शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेकडून केंद्रीय मंत्रिपदासाठी सात नावं चर्चेत; आज शिक्कामोर्तब

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 10:56 IST

शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता

- मनोहर कुंभेजकर

मुंबई : शिवसेनेतील वयाने आणि अनुभवाने ज्येष्ठ असलेले शिवसेना नेते व सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले खासदार गजानन कीर्तिकर यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागणार असल्याचे समजते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पहिल्या टप्प्यात काही ठरावीक मंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळी 5 वाजता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नेत्यांची महत्वाची बैठक बोलवल्याचे समजते.

या बैठकीत शिवसेनेच्या मंत्र्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. मोदींच्या नव्या केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला दोन कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री तसेच लोकसभेचे उपसभापतीपद मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर पश्चिम मुंबईचे खासदार गजानन कीर्तिकर हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आणि त्यांनी काँग्रेसच्या संजय निरुपम यांचा अडीच लाख मतांनी दणदणीत पराभव केला आहे. वयाने व अनुभवाने कीर्तिकर ज्येष्ठ आहेत. शिवसेनेतील असलेला त्यांचा प्रदीर्घ अनुभव, स्थानीय लोकाधिकार समितीचा वटवृक्ष करण्यात त्यांचा असलेला सिंहाचा वाटा आहे. तसेच गेल्या लोकसभेतील प्रभावी कामगिरी पाहता त्यांची केंद्रीय कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतर्फे  कीर्तिकर, राज्यसभा खासदार संजय राऊत, बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव, यवतमाळच्या खासदार भावना गवळी, राज्यसभा खासदार अनिल देसाई, सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत, दक्षिण मुंबईचे खासदार अरविंद सावंत यांची नावे आघाडीवर आहेत. संजय राऊत व कीर्तिकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळू शकते.

सिंधुदुर्गलाही मिळणार केंद्राची ताकद

दैनिक सामन्याचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा पिंड हा पत्रकारितेचा आहे. जर त्यांना मंत्रीपद मिळाले तर त्यांना कार्यकारी संपादक पदाचा राजीनामा द्यावा लागेल. तर मागील मोदी सरकारमध्ये दिल्ली विमानतळावरून मातोश्रीच्या आदेशाने परत यावे लागलेले राज्य सभा खासदार अनिल देसाई यांचे मंत्रीपद हुकले होते. मात्र, आता त्यांची मंत्री म्हणून वर्णी लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.सिंधुदुर्ग येथील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे सलग दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि कोकणात शिवसेनेला अधिक मजबूत करण्यासाठी विनायक राऊत यांचा विचार होऊ शकतो अशी चर्चा आहे. यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांचा खासदार म्हणून प्रदीर्घ अनुभव आहे. शिवसेनेतील एकमेव महिला खासदार म्हणून त्यांना संधी मिळू शकते. तर कामगार नेते, आमदार व सलग दुसऱ्यांदा निवडून येणारे अरविंद सावंत यांच्या नावाचा सुद्धा विचार होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत Gajanan Kirtikarगजानन कीर्तीकर