शहरं
Join us  
Trending Stories
1
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
2
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
3
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
4
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
5
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
6
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
7
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
8
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
9
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
10
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
11
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
12
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
13
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
14
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
15
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
16
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
17
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
18
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
19
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
20
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

अन् गावात चर्चा खासदार कोण होणार याचीच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2019 18:29 IST

चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत.

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या तीन टप्यात आतापर्यंत मतदान पार पडल्या आहेत. मतदान झालेल्या मतदारसंघात कोण निवडून येणार याची चर्चा पहायला मिळत आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार खासदार होणार याबाबत ग्रामीण भागातील मुख्य बाजारपेठात चर्चा रंगत आहे. गावातील पारावर आता मतांची जुळवाजुळवी सुरू झाली असून उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे. 

ग्रामीण भागात सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, शेतात कामे नसल्याने गावकरी गावच्या समाजमंदिर असो किंवा गावातील मुख्य ठिकाणी गप्पागोष्टीत रंगलेले पहायला मिळत आहे. गावात सध्या सर्वत्र निवडणुकीच्या चर्चा रंगत आहे. गावातील तरूण आणि वृद्ध यांच्यात मतांच्या जुळवाजुळवी वरून खटके उडत आहे. आपलाच नेता निवडून येणार असे ठासून सांगणारे कार्यकर्ते सुद्धा या चर्चेत सामील होत आहेत.

चौकाचौकांत आणि गल्लीबोळामध्ये उमेदवारांच्या जय-पराजयावर जोरदार विचारमंथन सुरू आहे. २३ मे रोजी निकाल लागणार असल्याने तोपर्यंत अशाच चर्चा सुरु राहणार आहे. आपलाच उमेदवार निवडून येणार हे पटवून देताना पैजा आणि ईर्षा टोकाला जाऊ लागल्या आहेत. निवडणूक कोणतीही असली तरी सामान्य जनतेला आणि विशेषत: राजकीय आवड असलेल्या लोकांना मेजवानीच असते.

ग्रामीण भागात राजकारण प्रत्येकाच्या नसानसात भिनलेले आहे, याचा प्रत्येय येऊ लागला आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता आहे. निकाल हाती येण्यासाठी अजून महिना लागणार आहे, मात्र तोपर्यंत उमेदवार आणि कार्यकर्ते आप-आपली गणित माडंत आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकElectionनिवडणूकlok sabhaलोकसभाSocial Mediaसोशल मीडिया