शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नेमकी हीच वेळ का निवडली?; राज ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:38 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी मोदी सरकारने निवडलेल्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राम मंदिराची उभारणी होत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही. वातावरण निवळल्यावर मुहूर्त घेतला असता तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला असता. नेमकी हीच वेळ का निवडली हे कळत नाही, असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमिपूजनावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमीपूजन करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी असहमती दाखवली. मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे. या मंदिरासाठी असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. हा ऐतिहासिक सोहळा धुमधडाक्यातच व्हायला हवा. ई-भूमीपूजन वगैरे होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे जल्लोषात भूमीपूजन व्हायला हवे, असे मत राज यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यानंतरही भूमिपूजन करता आले असते. जगण्याची हमी आली असती तर लोकांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला असता, असेही राज म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीकामुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. हे सरकार आले तेव्हाच मी म्हणालो होतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRam Mandirराम मंदिर