शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

अन् गावात चर्चा खासदार कोण होणार याचीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:29 IST

चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्यात आतापर्यंत मतदान पार पडल्या आहेत. मतदान झालेल्या मतदारसंघात कोण निवडून येणार याची चर्चा पहायला मिळत आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार खासदार होणार याबाबत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठात चर्चा रंगत आहे. गावातील पारावर आता मतांची जुळवाजुळवी सुरू झाली असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. 

ग्रामीण भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, शेतात कामे नसल्याने गावकरी गावच्या समाजमंदिर असो किंवा गावातील मुख्य ठिकाणी गप्पागोष्टीत रंगलेले पहायला मिळत आहे. गावात सध्या सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे. गावातील तरूण आणि वृद्ध यांच्यात मतांच्या जुळवाजुळवी वरून खटके उडत आहे. आपलाच नेता निवडून येणार असे ठासून सांगणारे कार्यकर्ते सुद्धा या चर्चेत सामील होत आहेत.

चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य जनतेला आणि विशेषत: राजकीय आवड असलेल्या लोकांना मेजवानीच असते.

ग्रामीण भागात राजकारण प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे, याचा प्रत्येय येऊ लागला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकाल हाती येण्यासाठी अजून महिना लागणार आहे, मात्र तोपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते आप-आपली गणित माडंत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाSocial Mediaसोशल मीडिया