शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

'ओबीसी'त आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? उच्च न्यायालयाचा मराठा याचिकाकर्त्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 09:55 IST

याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्याऐवजी इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण देण्याकरिता वर्ग निर्माण करण्याचा पर्याय सरकारपुढे होता. तरीही स्वतंत्र प्रवर्ग का आवश्यक आहे, या मुद्यावर याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी दिले.

मराठा समाजाचे मागसलेपण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आयोगापुढे कोणते मापदंड ठेवले आहेत? असा प्रश्नही न्यायालयाने सरकारला केला. इंद्रा साहनी खटल्याच्या निकालात हे मापदंड नमूद करण्यात आले आहेत. त्यात सामाजिक आणि भौगोलिक स्थितीचा समावेश आहे, असे ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी न्यायालयाला सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्याशिवाय शुक्रे आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या पूर्णपीठापुढे या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली.

रद्द केलेल्या आणि नव्या कायद्यात फरक काय?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील फेटाळलेल्या २०१८च्या कायद्यात आणि या नव्या कायद्यात फरक काय? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाच्या या प्रश्नावर याचिकाकर्त्यांच्यावतीने  ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी सांगितले की, केवळ टक्केवारीत फरक आहे. दोन्ही कायदे सारखेच आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी कोणतीही असामान्य परिस्थिती नाही. आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने होत आहेत म्हणून आरक्षण देणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेऊन सरकार वारंवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कायदा तयार करणार असेल तर कसे होणार? बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही का? असा युक्तिवाद संचेती यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय