शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

शिंदे गटातील आमदारांना पुन्हा पक्षात घेणार?; उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 07:44 IST

२०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.

मुंबई – माझ्याकडे येण्याची त्यांची हिंमत नाही. आले तर वैगेर विषयच नाही. येऊच शकत नाहीत. त्यांची हिंमत नाही. त्यांना माझा स्वभाव माहिती आहे. शिवसेनेची विचारधारा म्हणजेच बाळासाहेबांची विचारधारा काय आहे हे त्यांना माहिती आहे अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी शिंदे गटातील आमदारांवर निशाणा साधला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते फुटल्यानंतरही शरद पवारांच्या भेटीला गेले. तसे शिंदेंकडे गेलेले आमदार तुम्हाला भेटण्यासाठी आले तर या संजय राऊतांच्या प्रश्नावर ठाकरेंनी स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी बाळासाहेबांचे विचार सोडले, हे सोडलं, ते सोडलं त्यांचे म्हणणं आहे पण हे सगळे ढोंग आहे. राष्ट्रवादीला कंटाळून आम्ही बाहेर पडलो आता राष्ट्रवादीच्या म्हणजे अजित पवारांच्याच हातात राज्याच्या तिजोरीच्या चाव्या गेलेल्या आहेत. त्यापूर्वी २०१४ ते २०१९ यामध्ये सत्ता होती तेव्हा या महाशयांनी भाजपाबरोबर कसं बसायचं? असं म्हणत मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळचे तथाकथित मंत्री होते जे आता गेलेत मी न सांगता बडेजाव मारत होते की, आम्ही खिशात राजीनामे घेऊन फिरतो. तुम्हाला राजीनामा घेऊन फिरायला कुणी सांगितले? का वेळ आली होती तुमच्यावर? मला आता सुखाचा वीट आलाय, सगळं मिळालंय आणखी काय देणार म्हणून याच्या पलीकडे जाऊन मी काहीतरी मिळवतोय असं बोलून जा ना. हेच सत्य आहे असं त्यांनी म्हटलं.

राहुल गांधींचं कौतुक

बंगळुरूच्या बैठकीत मला खरेच आश्चर्य वाटलं. राहुल गांधींना यापूर्वी मी तसा भेटलेलो नाही. पण आतापर्यंत त्या लोकांनी करून दिलेले जे समज गैरसमज जास्त होते. ते हिंदुद्वेष्टे आहेत, ते असे आहे. ते तसे आहेत. पण प्रत्यक्ष भेटल्यानंतर मला असं वाटलं की राहुल गांधी समजून घेताहेत, ऐकताहेत. त्यांना जे काही वाटतंय ते हळूवारपणे बोलताहेत. नुसतं ऐकून घेत नाहीत तर त्यावर पुढे ती सूचना ते सगळ्यांसमोर मांडतातसुद्धा. अशा पद्धतीनेच जर का हे पुढे सुरू राहिले तर मला वाटतं नाही की पुढे काही अडचण येईल असं कौतुक उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींचे केले.

भाजपाचा पायंडा देशाला घातक

माझ्याविरोधात अख्खा भाजपा आहे. कोणताही नेता आला तरी उद्धव ठाकरेंशिवाय दुसरे बोलत नाही. शिवसेना चोरली आहे. चिन्ह चोरलं. माझे वडील चोरण्याचा प्रयत्न करत आहात. तरीदेखील उद्धव ठाकरेंची भीती वाटते. उद्धव ठाकरे ही व्यक्ती नव्हे तर बाळासाहेबांचे विचार आहेत. मोदींच्याविरोधात ही लढाई नाही तर हुकुमशाहीच्या विरोधात आहे. मला भाजपाची चिंता नाही. पण भाजपा पाडत असलेला पायंडा देशाला घातक ठरणारा आहे. तो पायंडा म्हणजे, तुम्ही मत कोणालाही द्या, सरकार माझेच बनणार असं जर चालू राहिलं तर कठीण आहे. उद्या खोके येतील, बंदुका घेऊन येतील आणि कोणीही देशाचा पंतप्रधान आणि राज्याचा मुख्यमंत्री होईल असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेRahul Gandhiराहुल गांधी