शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

अन् गावात चर्चा खासदार कोण होणार याचीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:29 IST

चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्यात आतापर्यंत मतदान पार पडल्या आहेत. मतदान झालेल्या मतदारसंघात कोण निवडून येणार याची चर्चा पहायला मिळत आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार खासदार होणार याबाबत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठात चर्चा रंगत आहे. गावातील पारावर आता मतांची जुळवाजुळवी सुरू झाली असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. 

ग्रामीण भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, शेतात कामे नसल्याने गावकरी गावच्या समाजमंदिर असो किंवा गावातील मुख्य ठिकाणी गप्पागोष्टीत रंगलेले पहायला मिळत आहे. गावात सध्या सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे. गावातील तरूण आणि वृद्ध यांच्यात मतांच्या जुळवाजुळवी वरून खटके उडत आहे. आपलाच नेता निवडून येणार असे ठासून सांगणारे कार्यकर्ते सुद्धा या चर्चेत सामील होत आहेत.

चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य जनतेला आणि विशेषत: राजकीय आवड असलेल्या लोकांना मेजवानीच असते.

ग्रामीण भागात राजकारण प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे, याचा प्रत्येय येऊ लागला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकाल हाती येण्यासाठी अजून महिना लागणार आहे, मात्र तोपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते आप-आपली गणित माडंत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाSocial Mediaसोशल मीडिया