शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
2
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
3
Mumbai Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार
4
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
5
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
6
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
7
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
8
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
9
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
10
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
11
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
12
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
13
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
14
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
15
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
16
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
17
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
18
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
19
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
20
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

अजित पवारांना आतापासूनच साईडलाईन का केलं जातंय? अनिल देशमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 09:38 IST

Anil Deshmukh : युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अकोला : राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचं सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवारांना साईडलाईन केले जाईल, हे सर्वांना माहीत आहे. पण, ते आतापासूनच अजित पवारांना साईडलाईन का केलं जातंय? याचा पेच आम्हालाही पडला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर टीका केली. आमचे सहकारी सरकारमध्ये गेले, हे प्रेमापोटी नाही गेले. ज्याप्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये, म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच, जेलमध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूनच तिकडे गेले, अशी मिष्किल टीकाही अनिल देशमुख यांनी केली. 

याचबरोबर, जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो. आपल्यालाही मंत्री पद मिळाले असते, असा दावा सुद्धा अनिल देशमुख यांनी केला. तसेच, सध्या शेतीसह अन्य ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी महायुतीच्या सरकारकडे वेळ नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न राज्यात आहेत. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी केली आहे. याशिवाय, अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देऊन कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये आणि सोयाबीनला ८ हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. 

गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज - अनिल देशमुख जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच, अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनदरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, असा अमानुष लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुख