शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 07:44 IST

२०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

मुंबई – माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वैगेर विषयच नाही. येऊच शकत नाहीत. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुटल्यानंतरही शरद पवारांच्या भेटीला गेले. तसे शिंदेंकडे गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर या संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं, ते सोडलं त्यांचे म्हणणं आहे पण हे सगळे ढोंग आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो आता राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यापूर्वी २०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळचे तथाकथित मंत्री होते जे आता गेलेत मी न सांगता बडेजाव मारत होते की, आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. तुम्हाला राजीनामा घेऊन फिरायला कुणी सांगितले? का वेळ आली होती तुमच्यावर? मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालंय आणखी काय देणार म्हणून याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं बोलून जा ना. हेच सत्य आहे असं त्यांनी म्हटलं.

राहुल गांधींचं कौतुक

बंगळुरूच्या बैठकीत मला खरेच आश्चर्य वाटलं. राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज गैरसमज जास्त होते. ते हिंदुद्वेष्टे आहेत, ते असे आहे. ते तसे आहेत. पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत. त्यांना जे काही वाटतंय ते हळूवारपणे बोलताहेत. नुसतं ऐकून घेत नाहीत तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांसमोर मांडतातसुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिले तर मला वाटतं नाही की पुढे काही अडचण येईल असं कौतुक उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे केले.

भाजपाचा पायंडा देशाला घातक

माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. कोणताही नेता आला तरी उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे बोलत नाही. शिवसेना चोरली आहे. चिन्ह चोरलं. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते. उद्धव ठाकरे ही व्यक्ती नव्हे तर बाळासाहेबांचे विचार आहेत. मोदींच्याविरोधात ही लढाई नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मला भाजपाची चिंता नाही. पण भाजपा पाडत असलेला पायंडा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे, तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझेच बनणार असं जर चालू राहिलं तर कठीण आहे. उद्या खोके येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Gandhiराहुल गांधी