शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

विधान परिषदेवर काँग्रेस देणार वेगळा चेहरा?; कदम, जगताप यांची मुदत संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2021 08:17 IST

डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. 

- मनोहर कुंभेजकरमुंबई : विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा घोळ एकीकडे  कायम असतानाच आता स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायच्या सदस्यांची निवडणूकही लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिसेंबर महिन्यात रामदास कदम (शिवसेना) आणि भाई जगताप (काँग्रेस) यांची विधान परिषदेची मुदत संपल्यावर त्यांना पुन्हा संधी मिळणार का, याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. भाई जगताप हे विधान परिषद आमदार असून सध्या ते मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. त्यांना पुन्हा संधी देण्याऐवजी त्यांच्यावर पालिका निवडणुकीची जबाबदारी कायम ठेवण्याकडे पक्षाचा कल असल्याचे समजते. तसेच त्यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर  माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, डॉ. अमरजीत सिंह मनहास, माजी मंत्री नसीम खान, मधू चव्हाण, सचिन सावंत यांच्यापैकी एका नावाचा विचार होऊ शकतो, असे वरिष्ठ नेत्याने स्पष्ट केले. मुंबई महापालिका निवडणूक ही भाई जगताप यांची कठोर परीक्षा घेणारी ठरणार आहे. मुंबई काँग्रेसमध्ये पदनियुक्त्या करताना बराच गोंधळ झाला. शिवाय, कापाकापीच्या  राजकारणात प्रामाणिक पदाधिकारी बाहेर राहिल्याने पालिका निवडणुकीत काँग्रेसच्या २५ जागाही येणे कठीण असल्याचे विधान काँग्रेसच्या एका माजी मंत्र्याने केले आहे. गटबाजीच्या तक्रारीकाँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांच्याशी संवाद साधणे कार्यकर्त्यांना कठीण जाते. त्यातच, पक्षाचे राष्ट्रीय सचिव सोनल पटेल व आशिष दुआ यांच्याकडूनही फारसे सहकार्य मिळत नसल्याच्या तक्रारी आहेतच. शिवाय, गटबाजीला प्रोत्साहन देत असल्याच्या तक्रारी आहेत. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना किमान एसईओ हे पदही मिळाले नाही, त्याबद्दलही नाराजी आहे.

टॅग्स :bhai jagtapअशोक जगतापcongressकाँग्रेसRamdas Kadamरामदास कदम