शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
3
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
4
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
5
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
6
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
7
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
8
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
9
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
10
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
11
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
12
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
13
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
14
मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
15
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
16
तब्बल २० लाख नोकऱ्या धोक्यात ? ट्रम्प टॅरिफचा भारताला जबर फटका
17
वीज कोसळल्याने चौघांचा मृत्यू; मृतांमध्ये आईसह तरुण मुलाचा समावेश, धापेवाडा व धामणगाव शिवारातील घटना
18
पश्चिम विदर्भात अतिवृष्टीचा सहा लाख हेक्टरला फटका, ऑगस्टमध्ये सर्वाधिक नुकसान; कृषी विभागाचा अहवाल
19
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
20
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार

अजित पवारांना आतापासूनच साईडलाईन का केलं जातंय? अनिल देशमुखांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2023 09:38 IST

Anil Deshmukh : युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

अकोला : राज्यातील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीचं सरकार म्हणजे केवळ एक देखावा आहे. शिंदे, फडणवीस हेच सरकार चालवित आहेत. लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर अजित पवारांना साईडलाईन केले जाईल, हे सर्वांना माहीत आहे. पण, ते आतापासूनच अजित पवारांना साईडलाईन का केलं जातंय? याचा पेच आम्हालाही पडला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते तथा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

विदर्भात येणाऱ्या युवा संघर्ष यात्रेच्या निमित्ताने अकोला येथे अनिल देशमुख यांनी मंगळवारी (ता. २८) प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अनिल देशमुख यांनी राज्य सरकारवर आणि भाजपवर टीका केली. आमचे सहकारी सरकारमध्ये गेले, हे प्रेमापोटी नाही गेले. ज्याप्रमाणे अनिल देशमुखांना त्रास झाला तसा आपल्याला होऊ नये, म्हणून आमचे जुने नेते तिकडे गेले, असे अनिल देशमुख म्हणाले. तसेच, जेलमध्ये कसा त्रास होतो, हे माझ्याकडून ऐकूनच तिकडे गेले, अशी मिष्किल टीकाही अनिल देशमुख यांनी केली. 

याचबरोबर, जर आपणही तडजोड केली असती तर आपणही सत्तेत असतो. आपल्यालाही मंत्री पद मिळाले असते, असा दावा सुद्धा अनिल देशमुख यांनी केला. तसेच, सध्या शेतीसह अन्य ज्वलंत प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी महायुतीच्या सरकारकडे वेळ नाही. महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, सध्या अतिवृष्टीचा मोठा प्रश्न राज्यात आहेत. अशावेळेस मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणात जात आहेत, याची तीव्र नाराजी जनतेमध्ये आहे, अशी टीकाही अनिल देशमुख यांनी केली आहे. याशिवाय, अवकाळी पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत देऊन कापसाला प्रति क्विंटल १४ हजार रुपये आणि सोयाबीनला ८ हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली. 

गृहमंत्र्यांच्या आदेशाने लाठीचार्ज - अनिल देशमुख जाती-जातीमध्ये भांडण लावण्याचे काम राज्य शासन करत आहे, असा घणाघात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. तसेच, अंतरवाली सराटीमध्ये मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनदरम्यान पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. याबाबत बोलताना अनिल देशमुख म्हणाले की, असा अमानुष लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नाही, असा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAnil Deshmukhअनिल देशमुख