शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेवर काँग्रेस देणार वेगळा चेहरा?; कदम, जगताप यांची मुदत संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 08:17 IST

डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 

- मनोहर कुंभेजकरमुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा घोळ एकीकडे  कायम असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सदस्यांची निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भाई जगताप हे विधान परिषद आमदार असून सध्या ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्याऐवजी त्यांच्यावर पालिका निवडणुकीची जबाबदारी कायम ठेवण्याकडे पक्षाचा कल असल्याचे समजते. तसेच त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर  माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, डॉ. अमरजीत सिंह मनहास, माजी मंत्री नसीम खान, मधू चव्हाण, सचिन सावंत यांच्यापैकी एका नावाचा विचार होऊ शकतो, असे वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणूक ही भाई जगताप यांची कठोर परीक्षा घेणारी ठरणार आहे. मुंबई काँग्रेसमध्ये पदनियुक्त्या करताना बराच गोंधळ झाला. शिवाय, कापाकापीच्या  राजकारणात प्रामाणिक पदाधिकारी बाहेर राहिल्याने पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या २५ जागाही येणे कठीण असल्याचे विधान काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने केले आहे. गटबाजीच्या तक्रारीकाँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी संवाद साधणे कार्यकर्त्यांना कठीण जाते. त्यातच, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सोनल पटेल व आशिष दुआ यांच्याकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेतच. शिवाय, गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किमान एसईओ हे पदही मिळाले नाही, त्याबद्दलही नाराजी आहे.

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेसRamdas Kadamरामदास कदम