शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

मुंबई-गोवा महामार्गाचं काम का रखडलं? नेमकं कारण सांगत राज ठाकरेंचा कोकणवासियांना सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 20:09 IST

Raj Thackeray: मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचं रखडलेलं काम आणि रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांमुळे राजकारण पेटलं आहे. आता राज ठाकरे आणि मनसेने मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरवस्थेवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेने महामार्गाच्या प्रश्नावरून आज जागर यात्रा काढली. तसेच या यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना राज ठाकरे यांनी महामार्गाच्या रखडलेल्या कामावरून राज्यकर्त्यांवर घणाघाती टीका केली आहे. तसेच कोकणातील जनतेलाही राज ठाकरेंनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. 

राज ठाकरे जागर यात्रेनंतर कोकणवासीयांना संबोधित करताना म्हणाले की, सरकारला जाग यावी म्हणून ही पदयात्रा काढली आहे. पदयात्रा हा तसा सभ्या मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग आहे तो म्हणजे पहिल्यांदा हात जोडून आणि नंतर हात सोडून. आजच्या जागर यात्रेत सहभागी झालेले महाराष्ट्र सैनिक आणि कोकणवासियांचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे.

राज ठाकरे पुढे म्हणाले की, सातत्यानं कंत्राटं काढायची. त्यातून बिलं घ्यायची आणि खड्डे तसेच ठेवायचे हे चक्र वर्षांनुवर्षे सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्ग पूर्ण का होत नाही आहे, याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीला कुठलातरी भावनिक मुद्दा काढला जातो आणि त्या भावनेच्या भारात मतदान केलं जातं.

हा रस्ता रखडण्यामागचं सुरू असलेलं सर्वात मोठं कारण म्हणजे येथे होणारे जमिनीचे व्यवहार हे आहे. येथील कोकणी माणसांच्या जमिनी ह्या कवडीमोल दरानेव विकत घेतल्या जात आहेत. जेव्हा रस्ता पूर्ण होईल, तेव्हा ह्या जमिनींची शंभरपट भावाने व्यापाऱ्यांना विक्री केली जाईल. त्यातून तुम्हाला काहीही मिळणार नाही. एक रस्ता चांगला झाला की आजूबाजूच्या जमिनींचे भाव कसे वाढतात हे समजून घ्या. मी तुम्हाला हात जोडून आवाहन करतो की जमिनी विकू नका. आज ना उद्या कधीतरी रस्ता होईल. तेव्हा त्याची किंमत तुम्हालाच मिळेल, असेही राज ठाकरे यांनी सांगितले.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेhighwayमहामार्ग