शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

अटलजींचे होते; मग बाळासाहेब ठाकरेंचे का नाही ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 12:06 PM

सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्या आयोध्या दौऱ्यावर केली होती.

मुंबई - मुंबईतील शिंपोली, बोरिवली पश्चिम येथे 'अटल स्मृती उद्याना'चे गुरुवारी लोकार्पण झाले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ अटल स्मृती हे उद्यान उभारण्यात आले आहे. रेकॉर्डब्रेक वेळेत या उद्यानाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे अटलजींच्या स्मर्णार्थ अटल स्मृती उद्यानाची निर्मिती वेगाने होऊ शकते, तर मग शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाला उशीर का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

अटल स्मृती या उद्यानाचे नुकतेच लोकार्पण झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे या लोकर्पण सोहळ्याला खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी शिवसेना आक्रमक आहे. परंतु, मागील साडेचार वर्षे सत्तेत असून देखील शिवसेनेला स्मारक उभारता आले नसल्याची टीका शिवसेनेवर करण्यात येते. त्यातच आता अटलजी यांच्या निधनानंतर काही दिवसांतच अटल स्मृती या उद्यानाचे लोकर्पण करण्यात आले आहे.

१६ ऑगस्ट २०१८ रोजी अटलजी यांचे निधन झाले होते. त्यानंतर रेकॉर्डब्रेक वेळेत अटलजी यांच्या स्मृतीप्रित्यार्थ उद्यान उभारण्यात आले. उद्यान उभारण्यात आलेल्या जागेवर १५ वर्षांपूर्वी कचरा टाकण्यात येत होता. त्याच ठिकाणी आता उद्यान उभारण्यात आले आहे. आभासी वास्तविकता, अटलजींशी संवाद, होलोग्राम तंत्रज्ञान, भित्तिचित्र, शिल्प, अणुचाचणी, कारगील युद्धातील बंकर, भारतीय संविधानाच्या डीजीटल वाचनाची सुविधा अशा अनेक वैशिष्ट्यांचा उद्यानात समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान बाळासाहेब ठाकरे यांचे निधन १७ नोव्हेंबर २०१२ रोजी झाले होते. याला सहा वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असून यापैकी साडेचार वर्षे शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत आहे. तसेच मुंबईत देखील शिवसेनेची सत्ता आहे. तरी देखील बाळासाहेबांच्या स्मारकाला उशीर का, याचं उत्तर शिवसैनिक शोधत आहेत.

याआधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर उभारणीच्या मुद्दाला हात घातला होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव यांनी शिवसेना नेत्यांना घेऊन आयोध्या दौरा केला होता. त्यावेळी उद्धव यांच्यावर विरोधकांनी जोरदार टीका केली होती. सत्तेत असून आपल्या वडिलांचे स्मारक उभारता आले नाही, आणि राममंदिर बांधायला निघाले, अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उद्धव यांच्यावर केली होती. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचा मुद्दा चर्चेत आला होता.