शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

धनुष्यबाण कुणाचे?; सत्तासंघर्षाची सुनावणी आता २७ सप्टेंबरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2022 06:20 IST

ठाकरे व शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने स्पष्ट केले की, चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आपली ‘शक्ती’ २७ सप्टेंबरसाठी राखून ठेवावी, अशी मिश्किल टिप्पणी केली.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर घटनापीठापुढे पुढील सुनावणी येत्या २७ सप्टेंबरला होणार आहे. तोपर्यंत शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कोणत्या गटाला द्यावे, याबाबत निवडणूक आयोगाने निर्णय घेऊ नये, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. २३ ऑगस्टपासून प्रलंबित असलेली सुनावणी बुधवारी घटनापीठापुढे झाली. या घटनापीठात न्या. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश आहे. 

एकनाथ शिंदे गटाने आयोगाला चिन्हाबाबत निर्णय घेण्याची अनुमती द्यावी, अशी विनंती करणारा अर्ज दाखल केला. याविरोधात उद्धव ठाकरे गटाने सुनावणीसाठी असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांच्या अपात्रता, विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, राज्यपालांनी मुख्यमंत्रिपदासाठी शिंदे यांना पाचारण करणे व इतर याचिकांवर निर्णय होईपर्यंत निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यास मज्जाव करावा, असा अर्ज बुधवारी दाखल केला. आयोगाचे वकील अरविंद दातार म्हणाले की, एखाद्या पक्षाच्या निवडणूक चिन्हाबाबत कुणी आक्षेप घेतल्यास निवडणूक आयोगाला निर्णय घ्यावा लागतो. 

ठाकरे व शिंदे गटाच्या युक्तिवादानंतर घटनापीठाने स्पष्ट केले की, चिन्हाबाबत आज कोणताही निर्णय होणार नाही. दोन्ही बाजूंच्या वकिलांनी युक्तिवादासाठी आपली ‘शक्ती’ २७ सप्टेंबरसाठी राखून ठेवावी, अशी मिश्किल टिप्पणी केली.

शिंदे गट : निवडणुका तोंडावर, चिन्हाबाबत निर्णयाची गरज -- या वेळी शिंदे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ नीरज कौल म्हणाले की, निवडणूक आयोगाला एखादा निर्णय घेण्यापासून रोखता येणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काही दिवसांवर आलेल्या असताना यावर निर्णय होण्याची गरज आहे. - यापूर्वी निवृत्त सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठाने निवडणूक आयोगाला निर्णय घेण्यापासून निर्बंध लादलेले नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

ठाकरे गट : मागच्या सुनावणीतही निर्णय न घेण्याचे आदेश -- ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी कौल यांचे म्हणणे खोडून काढले. ३ ऑगस्टच्या सुनावणीत आयोगाने चिन्हाबाबत कोणताही निर्णय घेऊ नये, असे तोंडी आदेश न्यायालयाने दिलेले आहेत. - मांडण्यासाठी गटाला काही दिवसांची मुदतसुद्धा दिल्याचेही कपिल सिब्बल यांनी निदर्शनास आणून दिले. ठाकरे गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी अपात्र आमदारांना निवडणूक आयोगाकडे दाद मागता येऊ शकत नसल्याचा दावा केला.  

 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv Senaशिवसेना