शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील का?; BJP प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 14:57 IST

२०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलायचं कारणच नाही. नितीश कुमार कमी जागेवर निवडून आले तरीही त्यांना मुख्यमंत्री बनवले असं बावनकुळे म्हणाले.

मुंबई - राज्याच्या राजकारणात मागील जून महिन्यात सत्तांतर झाले. अनपेक्षितपणे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करताच सर्वांनाच धक्का बसला. त्यानंतर काही वेळात फडणवीस हे उपमुख्यमंत्री होतील असं कळताच भाजपा नेतेही अवाक् झाले. मागे भाषणात बोलतानाही चंद्रकांत पाटील यांनी ही खंत बोलून दाखवली होती. काळजावर दगड ठेऊन मुख्यमंत्रिपद एकनाथ शिंदे यांना दिले. त्यामुळे २०२४ च्या निवडणुकीनंतर काय होणार असा प्रश्न सर्वांनाच आहे. 

याच प्रश्नाचं उत्तर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी थेट देणे टाळले, ते म्हणाले की, एकनाथ शिंदे आज मुख्यमंत्री आहेत. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत. उद्या राजकारणात लोकं काय ठरवतील? आमचे नेते काय ठरवतील? शेवटी नेतृत्व ठरवतं. फडणवीस उपमुख्यमंत्री होतील हा निर्णय नेतृत्वाने घेतला. मान्यच केला. उद्या जर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील असं नेतृत्वाला वाटलं तर ते निर्णय घेतील. २०२४ चं आता काय ठरले नाही. निवडणुकीनंतर काय होईल याबाबत चर्चा नाही असं त्यांनी स्पष्ट सांगितले. 

त्याचसोबत आमचे नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह हे निर्णय घेतील. २०२४ च्या निवडणुकीनंतर काय होईल यावर काहीच भाष्य करता येत नाही. २०२४ पर्यंत मुख्यमंत्री बदलायचं कारणच नाही. नितीश कुमार कमी जागेवर निवडून आले तरीही त्यांना मुख्यमंत्री बनवले. कुठल्याही पक्षाला वाटतं आपला मुख्यमंत्री असावा. देवेंद्र फडणवीस यांना देशाचे व्हिजन आहे. महाराष्ट्र कशारितीने एक नंबरवर आणता येईल याची क्षमता देवेंद्र फडणवीस यांच्यात आहेत. त्यांनी ५ वर्ष काम केले आहे. आज फडणवीस-शिंदे जोडी महाराष्ट्राला पुढे घेऊन जातेय असंही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं. ABP ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते बोलत होते. 

एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकमहाराष्ट्राच्या राजकारणात १८ तास काम करणारा अत्यंत चांगला कार्यकर्ता, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाजातील शेवटच्या घटकाला देण्याचा प्रयत्न करतायेत. दोन-अडीच तास झोपतात. मला आश्चर्य वाटते. जनतेतील कार्यकर्ता आणि दुसरीकडे प्रचंड व्हिजन असलेला नेता हे दोघेही एकत्र आले. हे दोन्ही नेते मनाने खूप मोठे आहेत. दोघेही एकमेकांचे निर्णय कधीही थांबवत नाहीत. २०२४ नंतर मी काय सांगू शकणार नाही. मुख्यमंत्री आपला असायला हवा असे प्रत्येक पक्षाला वाटते. हे वाटणे काही गैर नाही असंही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे