शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या माहितीमध्ये लपवाछपवीच, दाद मागायची कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:51 IST

‘लोकमत’ने केंद्रीय अर्थ मंत्रालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधून देशातील या दोन्ही विमा याेजनांतील लाभार्थींची संख्या उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली; परंतु त्यांच्याकडून त्याबद्दल असमर्थता व्यक्त करण्यात आली.

विश्वास पाटीलकोल्हापूर : पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेमध्ये महाराष्ट्रात आणि देशात किती लोक सहभागी झाले व त्याचा प्रत्यक्ष किती लोकांना लाभ झाला, ही माहिती उपलब्ध करून देण्यात बँकांसह केंद्र सरकारही फारसे उत्सुक नसल्याचाच अनुभव आहे. प्रत्येक वर्षी किती लोक दोन्ही योजनेत सहभागी झाले हे अग्रणी बँका सांगतात; परंतु किती लाेकांना त्याचा लाभ झाला, हे मात्र सरकारी यंत्रणा सांगायला तयार नाहीत.मागील दोन वर्षे कोरोनाने देशात साडेतीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, महाराष्ट्रात दीड लाख लोक त्याला बळी पडले, त्यांना या योजनेचा लाभ व्हायला हवा होता; परंतु प्रत्यक्षातील चित्र तसे नाही. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्यासाठी अंमलबजावणीची यंत्रणा उभारण्याची गरज आहे.केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी २७ ऑक्टोबर २०२१ ला लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा योजनेचे ५ लाख १२ हजार ९१४ लोकांना १०,२८५ कोटी रुपये तर जीवन ज्योती योजनेचे ९२ हजार २६६ लोकांना १,७९७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या अन्य विमा अथवा कोणत्याही योजनेचा लाभ किती लोकांना झाला याची माहिती उपलब्ध असते.परंतु याच दोन योजना अशा आहेत की त्यांचा हप्ता दरवर्षी मे महिन्यात बँक खात्यातून कपात करून घेतला जातो; परंतु त्याचा लाभ देण्याबाबतची जबाबदारी मात्र कोणत्याही सरकारी यंत्रणांवर निश्चित केलेली नाही. बँका हप्ता कपात करून घेतात; परंतु त्यांना कुणाचा मृत्यू झाला व कुणाला अपंगत्व आले याचे देणेघेणे नाही. या दोन्ही योजनांच्या विमा कंपन्या कोण आहेत, मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी ही रक्कम मिळण्यासाठी कुणाकडे जावे यासंदर्भातील प्राथमिक माहितीही सरकारी यंत्रणा देत नाहीत. त्यामुळे सध्या तरी वसुली जोरात मात्र लाभ मिळताना मारामार असाच अनुभव या दोन्ही योजनांचा आहे.

२०२१ अखेर एक कोटी ८० लाख जण सहभागीराज्यस्तरीय बँकिंग समितीच्या सूत्रांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२१ अखेर राज्यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत १ कोटी ७९ लाख ९५ हजार ४५७ तर पंतप्रधान जीवन ज्योती योजनेेत ७३ लाख २५ हजार ५७२ नागरिक सहभागी झाले आहेत. परंतु मागील वर्षात या दोन्ही योजनांचा लाभ किती मृतांच्या वारसांना झाला, याची माहिती त्यांच्याकडे नाही.

लाभार्थींची माहिती देण्यास असमर्थता‘लोकमत’ने केंद्रीय अर्थ मंत्रालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधून देशातील या दोन्ही विमा याेजनांतील लाभार्थींची संख्या उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली; परंतु त्यांच्याकडून त्याबद्दल असमर्थता व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यprime ministerपंतप्रधान