शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पालकमंत्रिपदाचा वाद एवढा का? ‘जिल्ह्याचा सीएम’इतके पॉवरफुल पद, डीपीसीचा निधी हाच यामागे मुख्य आकर्षणबिंदू

By यदू जोशी | Updated: January 22, 2025 07:08 IST

Maharashtra Government News: पालकमंत्रिपदांवरून महायुतीत हेवेदावे सुरू झाले असताना या पदाला गेल्या काही वर्षांमध्ये इतके महत्त्व कसे आले आणि पालकमंत्री म्हणजे ‘जिल्ह्याचा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा कशी निर्माण झाली, याच्या खोलात गेले असता या पदासाठी इतकी स्पर्धा का याचे उत्तर मिळते.

- यदु जोशीमुंबई - पालकमंत्रिपदांवरून महायुतीत हेवेदावे सुरू झाले असताना या पदाला गेल्या काही वर्षांमध्ये इतके महत्त्व कसे आले आणि पालकमंत्री म्हणजे ‘जिल्ह्याचा मुख्यमंत्री’ अशी प्रतिमा कशी निर्माण झाली, याच्या खोलात गेले असता या पदासाठी इतकी स्पर्धा का याचे उत्तर मिळते. पालकमंत्र्यांभोवतीचे अर्थकारण हा सर्वांत कळीचा मुद्दा आहे. 

जिल्हा नियोजन समितीचे (डीपीसी) पालकमंत्री हे अध्यक्ष, तर जिल्हाधिकारी हे सचिव असतात. एखाद्या महत्त्वाच्या निर्णयावर समितीच्या सदस्यांचे मतदान घेण्याची तरतूद आहे. जिल्ह्यातील आमदार हे डीपीसीचे सदस्य असतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. 

डीपीसीची बैठक दर तीन महिन्यांनी होते. सर्वसंमतीने निर्णय झाल्याचे चित्र निर्माण केले जाते, पण मुख्यत्वे निधीवाटपाचे निर्णय पालकमंत्रीच घेतात. दहा-पंधरा वर्षांपूर्वी डीपीसीचा निधी हा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी समान पद्धतीने दिला जायचा. मात्र, त्यानंतर त्यात राजकीय भेदभाव सुरू झाला. सत्तापक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघाला जादा निधी देणे सुरू झाले. बहुतेक जिल्ह्यांमध्ये ‘आपल्या’ आमदारांना जादा निधी देणे सुरू झाले. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या गेल्या सरकारमध्ये तर एका पक्षाचे पालकमंत्री मित्रपक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघांवर अन्याय करत असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. खरेतर मित्रपक्षाचा पालकमंत्री असल्याने निधीबाबत सत्तापक्षाच्या कोणत्याही आमदाराला अडचण जाऊ नये. मात्र, गेल्या काही वर्षांमधील या अनुभवामुळेच मित्रपक्षाच्या विशिष्ट मंत्र्याला पालकमंत्रिपद देण्यास विरोध होत आहे. 

पालकमंत्र्यांना निधी मंजुरीमध्ये काही कट मिळतो का? कागदोपत्री तसे सिद्ध होत नसले तरी त्याची चर्चा उघडपणे होत आली आहे. काही विशिष्ट आणि मोजकेच असे मोठे नेते की जे पालकमंत्रीदेखील आहेत ते या ‘कट’मध्ये लक्ष घालत नाहीत, अन्यथा बहुतेक पालकमंत्र्याचा अर्थपूर्ण रस डीपीसीमध्ये असतो असे जाहीरपणे बोलले जाते. २०२३-२०२४ साठी सर्व जिल्ह्यांत मिळून डीपीसींना १३,४४६ कोटी रुपयांची तरतूद केली होती. यावरून डीपीसीचे महत्त्व लक्षात येते. 

निकष धाब्यावर !जिल्ह्याची लोकसंख्या, क्षेत्रफळ व मानव विकास निर्देशांक या निकषांचा विचार करून डीपीसी निधी द्यावा, असा नियम आहे, पण गेल्या काही वर्षांत तो काही जिल्ह्यांबाबत धाब्यावर बसविला गेला. ज्या जिल्ह्याचे नेते राज्यात शक्तिशाली आहेत त्या जिल्ह्यांना जादा निधी दिला गेला.  

यावेळच्या वाटपातील काही वेगळे मुद्देपालकमंत्र्यांच्या पक्षाचा एकही आमदार नाही असे जिल्हे : मुंबई शहर-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (शिंदेसेना), नंदुरबार - माणिकराव कोकाटे (अजित पवार गट), भंडारा - संजय सावकारे (भाजप), वाशिम - हसन मुश्रीफ  (अजित पवार गट). 

मित्रपक्षांपेक्षा कमी तरीही पालकमंत्रिपद : रायगड - अदिती तटकरे, सिंधुदुर्ग - नितेश राणे, नाशिक - गिरीश महाजन, बुलडाणा - मकरंद जाधव, गोंदिया - बाबासाहेब पाटील, यवतमाळ - संजय राठोड, पुणे - अजित पवार, सातारा - शंभूराज देसाई.

टॅग्स :Mantralayaमंत्रालयMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार