शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
6
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
7
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
8
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
9
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
10
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
11
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
12
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
13
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
14
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
15
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
16
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
17
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
18
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
19
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
20
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:09 IST

Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. तसेच या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच कोकणातील जनतेलाही राज ठाकरेंनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

राज ठाकरे जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हणाले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून. आजच्या जागर यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासियांचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सातत्यानं कंत्राटं काढायची. त्यातून बिलं घ्यायची आणि खड्डे तसेच ठेवायचे हे चक्र वर्षांनुवर्षे सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीला कुठलातरी भावनिक मुद्दा काढला जातो आणि त्या भावनेच्या भारात मतदान केलं जातं.

हा रस्ता रखडण्यामागचं सुरू असलेलं सर्वात मोठं कारण म्हणजे येथे होणारे जमिनीचे व्यवहार हे आहे. येथील कोकणी माणसांच्या जमिनी ह्या कवडीमोल दरानेव विकत घेतल्या जात आहेत. जेव्हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा ह्या जमिनींची शंभरपट भावाने व्यापाऱ्यांना विक्री केली जाईल. त्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक रस्ता चांगला झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव कसे वाढतात हे समजून घ्या. मी तुम्हाला हात जोडून आवाहन करतो की जमिनी विकू नका. आज ना उद्या कधीतरी रस्ता होईल. तेव्हा त्याची किंमत तुम्हालाच मिळेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhighwayमहामार्ग