शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

मनिषा कायंदेंची आमदारकी रद्द होणार?; जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 18:47 IST

विधान परिषदेत संध्या ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार आहेत. दोघांचे संख्याबळ सारखे आहे.

मुंबई - ठाकरे गटाच्या विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिवसेना वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश घेतला. कायंदे यांचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. कारण मनिषा कायंदे यांच्या शिवसेनेतील पक्षप्रवेशाने विधान परिषदेतील ठाकरेंचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यामुळे ठाकरेंकडे असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आले आहे. 

मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केल्याने त्यांची आमदारकी जाणार का असा प्रश्न आहे. त्यावर जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम म्हणतात की, शिवसेना अधिकृत पक्ष एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. त्यामुळे विधान परिषदेचे विद्यमान आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला तरी ती अपात्रता मानली जात नाही. कारण मी शिवसेनेतच आहे, शिवसेना सोडलेली नाही असा त्यांचा युक्तिवाद असू शकतो. मात्र हा निर्णय १० व्या परिशिष्ठानुसार विधान परिषदेच्या सभापतींना घ्यायचा आहे. त्यांचा निर्णय अंतिम असतो असं त्यांनी म्हटलं. 

तसेच विधान परिषदेत संध्या ठाकरे गटाचे ९ आणि राष्ट्रवादीचे ९ आमदार आहेत. दोघांचे संख्याबळ सारखे आहे. विरोधी पक्षनेता म्हणून ठाकरे गटाला मान्यता मिळाली आहे. पण दुसऱ्या गटाने त्यावर दावा सांगितला तर विधान परिषदेच्या सभापतींना हा गुंता सोडवावा लागू शकतो. कोणाकडे बहुमत आहे हे सभापती ठरवतील असं उज्ज्वल निकम यांनी सांगितले. त्यामुळे आगामी काळात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदावरून मविआत संघर्ष पाहायला मिळू शकतो. 

अजित पवारांचे सूचक विधानमनिषा कायंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. त्यावर बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, आम्ही अजुनही विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी विचार केलेला नाही. आम्ही आता या पदासाठी विचार करणार आहे. ज्यांच्या अधिक जागा असतात त्यांना विरोधी पक्षनेते पद असते, असं सूचक विधान अजितदादांनी केलं आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारUjjwal Nikamउज्ज्वल निकम