शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

भविष्यात फडणवीस-ठाकरे पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी चर्चेला दिला पूर्णविराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 11:14 IST

विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो असं राऊतांनी सांगितले.

मुंबई - विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचं चित्र महाराष्ट्राला पाहायला मिळालं. विधानभवनाच्या गेटपासून पायऱ्यांपर्यंत हे दोन्ही नेते एकत्रित संवाद करत येताना पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या. त्यामुळे भविष्यात ठाकरे-फडणवीस पुन्हा एकत्र दिसू शकतात अशी राजकीय चर्चा सुरू झाली. त्यात मालेगावच्या सभेत उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना फटकारल्यामुळे या चर्चेला आणखी वाव मिळाला. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. 

खासदार संजय राऊत म्हणाले की, मला लोकसभेच्या लॉबीत अनेकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि जेपी नड्डा यांना भेटतात. रस्ता एकच असतो. विधानभवन असेल किंवा संसद इथं सत्ताधारी-विरोधक यांच्यासाठी एकच रस्ता असतो. अद्यापतरी देशात सत्ताधारी आणि विरोधकांसाठी वेगवेगळे रस्ते तयार झाले नाहीत. ज्यांना हवे असेल ते करू शकतात. त्यामुळे फडणवीस-ठाकरे भेट हा विषय नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच विधानभवनात जाताना उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकत्रित पुढे आले, संवाद करत विधानभवनाच्या पायऱ्यांपर्यंत गेले याचा अर्थ ते एकत्र येतील असं नाही. फडणवीस आणि ठाकरेंच्या वाटा अजिबात एकत्र येणार नाहीत, हे मी सांगतोय असं सांगत ठाकरे गटाचे खासदार आणि मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. 

फडणवीस-ठाकरे भेटीचीच चर्चा, काय घडलं?अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधान परिषदेचे सदस्य असलेले उद्धव ठाकरे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर गाडीतून उतरले. ठाकरे गटाचे काही आमदार त्यांना घ्यायला आले होते. त्यांच्याशी ते बोलत असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ताफा आला. ते गाडीतून उतरले तर समोर उद्धव ठाकरे. दोघांनी स्मित हास्य केले. नमस्कार झाला आणि त्यांनी बोलत बोलत विधानभवनात एन्ट्री केली. 

आठ महिन्यांपासून या दोन्ही नेत्यांमध्ये साधी भेटही होऊ शकली नव्हती. मात्र त्यानंतर पहिल्यांदाच झालेल्या भेटीत सहजता होती.  कटूतेचा लवलेशही नव्हता. दोघेही हसत बोलत असतानाचे छायाचित्र टिपण्यासाठी कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सची एकच झुंबड उडाली होती. त्यानंतर काही वेळाने उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. तेव्हा आमच्या भेटीचा वेगळा अर्थ काढू नका. पूर्वी खुलेपणा होता. पण, हल्ली बंद दाराआड होणारी चर्चा अधिक फलदायी ठरते, असं म्हटलं.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊत