शहरं
Join us  
Trending Stories
1
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
2
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
3
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
6
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
7
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
8
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
9
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
10
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
11
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
12
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
13
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
14
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
15
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
16
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
17
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
18
"काँग्रेस सगळ्या निवडणुका लढायला पुढे जाते, पण निकाल लागल्यानंतर कळतं...", संजय राऊत यांचा टोला
19
HDFC बँकेच्या दुबई शाखेत मोठा गैरव्यवहार; ५ वर्षांपर्यंत लपवलं सत्य, अतनु चक्रवर्तींच्या राजीनाम्याशी संबंध?
20
'इराणने युद्ध जिंकल्याचे जाहीर करावे आणि...'; कोणी दिला हा सल्ला, ट्रम्पवर कडी करा...
Daily Top 2Weekly Top 5

भारतातील कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का? सोशल मीडियावरील चर्चांना CM फडणवीसांचे स्पष्ट शब्दात उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:34 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावर असतानाच महाराष्ट्र आणि देशात चर्चा सुरू झाली. भारतातीलच उद्योगांसोबत दावोसमध्ये जाऊन सरकार का करार करत आहे? हाच प्रश्न फडणवीसांना विचारण्यात आला, तेव्हा त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. 

महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोसमध्ये अनेक कंपन्यांसोबत गुंतवणूक करार केले. यातील काही कंपन्यांचा मुद्दा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. भारतातीलच कंपन्यांसोबत दावोसमध्ये जाऊन करार का होत आहेत? याबद्दल दावोस दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. या चर्चेमागे एक टुलकिट तयार झालेले असल्याचे सांगितले. तसेच दावोसमध्येच करार का केले गेले? याबद्दल सविस्तर भूमिका मांडली. 

'सोशल मीडियामध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून एक प्रश्न विचारला जात आहे की, देशातील जे उद्योग आहेत, त्या उद्योगांशी गुंतवणुकीचे करार हे दावोसमध्ये का होत आहेत?', असा प्रश्न 'लोकमत'च्या प्रतिनिधीने विचारला. 

'महाराष्ट्राचे यश बघवत नाही, असे काही लोक...'

या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, "फार चांगला प्रश्न तुम्ही विचारला. पहिल्यांदा तर माझ्या हे लक्षात आलं की, एक टुलकिट तयार झालेली आहे. जी टुलकीट थेट याठिकाणी एवढ्या करताच तयार केलेली आहे की, ज्यांना महाराष्ट्राचे यश पाहवत नाही. असे काही लोक अशा पद्धतीने मेसेजेस तयार करून पोस्ट करत आहेत. किंबहुना मला तर अतिशय गंमत वाटली की, सगळ्यांचा मेसेज सारखाच. त्यामध्ये काहीच अंतर नाही" 

सगळे करार हे एफडीआयचे आहेत -फडणवीस

"या टुलकिटच्या मागे कोण आहे, हे आता मी सांगत नाही. ते मला लक्षात येत आहेत. पण, त्या सगळ्यांना मी उत्तर देऊ इच्छितो, पहिल्यांदा तर हे जे काही करार आपण करत आहोत. हे सगळे करार एफडीआयचे करार आहेत. हे देशातील गुंतवणुकीचे करार नाहीत. हे थेट परकीय गुंतवणुकीचे करार आहेत", असे उत्तर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. 

"साधारणपणे ज्यावेळी दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम असते. त्यावेळी अशा प्रकारचे एफडीआय करणाऱ्या कंपन्या या सगळ्यांच्या बोर्ड मीटिंग या याच्या आसपास असतात. त्यामुळे त्यांची इच्छा असते की, याठिकाणी अशा प्रकारचा करार झाला पाहिजे", अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली. 

दावोसमुळे महाराष्ट्राला एक स्थान मिळते -फडणवीस 

"दुसरे म्हणजे एक प्रश्न असा देखील विचारू शकतो की, आपण वेगवेगळी राज्य गुंतवणूक परिषदा घेतात. मग त्या परिषदा घेण्याची गरज काय आहे? सगळ्यांना आपल्या कार्यालयात बोलावूनही आपल्याला करार करता यतो. पण, दावोस अशी जागा आहे, तेव्हा त्याची चर्चा फक्त महाराष्ट्रापुरती राहत नाही. तर ती संपूर्ण जगात आणि देशात जातो आणि त्यामुळे महाराष्ट्राला एक स्थान मिळते", असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोस दौऱ्यात करार करण्यामागील कारण विशद करताना सांगितले. 

English
हिंदी सारांश
Web Title : CM Fadnavis clarifies Davos deals with Indian firms amid social media buzz.

Web Summary : CM Fadnavis addressed concerns about signing investment deals with Indian companies in Davos. He stated these are FDI agreements, facilitated by the World Economic Forum, enhancing Maharashtra's global visibility. He dismissed criticism as a politically motivated 'toolkit'.
टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSwitzerlandस्वित्झर्लंडInvestmentगुंतवणूकFDIपरकीय गुंतवणूक