शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

अजित पवार किंग बनणार की किंगमेकर?; आमदार अपात्र झाल्यास विधानसभेचं गणित बदलणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 15:08 IST

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकीय सत्तानाट्यात २ वर्षात २ मोठं बंड झाले. २० जून २०२२ ला शिवसेना आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात ४० आमदारांनी पक्षाचे नेतृत्व उद्धव ठाकरेंविरोधात बंड केले. त्यामुळे ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावं लागले. शिवसेनेच्या या आमदारांनी भाजपासोबत एकत्र येत राज्यात सरकार बनवलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. परंतु त्यानंतर पुढच्या १ वर्षात पुन्हा मोठं बंड झाले. ते म्हणजे अजित पवारांनी काका शरद पवारांची साथ सोडून भाजपा-शिंदेसोबत सरकारमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. २ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी महायुतीच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. 

अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या ४० आमदारांनी सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला तेव्हापासून मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा सुरू झाली आहे. आता राज्याच्या राजकारणात नवीन वळण आजच्या निकालाने लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात जर विधानसभा अध्यक्षांनी एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांना अपात्र ठरवले तर नवीन मुख्यमंत्री कोण असणार? विधानसभेच्या जागांचे समीकरण कसे असेल? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे एकूण २८६ आमदार आहेत, त्यात बहुमतासाठी १४४ आमदारांचे पाठबळ हवे. जर शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरले तर आमदारांची संख्या २७० इतकी होईल. अशावेळी बहुमतासाठी १३६ आमदारांची गरज भासेल. 

केवळ भाजपा, शिंदे गट आणि अजित पवार यांच्या आमदारांची संख्या सध्या १८५ इतकी आहे. भाजपाकडे १०४, अजित पवारांकडे ४१ तर शिवसेना शिंदे गटाकडे ४० आमदार आहेत. १६ आमदार अपात्र घोषित केले तर शिंदे गटाकडे २४ आमदारांचे संख्याबळ राहील. त्यामुळे सरकारचा नंबर गेम १६९ आमदारांवर येईल जे बहुमताच्या १३६ आमदारांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे आमदार अपात्र झाले तरी महायुतीच्या सरकारला कुठलाही धोका नाही. परंतु त्यामुळे सरकारमध्ये नेतृत्व बदल होणार हे निश्चित आहे. अपात्र झाल्यानं एकनाथ शिंदेंना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर पुन्हा विधिमंडळ नेता निवडावा लागणार. नवीन सरकार स्थापन करण्याच्या हालचाली पुन्हा वेगाने होणार अशावेळी अजित पवारांना संधी मिळेल का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. 

अजित पवारांच्या हाती कमान जाणार?अजित पवार जेव्हापासून या सरकारमध्ये सहभागी झालेत तेव्हापासून ते मुख्यमंत्री होतील अशी विधाने समोर येत आहेत. बहुमतात असतानाही भाजपाला अजित पवारांची गरज का पडली? शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री बनवतील अशी चर्चा होऊ लागली. आता जेव्हा विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्रतेचा निकाल सुनावणार आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अजित पवार मुख्यमंत्री बनणार की केवळ किंगमेकर राहणार या प्रश्नाचे उत्तर मिळणार आहे. राजकीय परिस्थिती बदलली तर अजित पवार किंगमेकर बनून पुढे येतील. सरकारकडे १६९ आमदारांचे पाठबळ राहील त्यात अजित पवारांचे ४० आमदार आहेत. त्यामुळे अजित पवारांच्या पाठिंब्याशिवाय सरकार टिकणं कठीण होईल. सत्ता वाचवण्यासाठी आणि बहुमत टिकवण्यासाठी भाजपाला अजित पवारांची गरज भासेल. अशावेळी अजित पवारांना मुख्यमंत्री करणे भाजपासाठी सोयीचे ठरेल. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाAjit Pawarअजित पवारBJPभाजपाEknath Shindeएकनाथ शिंदे