शहरं
Join us  
Trending Stories
1
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
2
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
3
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
4
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
5
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
6
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
7
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
8
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
9
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
10
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
11
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
12
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
13
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
14
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
15
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
16
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
17
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
18
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
19
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
20
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)

मराठी पुस्तके खपत का नाहीत? अकादमी विजेत्याची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:46 IST

Marathi Books: राज्यात १६ हजार शासकीय ग्रंथालये आहेत. मग...

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मराठी भाषा व्यवहार १२ कोटी लोकांशी संबंधित आहे. राज्यात १६ हजार शासकीय ग्रंथालये आहेत. मग मराठी साहित्यातील पुस्तकांचा हवा तसा खप का होत नाही. ५०० पुस्तकांची आता तर ३०० पुस्तकांची एक आवृत्ती निघते, अशी खंत साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक प्रदीप कोकरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे.

मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील पाचेरी आगर या छोट्याशा गावातील असलेले आणि सध्या मुंबईत वडाळा येथे राहणारे प्रदीप कोकरे यांच्या ‘खोल खोल दुष्काळ डोळे’ या ‘लोकवाङ्मय गृह’ने प्रकाशित केलेल्या कादंबरीला साहित्य अकादमी युवा पुरस्कार २०२५ जाहीर झाला आहे. संवेदनशील कवी मनाच्या तरुणाचे उमेदवारीचे दिवस रेखाटणारी, तसेच महानगरातील वास्तव मांडणारी ही कादंबरी आहे.

...म्हणून लेखकांना नैराश्य येते, लेखन थांबतेमुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांत माझ्यासारख्या गावातून आलेल्या लेखकांना पटकन ओळख मिळत नाही. साहित्यविश्वात पुरेशी स्पेस, तसेच प्रोत्साहन मिळत नाही. त्यातून युवा लेखकांना नैराश्य येते आणि त्यांचे लेखन थांबते. सुदैवाने माझ्याबाबत असे झाले नाही, असे त्यांनी सांगितले.

पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला. या पुरस्काराने मला रेक्गनिशन मिळाले आहे. अर्थात त्यामुळे माझी जबाबदारीही वाढली आहे. माझ्या घरात अक्षराशी ओळख झालेला, तसेच दहावी झालेली मी गावातील पहिली व्यक्ती होतो. बारावीनंतर मी मुंबईत आलो. तरुण वयात साहित्यिकाचे कौतुक झाले तर एक सशक्त साहित्यिक घडण्यास हातभार लागतो, असे साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते लेखक, प्रदीप कोकरे म्हणाले.

बालसाहित्य माणूस घडविण्याची पायरीनांदेड : साहित्य अकादमीचा यंदाचा 'बाल वाङ्मय पुरस्कार' नांदेड येथील डॉ. सुरेश सावंत यांना त्यांच्या 'आभाळमाया' या कवितासंग्रहासाठी जाहीर झाला आहे. चांगले बालसाहित्य ही चांगला माणूस घडविण्याच्या प्रक्रियेतील पहिली पायरी असते. ही पायरी भक्कम असली पाहिजे, कारण आजच्या गढूळ आणि मूल्यहीन होत चाललेल्या वातावरणात बालसाहित्याची जबाबदारी अधिकच वाढली आहे, अशी प्रतिक्रिया सुरेश सावंत यांनी दिली. आजच्या प्रदूषित सामाजिक वातावरणात माणसाचे यंत्र बनत चालले आहे. माणसाचे यंत्र होऊ द्यायचे नसेल, तर बालकांच्या हातात योग्य वयात योग्य ते पुस्तक देणे अत्यावश्यक आहे. ही गरज ओळखून मी निष्ठेने बालसाहित्याचे लेखन करत आलो आहे. 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्र