शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

कोळशाचा स्टॉक का केला नाही? शरद पवार यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2017 03:23 IST

कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते.

मुंबई : कोळसा टंचाईमुळे भारनियमन करावे लागत असल्याचे सरकार सांगत आहे. पण मी २२ आॅगस्ट रोजीच केंद्र सरकारला पत्र पाठवून पावसापूर्वीच कोळशाचा स्टॉक करण्यास सांगितले होते. पण सरकारने त्यावर काहीच निर्णय घेतला नाही, असे सांगत नियोजनाअभावीच राज्यात आठ-आठ तासांचे भारनियमन सुरू असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला.राष्ट्रवादीच्या लीगल सेलने आयोजित केलेल्या अधिवक्ता परिषदेत पवार बोलत होते. ते म्हणाले, भाजपाच्या काळात शेतकरी आत्महत्यांचा ग्राफ वाढत आहे. सरकार कर्जमाफीसाठी आॅनलाइन पद्धतीने २० कॉलमचा फॉर्म भरण्याची सक्ती करत आहे. एखाद्या लहानशा चुकीमुळेसुद्धा शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे पवार म्हणाले.कुठे आहे दिवाळी?पंतप्रधान म्हणतात, १५ दिवस आधीच दिवाळी आली. पण ती कुठेच कशी दिसत नाही, असा सवाल करून खा. पवार म्हणाले, जीएसटीसाठी काँग्रेसच्या काळात पंतप्रधान मनमोहन सिंग यांना सांगून मी सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक घेण्यास सांगितले होते. त्या वेळी गुजरातचे मुख्यमंत्री असलेले नरेंद्र्र मोदी यांनी जीएसटीच्या विरोधात सर्वांत जास्त आक्रमक भाषण केले होते. आज त्यांनीच जीएसटीचा कर २८ टक्क्यांवर नेला, अशी टीका पवार यांनी केली.अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी : आज तरुणांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होताना दिसत आहे. सोशल मीडियावर व्यक्त होणाºयांचे मूलभूत अधिकार नोटिसा पाठवून दाबले जात आहेत. लोकांच्या मूलभूत अधिकारांच्या रक्षणासाठी वकिलांनी पुढे यावे, असेही पवार म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारBJPभाजपाNational Congress Partyनॅशनल काँग्रेस पार्टी