शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा नारायण राणे आठवडाभरात घेणार निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 20:15 IST

काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

मुंबई - काँग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करणारे नारायण राणे आता भाजपाकडून राज्यसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. त्यामुळे आता राणेंनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भविष्याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे काय करायचे याचा निर्णय आपण येत्या आठवडाभरात घेऊ, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.  खासदारपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या राणेंकडे स्वाभिमान पक्षाच्या भवितव्याविषयी विचारणा करण्यात आली."महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या भवितव्याविषयी मी माझ्या समर्थकांशी चर्चा करणार आहे. सर्वांशी चर्चा करून झाल्यावर आठवडाभरात मी पक्षाबाबत निर्णय घेईन.", असे राणेंनी सांगितले. यावेळी राज्यसभेची उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे आभार मानले. काँग्रेसमध्ये असंतुष्ट असलेल्या नारायण राणे यांनी गतवर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापन केला होता. त्यानंतर त्यांनी आपल्या पक्षाला राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला होता. सुरुवातीला नारायण राणे राज्यसभेवर जाण्यासाठी फारसे उत्सुक नव्हते. मात्र, भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले. काही दिवसांपूर्वी  नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्विटमुळे राणे यांना राज्यसभेची ऑफर अमान्य असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र  भाजपाने त्यांचे मतपरिवर्तन करण्यात यश मिळवले होते. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे BJPभाजपाPoliticsराजकारणMaharashtraमहाराष्ट्र