शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
3
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
6
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
7
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
8
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
9
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
10
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
11
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
12
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
13
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
14
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
15
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
16
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
17
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
18
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
19
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
20
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास

जालना इथं धनगर समाज आक्रमक का झाला?: गोपीचंद पडळकरांनी संपूर्ण घटना सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 17:21 IST

राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे असं आवाहन पडळकरांनी केले.

मुंबई - मराठा आरक्षणावरून एकीकडे राजकारण तापलं असताना दुसरीकडे धनगर समाजाचे आंदोलनही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जालना इथं निवेदन देण्यासाठी गेलेल्या धनगर समाजाच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड केली. यात वाहनांच्या काचाही फोडण्यात आल्या. जालनातील धनगर समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे चित्र दिसून आले. नेमकं हे का घडलं याबाबत भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले की, राज्यभरात सगळीकडे धनगर समाज आपल्या आरक्षणासाठी मागणीसाठी जिल्हाधिकारी, तहसिलदार यांना शांततेत निवेदन देत आहे. जालना इथं आमच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी यांना सोमवारी भेट दिली. निवेदन देणार असल्याचे सांगितले. परंतु आज धनगर बांधव मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यास गेले परंतु त्यावेळी जिल्हाधिकारी आले नाहीत. १ तास वाट पाहिल्यानंतरही वारंवार आवाहन करूनही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही. त्यामुळे संताप अनावर झाला आणि त्यातून तोडफोड झाली. तोडफोडीचे आम्ही समर्थन करत नाही परंतु हे प्रशासकीय अधिकारी आहेत, या लोकांना आरक्षणाचे गांभीर्य असण्याची आवश्यकता होती. परंतु ते होताना दिसत नाही असं त्यांनी म्हटलं. 

तसेच राज्यभरातील सर्व समाजाला मी शांततेचे आवाहन करतो. आपल्याला आरक्षण शांततेच्या मार्गाने सरकारकडे पाठपुरावा करून मिळवायचे आहे. कायदा हातात घेऊन काही करायचे नाही. जालना जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी आक्रमक न होता पुढच्या सर्व प्रक्रिया पार पाडाव्यात. आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांवर बळजबरी करू नका. खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांना त्रास देऊ नका. असे प्रकार करू नये असं आमचे जालना जिल्हा प्रशासनाला आवाहन आहे असंही आमदार गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. 

दरम्यान, मी पोलीस अधीक्षकांशी बोलून कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करू नये अशी विनंती करणार आहे. सरकारने या गोष्टीत मार्ग काढला पाहिजे. लोकांची भावना ताबडतोड आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे असं वाटते. सरकार यातून मार्ग काढेल अशी अपेक्षा आहे. सरकारने तात्काळ कार्यवाही करावी. सरकारने धनगर आरक्षणाबाबतीत ठोस भूमिका घेतली पाहिजे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय वेगळा आहे. धनगर समाजाच्या आदिवासी आरक्षणाच्या अंमलबजावणीची मागणी आहे. आमची नव्याने समावेश करा अशी आमची मागणी आहे. राज्यातील ३३ आदिवासी जातींवर अन्याय का केला जातोय असा सवालही आमदार गोपीचंद पडळकरांनी विचारला आहे. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरDhangar Reservationधनगर आरक्षण