शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:09 IST

Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. तसेच या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच कोकणातील जनतेलाही राज ठाकरेंनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

राज ठाकरे जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हणाले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून. आजच्या जागर यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासियांचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सातत्यानं कंत्राटं काढायची. त्यातून बिलं घ्यायची आणि खड्डे तसेच ठेवायचे हे चक्र वर्षांनुवर्षे सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीला कुठलातरी भावनिक मुद्दा काढला जातो आणि त्या भावनेच्या भारात मतदान केलं जातं.

हा रस्ता रखडण्यामागचं सुरू असलेलं सर्वात मोठं कारण म्हणजे येथे होणारे जमिनीचे व्यवहार हे आहे. येथील कोकणी माणसांच्या जमिनी ह्या कवडीमोल दरानेव विकत घेतल्या जात आहेत. जेव्हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा ह्या जमिनींची शंभरपट भावाने व्यापाऱ्यांना विक्री केली जाईल. त्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक रस्ता चांगला झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव कसे वाढतात हे समजून घ्या. मी तुम्हाला हात जोडून आवाहन करतो की जमिनी विकू नका. आज ना उद्या कधीतरी रस्ता होईल. तेव्हा त्याची किंमत तुम्हालाच मिळेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhighwayमहामार्ग