान समजणारे लोक विचारत होते, सरस्वती जेव्हा बुद्धी वाटत होती, तेव्हा ते रस्त्यावर पहिले उभे होते. ते म्हणायचे, भारतात बँकेच्या एवढ्या शाखा, इंटरनेट आणि बँका नाहीत. एवढेच नाही तर, भारतात वीजही नाही, असेही ते म्हणत होते. ते म्हणायचे, फिनटेक क्रांती कशी होईल? आणि हे माझ्यासारख्या चहावाल्याला विचारायचे. पण आज अवघ्या एका दशकात भारतात ब्रॉडबँड वापरकर्ते 6 कोटींवरून 94 कोटी झाले आहेत. आज, 18 वर्षांच्या वरचा क्वचितच कुणी भारतीय असेल, ज्याची डिजिटल ओळख म्हणजेच आधार कार्ड नसेल. एवढेच नाही तर, गेल्या 10 वर्षात 53 कोटींहून अधिक लोक बँकिंग प्रणालीशी जोडले गेले आहेत," असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीMumbaiमुंबईBJPभाजपा