शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
2
अजित पवारांचा घूमजाव, आधी म्हणाले कल्पना होती, आता म्हणतात, "पार्थच्या जमीन व्यवहाराची माहिती नाही"
3
रस्त्यावर भटके कुत्रे दिसले नाही पाहिजे, त्यांना..; सर्वोच्च न्यायालयाचे तीन मोठे आदेश
4
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
5
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
6
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
7
मारुतीने व्हिक्टोरिस लाँच केली अन् या कारवर बंपर सूट दिली; ऑक्टोबरपेक्षा आणखी ५४,००० रुपयांनी स्वस्त केली...
8
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'
9
Jasprit Bumrah Record : बुमराहचा मोठा पराक्रम! पाकिस्तानी गोलंदाजाला धोबीपछाड देत बनला 'नंबर वन'
10
Astro Tips: काही जातकांच्या पत्रिकेत विवाह योगच नसतो; त्यांनी कोणता उपाय करावा? पाहू 
11
२०२६ हे पाकिस्तानसाठी 'प्रलयाचे वर्ष'? ज्योतिषांचा धक्कादायक अंदाज; भारतासोबत मोठ्या युद्धाचे संकेत...
12
शनिवारी संकष्ट चतुर्थी, ३ राशींना साडेसाती; ‘हे’ ५ उपाय नक्की करा, शनिदोषातून मुक्तता मिळवा!
13
Video - बॅकबेंचर ते चार्टर्ड अकाउंटंट... लेक CA होताच बापाने मारली घट्ट मिठी, डोळ्यांत आनंदाश्रू
14
पाकिस्तानने शस्त्रसंधी मोडली, अफगाणिस्तानवर हल्ला; चिडलेले तालिबान म्हणतेय, 'आता तुम्हाला तोडणार'
15
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
16
नितीश कुमारांची डोकेदुखी वाढणार? वाढीव मतदानामुळे सत्तांतराची शक्यता? आकडे काय सांगतात?
17
कार्तिक संकष्ट चतुर्थी २०२५: चंद्रोदयाची वेळ काय? ‘असे’ करा व्रत; राहु काळ, शुभ मुहूर्त पाहा
18
कोकणात ठाकरे आणि शिंदे गट एकत्र येणार? राणेंच्या बालेकिल्ल्यात भाजपाला आव्हान देणार, गुप्त बैठक झाल्याची चर्चा
19
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! SBI नवीन आयपीओ आणण्याच्या तयारीत, ८ हजार कोटींपर्यंत उभे करण्याचा प्लॅन
20
Jara Hatke: पूजेत, धर्मकार्यात वापरला जाणारा पांढरा शुभ्र कापूर कसा तयार करतात माहितीय?

भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 06:21 IST

भाजपविरोधात शिवसेनेतून नेमका आधी कोणी आवाज उठविला होता, यावरुन दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत.

विनायक राऊत, शिवसेना नेते

अशोक चव्हाण नक्की काय बोलले, हे मी ऐकलेले नाही. मात्र, एक नक्की २०१४ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले, त्याच्या काही महिन्यांनंतर भाजपच्या हुकूमशाहीबद्दल, त्रासाबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बॉसिंग करायचे आणि शिवसेनेला दुय्यम लेखायचे, शिवसेनेच्या मंत्र्यांचे प्रस्ताव फेकून द्यायचे, याबाबत पहिला आवाज एकनाथ शिंदे यांनी उठवला होता. कल्याण-डोंबिवलीतील सभेत जाहीरपणे त्यांनी भाषण करून दडपशाहीच्या, हुकूमशाहीच्या राजवटीत मी मंत्री राहू शकत नाही, असे सांगत स्टेजवरच उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी प्रथम एकनाथ शिंदे यांनीच भाजपविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी भर सभेत फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देण्याची भाषा करणारे एकनाथ शिंदे आता त्यांची सोबत कशी काय करू शकतात, हे ईडीच सांगू शकेल. अशोक चव्हाण जे बोलले आहेत, त्याला यामुळे दुजोरा मिळतो आहे. आपल्याला भेटलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी चालत होती का? 

भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट

खरे म्हणजे आम्हाला यातील काहीच माहीत नाही, त्यावेळी काय परिस्थिती असेल त्यानुसार माणसे धावपळ करत असतात. पण अशोक चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. अशोक चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे भाजप आणि शिंदे गटात कोणतेही अविश्वासाचे वातावरण तयार होणार नाही. अविश्वास असता तर आम्ही भाजपसोबत गेलोच नसतो. एकनाथ शिंदेंनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला हे भाजपला माहीत आहे. जोपर्यंत आमची सोबत नव्हती तेव्हा ठीक आहे, पण आता सोबत दिली तर आम्ही त्यावर ठाम आहोत. एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात दि. ५ सप्टेंबरला याचे उत्तर देतील. तेव्हा ते सगळ्यांचा समाचार घेतील. ही २०१७ची बाब असल्याचे अशोक चव्हाण सांगतात आणि त्याबद्दल आता बोलतात. ज्या अशोक चव्हाण यांच्याबद्दल वेगळी चर्चा सुरू आहे, त्यांना आता काय उपरती आली माहीत नाही. चव्हाण बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी विधानसभेत आले नाहीत, बाहेर थांबले. एवढे ज्येष्ठ नेते त्यांना माहीत आहे मतदानाच्या वेळी वेळेवर विधानसभेचे दरवाजे बंद होतात. याचा अर्थ काय. त्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायचे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत