शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
3
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
4
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
5
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
6
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
7
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
8
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
9
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
10
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
11
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
12
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?
13
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
14
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
15
Mumbai Accident: ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
16
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
17
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
18
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
19
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
20
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  

राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी नेमकी हीच वेळ का निवडली?; राज ठाकरे यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 05:38 IST

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी मोदी सरकारने निवडलेल्या मुहूर्तावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. राम मंदिराची उभारणी होत आहे ही अभिमानास्पद गोष्ट आहे. पण भूमिपूजनासाठीची ही वेळ नाही. वातावरण निवळल्यावर मुहूर्त घेतला असता तर सर्वांनाच त्याचा आनंद घेता आला असता. नेमकी हीच वेळ का निवडली हे कळत नाही, असे ते म्हणाले.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी राम मंदिर भूमिपूजनावर पहिल्यांदाच आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला ई-भूमीपूजन करण्याचा सल्ला दिला होता. त्यावर राज यांनी असहमती दाखवली. मोठ्या संघर्षानंतर राम मंदिर होत आहे. या मंदिरासाठी असंख्य लोकांनी प्राणाची आहुती दिली आहे. हा ऐतिहासिक सोहळा धुमधडाक्यातच व्हायला हवा. ई-भूमीपूजन वगैरे होऊ शकत नाही. हा लोकांच्या आनंदाचा भाग आहे. त्यामुळे जल्लोषात भूमीपूजन व्हायला हवे, असे मत राज यांनी व्यक्त केले. कोरोनामुळे भीतीचे वातावरण आहे. दोन महिन्यानंतरही भूमिपूजन करता आले असते. जगण्याची हमी आली असती तर लोकांनीही या ऐतिहासिक सोहळ्याचा आनंद घेतला असता, असेही राज म्हणाले.

उद्धव ठाकरे यांच्या कारभारावर टीकामुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मला फक्त टीव्हीवर दिसले. त्याचा कारभार दिसलाच नाही, अशी टीका राज यांनी केली. तर, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही संवाद नाही. काहीही ताळमेळ नाही, त्यामुळे हे सरकार फार काळ टीकेल असे वाटत नाही, असेही ते म्हणाले. हे सरकार आले तेव्हाच मी म्हणालो होतो, हे सरकार फार काळ टिकणार नाही. आताही या तीन पक्षांमधील सावळागोंधळ पाहता हे सरकार फार काळ टिकेल असे वाटत नाही. सरकारमधील तिन्ही पक्षाचा एकमेकांशी संवाद नाही. ताळमेळ नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेRam Mandirराम मंदिर