शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

भगीरथ बियाणी कोण आहे?: ज्यांच्या मृत्यूवरून जितेंद्र आव्हाडांनी केला गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:09 IST

बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा आव्हाडांनी दिला. 

ठाणे - कर्जत येथील चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाडांनी भगीरथ बियाणी यांच्या नावाचा उल्लेख केला. भगीरथ बियाणीनं आत्महत्या का केली? कुणामुळे केली? २००२ पासून बीडमध्ये जी खुनाची मालिका सुरू झाली त्यामागे कोण असा थेट सवाल आव्हाडांनी उपस्थित केल्यानं अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, काकाच्या पाठीत सुरा कुणी खुपसला. राजकीय जन्म काकांनीच दिला. तुम्हाला चुलत बहिण नको होती, मग ओवाळायला का जाता? जे ऐश्वर्य मिळाले ते कुणामुळे? भगीरथ बियाणीने आत्महत्या का केली, त्याच्या पोरीला कुणी छळलं, त्यामुळे भगीरथ बियाणीनं आत्महत्या केली की नाही? मी आजपर्यंत कुणाचे नाव तोंडात काढले नाही तुम्ही माझे नाव काढाल तर मी शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

कोण आहे भगीरथ बियाणी?

११ ऑक्टोबर २०२२ रोजी बीडमधील भाजपा पदाधिकारी भगीरथ बियाणी यांनी आत्महत्या केल्याची बातमी समोर आली. स्वत:जवळील बंदुकीने बियाणी यांनी डोक्यात गोळी झाडून घेत आत्महत्या केली. बीड शहरातील एमआयडीसी भागातील बियाणी यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. बियाणी हे भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. आत्महत्येच्या आदल्या रात्री बियाणींनी आपल्या कुटूंबासमवेत उशिरापर्यंत गप्पा मारल्या. नंतर ते आपल्या खोलीत झोपायला गेले. पहाटेच्या सुमारास उशिरापर्यंत दरवाजा उघउला नसल्याने कुटूंबियाने पाहिले तर बियाणी हे रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.

बियाणी यांना तात्काळ बीड शहरातील एका खासगी रूग्णालयात दाखल केले परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.बियाणी यांच्याकडून पिस्तूल साफ करताना ट्रिगर दाबून चुकून गोळी झाडली गेली असावी, असा अंदाज वर्तवण्यात आला. भगीरथ बियाणी यांच्या मृत्यूस्थळी सुसाईट नोटही लिहिल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे बियाणी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे. मात्र जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या दाव्यामुळे आज पुन्हा ही घटना चर्चेत आली आहे. 

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाड