शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेच्या माहितीमध्ये लपवाछपवीच, दाद मागायची कुणाकडे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 11:51 IST

‘लोकमत’ने केंद्रीय अर्थ मंत्रालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधून देशातील या दोन्ही विमा याेजनांतील लाभार्थींची संख्या उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली; परंतु त्यांच्याकडून त्याबद्दल असमर्थता व्यक्त करण्यात आली.

विश्वास पाटीलकोल्हापूर : पंतप्रधान सुरक्षा विमा योजना व पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेमध्ये महाराष्ट्रात आणि देशात किती लोक सहभागी झाले व त्याचा प्रत्यक्ष किती लोकांना लाभ झाला, ही माहिती उपलब्ध करून देण्यात बँकांसह केंद्र सरकारही फारसे उत्सुक नसल्याचाच अनुभव आहे. प्रत्येक वर्षी किती लोक दोन्ही योजनेत सहभागी झाले हे अग्रणी बँका सांगतात; परंतु किती लाेकांना त्याचा लाभ झाला, हे मात्र सरकारी यंत्रणा सांगायला तयार नाहीत.मागील दोन वर्षे कोरोनाने देशात साडेतीन लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला, महाराष्ट्रात दीड लाख लोक त्याला बळी पडले, त्यांना या योजनेचा लाभ व्हायला हवा होता; परंतु प्रत्यक्षातील चित्र तसे नाही. त्यामुळे या दोन्ही योजनांचा लाभ मिळण्यासाठी अंमलबजावणीची यंत्रणा उभारण्याची गरज आहे.केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी २७ ऑक्टोबर २०२१ ला लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा योजनेचे ५ लाख १२ हजार ९१४ लोकांना १०,२८५ कोटी रुपये तर जीवन ज्योती योजनेचे ९२ हजार २६६ लोकांना १,७९७ कोटी रुपयांचे वाटप केले आहे. राज्य व केंद्र शासनाच्या अन्य विमा अथवा कोणत्याही योजनेचा लाभ किती लोकांना झाला याची माहिती उपलब्ध असते.परंतु याच दोन योजना अशा आहेत की त्यांचा हप्ता दरवर्षी मे महिन्यात बँक खात्यातून कपात करून घेतला जातो; परंतु त्याचा लाभ देण्याबाबतची जबाबदारी मात्र कोणत्याही सरकारी यंत्रणांवर निश्चित केलेली नाही. बँका हप्ता कपात करून घेतात; परंतु त्यांना कुणाचा मृत्यू झाला व कुणाला अपंगत्व आले याचे देणेघेणे नाही. या दोन्ही योजनांच्या विमा कंपन्या कोण आहेत, मृत्यूनंतर त्यांच्या वारसांनी ही रक्कम मिळण्यासाठी कुणाकडे जावे यासंदर्भातील प्राथमिक माहितीही सरकारी यंत्रणा देत नाहीत. त्यामुळे सध्या तरी वसुली जोरात मात्र लाभ मिळताना मारामार असाच अनुभव या दोन्ही योजनांचा आहे.

२०२१ अखेर एक कोटी ८० लाख जण सहभागीराज्यस्तरीय बँकिंग समितीच्या सूत्रांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला. त्यांनी उपलब्ध करून दिलेल्या माहितीनुसार, ३१ डिसेंबर २०२१ अखेर राज्यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेत १ कोटी ७९ लाख ९५ हजार ४५७ तर पंतप्रधान जीवन ज्योती योजनेेत ७३ लाख २५ हजार ५७२ नागरिक सहभागी झाले आहेत. परंतु मागील वर्षात या दोन्ही योजनांचा लाभ किती मृतांच्या वारसांना झाला, याची माहिती त्यांच्याकडे नाही.

लाभार्थींची माहिती देण्यास असमर्थता‘लोकमत’ने केंद्रीय अर्थ मंत्रालयातील संबंधित विभागाशी संपर्क साधून देशातील या दोन्ही विमा याेजनांतील लाभार्थींची संख्या उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली; परंतु त्यांच्याकडून त्याबद्दल असमर्थता व्यक्त करण्यात आली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरHealthआरोग्यprime ministerपंतप्रधान