शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम लोक होते"; आमचे आदर्श मुस्लिमविरोधी नसल्याचे राजनाथ सिंहांचे विधान
2
“कधीही कोणत्याही उपराष्ट्रपतींना अशी राजकीय विधाने करताना पाहिले नाही”: कपिल सिब्बल
3
Maiden IPL Fifty For Tim David : एकटा पडला, शेवटपर्यंत नडला अन् पहिली फिफ्टीही ठोकली
4
लाडकी बहीण योजना: एप्रिलचा हप्ता कधी मिळेल? ५०० मिळणार की १५००? नियम बदलले का? जाणून घ्या
5
धक्कादायक; सोलापूरचे न्युरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांची आत्महत्या; डोक्यात झाडली गोळी
6
IPL 2025 :पदार्पणाच्या सामन्यात जे घडलं तेच १८ वर्षांनी पुन्हा विराट कोहलीच्या वाट्याला आलं
7
“अमित शाह भेट वैयक्तिक होती तर तो भार सरकारी तिजोरीवर कशाला, तटकरेंनी...”; कुणी केली टीका?
8
२००० रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या UPI व्यवहारांवर भरावा लागणार जीएसटी? सरकारने केली घोषणा
9
अरविंद केजरीवाल यांच्या लेकीचे फाईव्ह स्टार हॉटेलात थाटात लग्न...! जावई कोण? काय करतो...
10
टेस्ला भारतात येण्यापूर्वी पंतप्रधान मोदींची मस्क यांच्याशी चर्चा; फोनवर काय झाला संवाद?
11
“उद्या बाळासाहेबांच्या आवाजात शरद पवार, सोनिया गांधी देवमाणूस आहेत असे वदवून घ्याल”
12
IPL 2025 : जुने तेवर दिसले! दिग्गज क्रिकेटर म्हणाला; लवकरच रोहितच्या भात्यातून मोठी खेळीही येईल
13
साखरपुड्यातच होणाऱ्या पत्नीने प्रियकराला मिठीत घेतलं अन्... लग्नाचे स्वप्न पाहणाऱ्या अधिकाऱ्याने आयुष्य संपवलं!
14
“काहीही चूक नाही, हिंदी देशाची भाषा आहे, मुलांना...”; सक्तीला संजय निरुपम यांचे समर्थन
15
हिंदी सक्तीला विरोध की पाठिंबा? आदित्य ठाकरे म्हणाले, “प्रगतीसाठी जास्त भाषा येणे गरजेचे”
16
रोल्स रॉयसच्या कारची नावे कायम भुतांवरून का असतात? इतर कंपन्यांनी ठेवली तर कोणी घेणारही नाही...
17
अन् बोभाटा झाला...! घरच्यांपासून बँकॉक ट्रिप लपविण्यासाठी काकांनी पासपोर्टची पाने फाडली; आता जगाला समजले...
18
शाळेच्या कार्यक्रमात प्रेम जागे झाले आणि तिने सगळं संपवलं; प्रियकरासाठी केली तीन मुलांची हत्या
19
"आम्हाला सांगण्याऐवजी तुमच्या देशातल्या अल्पसंख्याकांचे रक्षण करा"; भारताने बांगलादेशला सुनावले
20
IPL 2025: भाई... हा नशेत आहे का?; अर्जुन तेंडुलकरच्या व्हायरल व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स

'ओबीसी'त आरक्षण देण्याऐवजी स्वतंत्र प्रवर्ग का? उच्च न्यायालयाचा मराठा याचिकाकर्त्यांना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2024 09:55 IST

याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी स्वतंत्र प्रवर्ग निर्माण करण्याऐवजी इतर मागासवर्ग प्रवर्गात (ओबीसी) आरक्षण देण्याकरिता वर्ग निर्माण करण्याचा पर्याय सरकारपुढे होता. तरीही स्वतंत्र प्रवर्ग का आवश्यक आहे, या मुद्यावर याचिकाकर्त्यांनी आपली बाजू स्पष्ट करावी, असे निर्देश उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना बुधवारी दिले.

मराठा समाजाचे मागसलेपण ठरविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने आयोगापुढे कोणते मापदंड ठेवले आहेत? असा प्रश्नही न्यायालयाने सरकारला केला. इंद्रा साहनी खटल्याच्या निकालात हे मापदंड नमूद करण्यात आले आहेत. त्यात सामाजिक आणि भौगोलिक स्थितीचा समावेश आहे, असे ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी न्यायालयाला सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी करण्यात आलेल्या कायद्याला आव्हान देणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्याशिवाय शुक्रे आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोगाने सादर केलेल्या अहवालालाही उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय, न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. फिरदोश पुनिवाला यांच्या पूर्णपीठापुढे या याचिकांवर बुधवारी सुनावणी झाली.

रद्द केलेल्या आणि नव्या कायद्यात फरक काय?

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भातील फेटाळलेल्या २०१८च्या कायद्यात आणि या नव्या कायद्यात फरक काय? असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. न्यायालयाच्या या प्रश्नावर याचिकाकर्त्यांच्यावतीने  ज्येष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी सांगितले की, केवळ टक्केवारीत फरक आहे. दोन्ही कायदे सारखेच आहेत.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासारखी कोणतीही असामान्य परिस्थिती नाही. आरक्षणासाठी मोर्चे, आंदोलने होत आहेत म्हणून आरक्षण देणे आवश्यक आहे, अशी भूमिका घेऊन सरकार वारंवार मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात कायदा तयार करणार असेल तर कसे होणार? बांगलादेशासारखी परिस्थिती निर्माण होणार नाही का? असा युक्तिवाद संचेती यांनी केला.

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMumbaiमुंबईHigh Courtउच्च न्यायालय