शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:09 IST

Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. तसेच या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच कोकणातील जनतेलाही राज ठाकरेंनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

राज ठाकरे जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हणाले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून. आजच्या जागर यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासियांचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सातत्यानं कंत्राटं काढायची. त्यातून बिलं घ्यायची आणि खड्डे तसेच ठेवायचे हे चक्र वर्षांनुवर्षे सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीला कुठलातरी भावनिक मुद्दा काढला जातो आणि त्या भावनेच्या भारात मतदान केलं जातं.

हा रस्ता रखडण्यामागचं सुरू असलेलं सर्वात मोठं कारण म्हणजे येथे होणारे जमिनीचे व्यवहार हे आहे. येथील कोकणी माणसांच्या जमिनी ह्या कवडीमोल दरानेव विकत घेतल्या जात आहेत. जेव्हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा ह्या जमिनींची शंभरपट भावाने व्यापाऱ्यांना विक्री केली जाईल. त्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक रस्ता चांगला झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव कसे वाढतात हे समजून घ्या. मी तुम्हाला हात जोडून आवाहन करतो की जमिनी विकू नका. आज ना उद्या कधीतरी रस्ता होईल. तेव्हा त्याची किंमत तुम्हालाच मिळेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhighwayमहामार्ग