शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

Maharashtra Election 2019; गडकिल्ल्यांवर छम छम वाजवणार का ? शरद पवारांची सरकारवर टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:42 IST

अकलूज येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणात आयोजित राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या प्रचार सभेत पवार बोलत होते.

ठळक मुद्देभाजपच्या राज्यात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली - शरद पवार१०० ते २०० श्रीमंतांनी ८१ हजार कोटी कर्जे घेऊन थकविल्याने बँका अडचणीत आल्या - शरद पवारया सरकारला शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत - शरद पवार

सोलापूर/ अकलूज : भाजप सरकार महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या किल्ले गडावर पर्यटनाच्या माध्यमातून हॉटेल काढून शिवरायांच्या इतिहासकालीन किल्ले गडावर छम छम वाजवणार का? असा सवाल करीत इतिहास जतन करायचे सोडून हे सरकार वेगळंच काही करून महाराष्ट्राला अपमानित करीत आहे, अशी टीका राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी केली. 

अकलूज येथील श्रीराम मंदिराच्या पटांगणात आयोजित राष्ट्रवादी काँॅग्रेसच्या प्रचार सभेत पवार बोलत होते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात, आमच्याबरोबर कुस्ती लढायला कोणी तयार नाहीत. परंतु आपण कुस्ती परिषदेचे अध्यक्ष असून, नवीन पैलवान तयार करतो. चिंतेचे वातावरण नाही तर मोदी, शहांसह भाजपच्या इतर राज्यातील मुख्यमंत्री महाराष्ट्रात का येत आहेत. 

भाजपच्या राज्यात १६ हजार शेतकºयांनी आत्महत्या केली आहे. त्या सर्व शेतकºयांची कुटुंबं उद्ध्वस्त झाली आहेत. १०० ते २०० श्रीमंतांनी ८१ हजार कोटी कर्जे घेऊन थकविल्याने बँका अडचणीत आल्या आहेत. सरकारने रिझर्व्ह बँकेकडून घेऊन ते पैसे भरले. परंतु या सरकारला शेतकºयांचे कर्ज माफ करण्यासाठी पैसे नाहीत. सर्वसामान्यांना मात्र कर्ज थकितासाठी नोटिसा पाठवतात, असे ते म्हणाले.यावेळी सुभाष पाटील, डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील, आ. रामहरी रूपनवर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. 

पाच वर्षांत काय दिवे लावले हे सांगा- शेतकरी आत्महत्या, आर्थिक मंदी, बेरोजगारीचा प्रश्न असताना राज्यकर्ते धनदांडग्यांच्या हिताची धोरणे राबवित आहेत. काँग्रेस-राष्टÑवादीच्या कार्यकाळात काय केलं विचारणाºया भाजपवाल्यांनी तुम्ही काय दिवे लावलेत हे सांगावे. सत्ता तुमची आहे, काय केलं सांगण्याची जबाबदारी तुमचीच असल्याचे सांगत राष्टÑवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजप-शिवसेना युती सरकारवर टीकास्त्र सोडले. 

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवारBJPभाजपाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmalshiras-acमाळशिरस