शहरं
Join us  
Trending Stories
1
हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
3
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
4
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
5
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
6
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
7
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
8
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
9
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
10
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?
11
दूध आणायला जातो म्हणाला, १९ दिवसांनी मृतदेह सापडला; रशियात बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने राजस्थान हादरले
12
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
13
रणबीर-आलियाने धूमधडाक्यात साजरा केला राहाचा वाढदिवस, इनसाईड व्हिडीओही व्हायरल
14
Katrina Kaif-Vicky Kaushal Baby: गुडन्यूज! कतरिनाने दिला गोंडस बाळाला जन्म, विकी कौशलचा आनंद गगनात मावेना, म्हणाला...
15
अमेरिकेचा चीनला मोठा झटका! आणखी एका कंपनीने कामकाज केलं बंद; ४०० कर्मचाऱ्यांची नोकरी गेली
16
कमाईच नव्हे, दिवसाला ७ कोटी दानही ! 'हे' आहेत भारताचे टॉप 10 दानशूर; अंबानी, अदानी कितवे?
17
'मनी हाइस्ट' पाहून १५० कोटींची फसवणूक; लोकांना 'असं' अडकवायचे जाळ्यात, झाला पर्दाफाश
18
स्विमिंग पूलसाठी खोदायला गेला, सापडले घबाड! घराच्या बागेत सापडली सोन्याची बिस्कीटे अन् नाणी..., सरकारने त्यालाच देऊन टाकले...
19
"या गोष्टी बाहेर जाणं चूक आहे..."; राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पिट्याभाईची पहिली प्रतिक्रिया
20
Ambadas Danve : Video - "वोटचोरीनंतर 'खतचोरी', भाजपाच्या रुपाने कुंपणच शेत खातंय"; अंबादास दानवेंचा घणाघात

जालना इथं धनगर समाज आक्रमक का झाला?: गोपीचंद पडळकरांनी संपूर्ण घटना सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:21 IST

राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे असं आवाहन पडळकरांनी केले.

मुंबई - मराठा आरक्षणावरून एकीकडे राजकारण तापलं असताना दुसरीकडे धनगर समाजाचे आंदोलनही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना इथं निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. जालनातील धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसून आले. नेमकं हे का घडलं याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यभरात सगळीकडे धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी मागणीसाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना शांततेत निवेदन देत आहे. जालना इथं आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी भेट दिली. निवेदन देणार असल्याचे सांगितले. परंतु आज धनगर बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेले परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी आले नाहीत. १ तास वाट पाहिल्यानंतरही वारंवार आवाहन करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संताप अनावर झाला आणि त्यातून तोडफोड झाली. तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही परंतु हे प्रशासकीय अधिकारी आहेत, या लोकांना आरक्षणाचे गांभीर्य असण्याची आवश्यकता होती. परंतु ते होताना दिसत नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे. कायदा हातात घेऊन काही करायचे नाही. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता पुढच्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर बळजबरी करू नका. खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना त्रास देऊ नका. असे प्रकार करू नये असं आमचे जालना जिल्हा प्रशासनाला आवाहन आहे असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. 

दरम्यान, मी पोलीस अधीक्षकांशी बोलून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये अशी विनंती करणार आहे. सरकारने या गोष्टीत मार्ग काढला पाहिजे. लोकांची भावना ताबडतोड आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे असं वाटते. सरकार यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावी. सरकारने धनगर आरक्षणाबाबतीत ठोस भूमिका घेतली पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय वेगळा आहे. धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे. आमची नव्याने समावेश करा अशी आमची मागणी आहे. राज्यातील ३३ आदिवासी जातींवर अन्याय का केला जातोय असा सवालही आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षण