शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
4
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल
5
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
6
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
7
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
8
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
9
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
10
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
11
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
12
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
13
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
14
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
15
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
16
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
17
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
18
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
19
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
20
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!

एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे एकत्र येणार?; शिवसेना मंत्र्यांचं सर्वात मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 10:46 IST

आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं शिरसाटांनी सांगितले.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एकदा भूकंप होणार अशा चर्चांना उधाण आलं असतानाच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्री संजय शिरसाट यांनी मोठं विधान केले आहे. दोन शिवसेना झाल्या याचं दु:ख आहे. संधी मिळाल्यास दोन्ही शिवसेना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न करणार, आता स्थिती इतकीही लांब नाही जी पुन्हा जोडू शकणार नाही असं त्यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांनी केलेले विधान आगामी राजकीय भूकंपाचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मंत्री संजय शिरसाट म्हणाले की, आजही माझ्या यातना होतात. आजही कधी उबाठा गटातील पदाधिकारी, आमदार, खासदार भेटतात, त्यांचे आणि आमचे नाते तसेच आहे. परंतु मनात जे अंतर पडलं आहे. तू त्या पक्षात, मी या पक्षात हे आवडत नाही पण त्याला करणार काय..एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोघांचे तार जुळले पाहिजे. संधी मिळाली तर मी नक्कीच दोघांना एकत्र करायचा प्रयत्न करेन. ज्यांचं तोंड पाहत नव्हता त्यांच्या तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात, ती सोडली तर माझ्याकडून १०० चूका झाल्या असतील की नाही, आमच्या चूका तुम्ही माफ केल्या पाहिजेत, तुमची चूक आम्ही माफ केली पाहिजे. जर या तारा जुळल्या तर दोन्ही शिवसेना एकत्र यायला हरकत नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच प्रयत्न एकाबाजूने करून चालत नाही. एकमेकांना अपमानित करून एकत्र आलं पाहिजे असं वाटत असेल तर ते आजच्या घडीला शक्य नाही. राज ठाकरे आणि त्यांनी एकत्र यावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. बॅनर्स लावले, उपोषण केले मात्र तरीही झाले नाही. एका कुटुंबातील व्यक्ती ते एकत्र आले नाहीत आम्ही तर फार दूर लोटले गेलोय. हे काही दिवसांचे सोबती आहेत ते जातील असं त्यांना वाटते. परंतु आज काय अवस्था हे पाहतोय. ताकद वाढवायची असेल तर एकत्र यायला हरकत नाही, पण यात पुढाकार कोण घेईल हे माहिती नाही. जर पुढाकार कुणी घेतला, विचारांची एकवाक्यता आली तर त्यात गैर काय राहणार नाही असंही मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितले. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.  

दरम्यान, दोन पाऊले मागे जाणे हा त्यावर उपाय आहे. आदित्य ठाकरे हे करू शकत नाही. आदित्यला मागचा इतिहास माहिती नाही. संघर्षाच्या काळात उद्धव ठाकरे होते. जे त्या फळीतले आहेत त्यांनी पुढाकार घेतला तर हे होऊ शकते. आजही आम्ही एकमेकांना भेटतो. विचारपूस करतो परंतु मनात भीती असते, कुणी पाहिले, कुणी बोलले तर...हे अंतर वाढत राहिले तर ते कधी जुळणार नाही. आता जोडायची स्थिती नसली तरी इतकंही लांब नाही की ते जोडू शकणार नाहीत असंही सूचक भाष्य संजय शिरसाट यांनी केले आहे.

टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाAaditya Thackerayआदित्य ठाकरे