शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मंत्री कोणाला करावे, हाच एक प्रश्न आहे...

By अतुल चिंचली | Updated: December 8, 2024 07:56 IST

सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो...

- अतुल कुलकर्णी संपादक, मुंबई

प्रिय आमदार मित्रहो,सरकार कोणत्याही पक्षाचे, विचाराचे स्थापन झाले, तरी मंत्री कोणाला करावे? हाच एक प्रश्न सतत छळत राहतो... एका पक्षाचे मुख्यमंत्री असलेले सरकार असो किंवा वेगवेगळ्या पक्षांचे एक मुख्यमंत्री, एक उपमुख्यमंत्री किंवा एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री असे कसेही सरकार बनले तरी प्रश्न एकच आहे, मंत्री कोणाला करावे... तुमच्या मनातल्या प्रश्नांचा घेतलेला हा वेध -जात बघावी की समाज... की सांभाळावे विभागाचे गणित... 

की झुगारून द्यावीत सगळी बंधनं आणि द्यावे फक्त आणि फक्त गुणवत्तेलाच प्राधान्य? की संधी द्यावी निष्ठावंतांना...? त्यातही पक्षातल्या निष्ठावंतांना, की आपल्यावर निष्ठा ठेवणाऱ्यांना..?जिल्ह्या-जिल्ह्यात पक्ष वाढवण्यासाठी द्यावी संधी आपल्याच पक्षातल्या नेत्यांना..?की गांधीजींवर प्रेम असणाऱ्या आपल्याच नेत्यांना द्यावी मंत्रिपदाची संधी..?गांधींचे फोटो ज्याच्याजवळ जेवढे जास्त तेवढा तो आपल्या कामाचा...या विचारांमुळे दादा..., भाऊ..., साहेब...तिघेही परेशान आहेत बाबूराव... म्हणून तरकोणाला संधी द्यावी हाच एक प्रश्न आहे..?

साहेबांपुढे वेगळेच प्रश्न आहेत...तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकरअब्दुल सत्तार यांनाच किती वेळा संधी देता...आम्ही काय सतरंज्याच उचलायच्या का?असा सवाल चार वेळा निवडून आलेले,आपल्यावर निष्ठा ठेवून आपल्या सोबत आलेले,अनेक नेते कळवळून विचारत आहेत...त्यांना काय उत्तर द्यायचे? या विचारात साहेब रात्रभर अस्वस्थ होते...कारण, मंत्री कोणाला करावे..?हाच एक सवाल आहे... जो दिवस-रात्र सगळ्यांना छळतो आहे...

तिकडे दादांचेही असेच झाले आहे...छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, आदिती तटकरे यांना डावलून शिफारस तरी कोणाच्या नावाची करायची? मराठा तितुका मेळवावा... अशी भूमिका घ्यायची की, देवाभाऊसारखी ओबीसींची जबरदस्त मोट बांधायची..?की पदरी पडले पवित्र झाले, असे म्हणत मिळेल ती मंत्रिपदं घ्यायची आणि गपगुमान बसायचे पाच वर्षे विरोध न करता...सारखा एकच प्रश्न छळतो आहे मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...

देवाभाऊकडे जाऊन सांगायचे कसे..?लॉबिंग करायचे की स्वतःचे मार्केटिंग...देवाभाऊपुढेही प्रश्न आहेतच...वर्षानुवर्षे मंत्रिपदाची झूल पांघरणाऱ्यांनादूर करून, देऊन टाकावी का संधी नव्या रक्ताला? आणि घ्यावा वसा नवनिर्माणाचा...की, ज्येष्ठांना द्यावे पाठवून सल्लागार मंडळात,आणि नव्यांच्या हाती द्यावी राज्याची दोरी पक्षाचे निष्ठावंत महत्त्वाचे; की आपले...?प्रश्न अनेक आहेत, पण छळणारा प्रश्न एकच आहे यावेळी मंत्री करावे तरी कोणाला..?

की ठेवाव्या मंत्रिपदाच्या काही खुर्च्या रिकाम्या,वर्षानुवर्ष हेच तर करत आले आहेत, सगळे... त्यातली एक खुर्ची तुमच्यासाठीच ठेवली आहे, असे सांगून घ्याव्या काढून पालिका निवडणुका की वाटावीत मन कठोर करूनमहामंडळांची गाजरे नेहमीप्रमाणे राज्यभर... 

कोणी म्हणतील तुम्ही इतके कठोर का झालात..?एका बाजूला आम्ही ज्यांना मोठे केले, तेच आम्हाला विसरून गेले... दुसऱ्या बाजूला आम्ही केलेली मदतही काही जण विसरून गेले...मग अशा विस्कटलेल्या प्रश्नांचे, हे सगळे गाठोडे घेऊन दयाघना प्रश्न सोडवण्यासाठी जायचे तरी कोणाकडे..?कारण या सगळ्याच्या वरही एक प्रश्न छळतोच आहे मंत्री कोणाला करावे? हाच तो प्रश्न आहे...- तुमचाच बाबूराव

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे