शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 12:32 IST

राज्यातील काही पालिका हद्दीत मास-मटण विक्रीवर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत

Maharashtra Politics : आज देशभरात स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. दीडशे वर्षांच्या गुलामगिरीतून १९४७ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. तेव्हापासून आजपर्यंत भारत देश बदलत गेला. भारताने सर्वच क्षेत्रात खूप प्रगती केली. पण यंदाच्या स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात एक विषय गाजतोय. हा विषय लोकांच्या आहाराशी संबंधित आहे. मुंबई आणि आसपासच्या परिसरातील काही पालिका हद्दीत आज मांस-मटणाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. गोकुळाष्टमीचा पवित्र सण असल्याने दुकाने बंद ठेवण्याचे आदेश पालिका आयुक्त किंवा जिल्हाधिकारी अशा संबंधित अधिकाऱ्यांनी दिले आहेत. यावरून वाद सुरु आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर भाजपाकडून १९८८च्या आदेशाचा दाखल देण्यात आला असून आव्हाडांनाच प्रश्न विचारण्यात आला आहे.

भाजपाचा पलटवार

"जितेंद्र आव्हाड हे सध्या नौटंकीतही पारंगत झाले आहेत. कोणी काय खावं आणि काय खाऊ नये, हा प्रत्येकाचा व्यक्तिगत अधिकार आहे. पण हा अधिकार इतरांच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्याचा परवाना नसतो. लक्षात ठेवा, कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय हा आजचा नाही. हा निर्णय १९८८मध्ये शरद पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात झाला होता. मग आज जितेंद्र आव्हाड हे शरद पवार यांचा निषेध करणार आहेत का?" असा खरमरीत सवाल भाजपाचे नवनाथ बन यांनी विचारला.

"उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आणि स्वतः जितेंद्र आव्हाड मंत्री असताना देखील १५ ऑगस्ट, कृष्णजन्माष्टमीसह अनेक धार्मिक दिवशी कत्तलखाने बंदच होते. तेव्हा त्यांना या सगळ्याची आठवण नव्हती का? आज पवित्र कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी मटण पार्टीचे आयोजन करून त्यांनी हिंदू समाजाच्या भावनांचा अपमान केला आहे. ही केवळ असंवेदनशीलता नाही, तर जाणीवपूर्वक केलेली धार्मिक भावनांची पायमल्ली आहे," असा आरोप त्यांनी केला.

"मी जितेंद्र आव्हाड यांच्या या कृतीचा तीव्र निषेध करतो आणि त्यांना सांगतो की, धार्मिक सण-उत्सव हा अपमानाचा नव्हे, तर आदराचा विषय आहे. हिंदूंच्या श्रद्धेला धक्का देणारे प्रयोग थांबवा," असा इशाराही त्यांनी दिला.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडSharad Pawarशरद पवारBJPभाजपा