शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
4
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
5
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
6
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
7
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
8
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
9
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
10
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
11
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
12
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
13
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
14
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
15
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
16
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
17
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
18
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
19
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
20
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य

आदित्य ठाकरेंपासून का दुरावले मित्र?; पूर्वेश अन् राहुलनं बंडाचं कारण सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2023 12:54 IST

आदित्य ठाकरे नेता आहे की, युवासेनेतील दुसरं कोणी नेतृत्व करतंय याबाबत गोंधळ आहे असं सांगत उबाठा गटाच्या युवासेनेतील कार्यपद्धतीवर पूर्वेश सरनाईक यांनी भाष्य केले.

मुंबई – अलीकडेच ठाकरे गटाच्या कार्यकारणीचा विस्तार करण्यात आला. त्यात युवासेनेच्या काही पदाधिकाऱ्यांना बढती मिळाल्याचे दिसले. ठाकरे गटानंतर शिंदे गटानेही युवासेनेची नवी कार्यकारणी जाहीर केली. त्यात आमदार प्रताप सरनाईक यांचा मुलगा पूर्वेश सरनाईक यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिली. त्याचसोबत आदित्य ठाकरेंचे मित्र राहुल कनाल यांची युवासेना सरचिटणीस पदावर नियुक्ती करण्यात आली. युवासेनेतील आदित्य ठाकरेंच्या जुन्या सहकाऱ्यांनी आदित्यची साथ का सोडली याबाबत सविस्तर सांगितले.

पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं की, माझी कार्याध्यक्षपदी निवड झाली त्यानंतर उबाठा गटाच्या आदित्य ठाकरे आणि वरुण सरदेसाई वगळता प्रत्येकाचे शुभेच्छांसाठी फोन आले. त्या सगळ्यांनी त्यांची नाराजी माझ्याकडे व्यक्त केली. लवकरच त्यांच्या युवासेनेच्या कोअर कमिटीत जे उरलेले सदस्य आहेत ते लवकरच आमच्या युवासेनेत सहभागी होतील आणि निश्चित त्यांना न्याय देण्यात येईल. ज्या लोकांना सचिव करायला हवे होते तिथे त्यांना डावलले गेले. एक नेता आणि त्याच्या आजूबाजूला फिरणारी ही मंडळी आहेत. आदित्य ठाकरे नेता आहे की, युवासेनेतील दुसरं कोणी नेतृत्व करतंय याबाबत गोंधळ आहे. त्या नेत्याच्या आसपास असलेले प्रमुख पदाधिकारी असतील त्यांनाच न्याय देण्यात येतो. जेव्हा युवासेनेची स्थापना झाली तेव्हापासून ज्यांनी काम केले त्यांना न्याय द्यायला हवा होता. परंतु परदेशातून आलेल्यांना संधी दिली गेली. त्यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी युवासेना वाढवली. या लोकांना स्थान देऊ शकला नाहीत. परंतु नवीन आलेल्यांना स्थान दिले गेले असा आरोप त्यांनी केला.

तर आदित्य ठाकरे माझे जीवलग मित्र होते, मित्राने कधी साथ सोडायला नको होती अशी माझी इच्छा होती. पण माझ्याविरोधात कुणीतरी त्यांना भडकवण्याचा प्रयत्न केला गेला. काही लोकांनी तुमच्या नेतृत्वाला इतर लोकांपर्यंत न पोहचवण्यासाठी जे स्वत:ला मोठे केले आहे अशा लोकांना तुम्ही दूर करा तुमचे भविष्य चांगले आहे असंही पूर्वेश सरनाईक यांनी म्हटलं. दरम्यान, नातं नेहमी राहते, एकतर्फी नाते निभावलं जात नाही. त्यासाठी दोन्हीकडून प्रयत्न व्हायला हवेत. नाते टिकवणे प्रत्येक नेत्याचे कार्यकर्त्याचे काम असते. परंतु संवाद राहिला नाही अंतर वाढत जाते, आम्ही आमचे काम करू, आमच्या कामातून आम्ही सामना करू असं म्हणत आदित्य ठाकरेंकडून संवाद कमी झाल्याचा आरोप राहुल कनाल यांनी केला.

टॅग्स :Aaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना