शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
7
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपविरोधात आधी कोणी आवाज उठवला होता? शिंदे गट आणि शिवसेना ‘आमने-सामने’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 06:21 IST

भाजपविरोधात शिवसेनेतून नेमका आधी कोणी आवाज उठविला होता, यावरुन दावे-प्रतिदावे होताना पाहायला मिळत आहेत.

विनायक राऊत, शिवसेना नेते

अशोक चव्हाण नक्की काय बोलले, हे मी ऐकलेले नाही. मात्र, एक नक्की २०१४ मध्ये जेव्हा भाजप-शिवसेना युतीचे सरकार आले, त्याच्या काही महिन्यांनंतर भाजपच्या हुकूमशाहीबद्दल, त्रासाबद्दल शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी होती. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पद्धतीने बॉसिंग करायचे आणि शिवसेनेला दुय्यम लेखायचे, शिवसेनेच्या मंत्र्यांचे प्रस्ताव फेकून द्यायचे, याबाबत पहिला आवाज एकनाथ शिंदे यांनी उठवला होता. कल्याण-डोंबिवलीतील सभेत जाहीरपणे त्यांनी भाषण करून दडपशाहीच्या, हुकूमशाहीच्या राजवटीत मी मंत्री राहू शकत नाही, असे सांगत स्टेजवरच उद्धव ठाकरे यांच्याकडे मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी प्रथम एकनाथ शिंदे यांनीच भाजपविरोधात आवाज उठवला होता. त्यावेळी भर सभेत फडणवीसांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा देण्याची भाषा करणारे एकनाथ शिंदे आता त्यांची सोबत कशी काय करू शकतात, हे ईडीच सांगू शकेल. अशोक चव्हाण जे बोलले आहेत, त्याला यामुळे दुजोरा मिळतो आहे. आपल्याला भेटलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे होते, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले आहे, तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी चालत होती का? 

भरत गोगावले, गटनेते, शिंदे गट

खरे म्हणजे आम्हाला यातील काहीच माहीत नाही, त्यावेळी काय परिस्थिती असेल त्यानुसार माणसे धावपळ करत असतात. पण अशोक चव्हाण यांचे विधान गांभीर्याने घेण्याचे कारण नाही. अशोक चव्हाण यांच्या या गौप्यस्फोटामुळे भाजप आणि शिंदे गटात कोणतेही अविश्वासाचे वातावरण तयार होणार नाही. अविश्वास असता तर आम्ही भाजपसोबत गेलोच नसतो. एकनाथ शिंदेंनी एकदा शब्द दिला म्हणजे दिला हे भाजपला माहीत आहे. जोपर्यंत आमची सोबत नव्हती तेव्हा ठीक आहे, पण आता सोबत दिली तर आम्ही त्यावर ठाम आहोत. एकनाथ शिंदे दसरा मेळाव्यात दि. ५ सप्टेंबरला याचे उत्तर देतील. तेव्हा ते सगळ्यांचा समाचार घेतील. ही २०१७ची बाब असल्याचे अशोक चव्हाण सांगतात आणि त्याबद्दल आता बोलतात. ज्या अशोक चव्हाण यांच्याबद्दल वेगळी चर्चा सुरू आहे, त्यांना आता काय उपरती आली माहीत नाही. चव्हाण बहुमत सिद्ध करण्याच्या वेळी विधानसभेत आले नाहीत, बाहेर थांबले. एवढे ज्येष्ठ नेते त्यांना माहीत आहे मतदानाच्या वेळी वेळेवर विधानसभेचे दरवाजे बंद होतात. याचा अर्थ काय. त्यामुळे यांच्यावर किती विश्वास ठेवायचा हे जनतेने ठरवायचे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाVinayak Rautविनायक राऊत