शहरं
Join us  
Trending Stories
1
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
2
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
3
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
4
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
5
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
6
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
7
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
8
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
9
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
10
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
11
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
12
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप
13
घटस्फोटाचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्यात दहा ठिकाणी सुरु होणार प्री-मॅरेज काउन्सिलिंग सेंटर
14
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
15
सात दिवस अविरत उपसले कष्ट, तेव्हा हाती लागली मौल्यवान रत्नं, मजूर महिलेचं नशीब उजळलं 
16
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
17
लग्न कधी करणार? श्रिया पिळगावकरला थेट प्रश्न; म्हणाली, "माझे आईबाबा सांगतात की..."
18
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
19
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
20
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  

हरयाणा फॅक्टरचा फायदा होणार? टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2024 11:23 IST

हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. 

कसभा निवडणुकीत मोदी करिष्म्यावर विजयाची नौका पार होईल, असा विश्वास भाजपच्या राज्यातील नेत्यांना होता; पण प्रचार सुरू झाला आणि मोदी, कलम ३७०, अयोध्येतील राम मंदिर या मुद्द्यांवरून फोकस स्थानिक मुद्द्यांवर सरकला. त्यातच ‘अब की बार चार सौ पार’च्या घोषणेने संविधान बदलणार आणि शिवाय मोदी सरकार समान नागरी कायदा आणणार असल्याने आदिवासींच्या विशेष हक्कांवर गदा येईल, असा जोरात प्रचार महाविकास आघाडीने केला आणि भाजप बॅकफूटवर गेला. केंद्रात सत्ता तर आली, पण महाराष्ट्राने महायुतीच्या पदरी निराशा टाकली. लोकसभेला हात पोळल्याने विधानसभेला सतर्क झालेल्या भाजपने मविआच्या ‘फेक नरेटिव्ह’विरुद्ध मोहीम उघडली. आता विधानसभेला हे नरेटिव्ह चालणार नाहीत, असे भाजपच्या नेत्यांचे म्हणणे आहे. 

लोकसभेला जातीय समीकरणेही भाजपच्या विरोधात गेली होती. विशेषत: मराठा समाजाने फटका दिला, ओबीसींचीही अपेक्षित मते विदर्भात मिळाली नाहीत. या समीकरणांच्या आघाडीवर भाजपने दोन-तीन महिन्यांत काही उपाय जरूर केले. लहान-लहान समाजांना विश्वासात घेण्यासाठी मोहीम राबविली. ज्यात या समाजांच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यात आल्या, त्यांचे प्रश्न जाणून घेण्यात आले. गेल्या १५-२० दिवसांत काही समाजांच्या कल्याणासाठी महामंडळे सरकारने स्थापन केली तो या मोहिमेचाच एक भाग होता. 

हरयाणातील विजयाने दिला विश्वासलोकसभेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या पाठीशी असल्याचे जाणवत नव्हते. ‘संघाची आता आम्हाला गरज नाही’ या जे. पी. नड्डा यांच्या वाक्याने संघात आणखीच नाराजी पसरली. मात्र, यावेळी संघ भाजपच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिल्याचे दिसत आहे, ही जमेची बाजू. 

बूथपासूनचा कार्यकर्ता पूर्ण ताकदीने प्रचाराला लागलाच पाहिजे यासाठीही एक मोहीम दोन महिन्यांत राबविली गेली. हरयाणात भाजपच्या विजयामुळे आता महाराष्ट्र आपण जिंकू शकतो असा विश्वास आल्याने भाजपला त्याचा फायदा होताना दिसत आहे. टीम देवेंद्र फडणवीस नव्या आव्हानासाठी सज्ज झाली आहे. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahayutiमहायुतीvidhan sabhaविधानसभा