शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

भाजपात गेलेल्या राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पितळ उघड करणार का? - धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 16:45 IST

भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

कारंजा लाड (वाशिम) : कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मंत्री राहिलेले विजयकुमार गावित, बबनराव पाचपुते, लक्ष्मण ढोबळे या नेतेमंडळीवर भ्रष्टाचाराचे आरोप सत्ताधाऱ्यांनी केले होते. या तिघांनी भाजपात प्रवेश घेताच आरोपांचे सत्र थांबविण्यात आले. संबंधितांनी खरोखरच भ्रष्टाचार केला असेल तर त्यांचे पितळ भाजपा आता उघडे पाडणार का, असा सवाल विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला. कारंजा येथील विद्याभारती महाविद्यालयासमोरच्या प्रांगणात मंगळवारी झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजपा सरकारने केलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्यांवर खुली चर्चा करायला आपण तयार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यासाठी तयार राहावे, असे आवाहनही मुंडे यांनी यावेळी केले.यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवस्वराज्य यात्रेचे प्रमुख संयोजक तथा खासदार डॉ. अमोल कोल्हे, अमोल मिटकरी, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री सुभाषराव ठाकरे, डॉ. श्याम जाधव नाईक, संतोष कोरपे, प्रकाश गजभिये, संजय खोडके, संग्राम गावंडे, महेबुब शेख, माधवराव अंभोरे, अंकुश देशमुख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मुंडे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेत लाखो विहिरी, शेततळे उभारण्यात आल्याचे सांगितले; मात्र या विहिरी कुणालाच दिसत नसल्याने त्या कदाचित गुप्त विहिरी असाव्या, ज्या केवळ भाजपाच्याच कार्यकर्त्यांना दिसतात, असा टोल मुंडे यांनी यावेळी लगावला. जलयुक्त शिवार अभियान, वृक्षलागवड योजना सपशेल अपयशी ठरली आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार ठणकावून सांगतात, की ३८ कोटी वृक्ष लावण्यात आली; परंतु हे वृक्ष भाजपाच्या पुण्यवंत कार्यकर्त्यांनाच दिसत असतील, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. याप्रसंगी उपमुख्यमंत्री अजीत पवार म्हणाले, विद्यमान सरकारच्या काळात एकट्या महाराष्ट्रात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली. त्याचे पाप भाजपा सरकारला निश्चितपणे लागणार असल्याचे अजीत पवार म्हणाले. भाजपा सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यामुळे या सरकारला आता सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आतापासूनच कंबर कसून कामाला लागावे, असे प्रतिपादन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले. समारोपीय भाषणातून त्यांनी राज्यातील युती सरकारच्या धोरणावर तिखट शब्दांत टिका केली.

टॅग्स :Dhananjay Mundeधनंजय मुंडेwashimवाशिमBJPभाजपाPoliticsराजकारण